शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 06:05 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पॅकेजपैकी १,३५६  कोटीची मदत कालच वितरित करण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित  २३ जिल्ह्यातील ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांच्या २७ लाख ५९ हजार ७५४.७७ हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांच्या मदतीसाठी  ३२५८ कोटी ५६ लाख  इतका निधी  वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत पूरग्रस्तांना साडेसात हजार कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पॅकेजपैकी १,३५६  कोटीची मदत कालच वितरित करण्यात आली. 

ई-केवायसीत हलगर्जी केल्यास मदतीला मुकणार 

एप्रिल व मे महिन्यात राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने शेतीला मोठा तडाखा दिला होता. त्यामुळे उन्हाळी तसेच फळपिकांची मोठी हानी झाली होती. त्यानंतर राज्य सरकारने एप्रिल व मे महिन्याची एकत्रित भरपाई मंजूर केली आहे. लाभार्थ्यांना मदतीसाठी ई-केवायसी करण्याचे बंधन करण्यात आले आहे. लाभार्थ्यांच्या माहितीत त्रुटी असल्याने त्यांना अजून पात्र ठरविण्यात आलेले नाही. मात्र केवायसी करण्यात शेतकऱ्यांनी हलगर्जीपणा दाखवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यात केवायसीअभावी रखडला मदतनिधी

पुणे जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्य सरकारने मंजूर केलेले अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांनी केवायसी घेतली नसल्याने त्यांना मदत जमा करण्यात अडथळे येत आहेत. पुणे जिल्ह्यात ४७ हजार ४२४ मंजूर लाभार्थ्यांपैकी ४० हजार ९८६ लाभार्थ्यांना पात्र ठरविण्यात आले आहे. त्यातील तब्बल ३० हजार ८९ लाभार्थ्यांनी अद्यापही ई-केवायसी न केल्याने त्यांना ही मदत वाटप करता आलेली नाही. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी तत्काळ ई-केवायसी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यासाठी राज्य सरकारने २६ कोटी ९२ लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे.

विभागनिहाय मिळालेला निधी (कोटीमध्ये)

विभाग    शेतकरी    क्षेत्र    निधी

नागपूर    ३,७६,९६८    ३,४४,६२९.३४    ३४०,९०,८०००अमरावती    ४,७८,९०९    ५,२६,३८१.३६    ४६३, ८,३००००पुणे    ८,२५,१८९    ७,०९२०९.१५    ९५१, ६३,३७०००नाशिक    १५, ७९,२३९    ११,५०,३०१.७६    १४७४,८४,९००० कोकण    १,०५,२३९    २९,२३३.१६    २८,१०,६३०००

 

English
हिंदी सारांश
Web Title : ₹3,258 Crore Directly to Farmers; Aid Package Approved, ₹7,500 Crore Total.

Web Summary : Maharashtra government approved ₹3,258 crore for 33 lakh farmers affected by heavy rains. Total aid this season reaches ₹7,500 crore. Farmers urged to complete e-KYC to receive funds, with Pune facing delays due to incomplete KYC.
टॅग्स :State Governmentराज्य सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी