शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

देशातील एकूण अन्नप्रक्रिया उद्योगातील गुंतवणुकीपैकी ३० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात- पांडुरंग फुंडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 19:18 IST

मुंबई : कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये देशात होणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी सर्वाधिक ३० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात होणार आहे.

मुंबई : कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये देशात होणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी सर्वाधिक ३० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात होणार आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या वर्ल्ड फूड इंडिया परिषदेच्या माध्यमातून जगभरातील अनेक गुंतवणूकदारांनी राज्यात अन्नप्रक्रिया उद्योगात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.इतर राज्यांच्या तुलनेत अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी महत्वपूर्ण निर्णय घेतले असून, या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून फुंडकर म्हणाले की, राज्याने अन्न प्रकिया उद्योगांसाठी विविध परदेशी कंपन्यांशी चर्चा केली. केवळ स्थानिक शेतकऱ्यांचाच शेतमाल विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्याचे उत्पादन तयार करण्याच्या निकषावरच परकीय गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची संधी देण्यात येईल. परिणामी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार आहे.वर्ल्ड फूड इंडिया या जागतिक परिषदेत राज्याच्या दर्जेदार उत्पादनांचे २३ Stall उपलब्ध करून देण्यात आले होते. जागतिक पातळीवरील संशोधक व गुंतवणूकदारांनी या Stallला भेटी देऊन राज्याच्या अन्नप्रक्रियेतील प्रणालीचे कौतुक केले. अनेकांनी राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली असून राज्य शासन मोठ्या प्रमाणावर परकीय कंपन्यांना मदत करणार आहे. यातून कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना मिळेल तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास कृषिमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Pandurang Phundkarपांडुरंग फुंडकरMumbaiमुंबई