शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

३ रस्ते तब्बल २४ वर्षे कागदावरच...

By admin | Updated: June 29, 2016 20:28 IST

विकास आराखड्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत खुद्द महापालिका प्रशासनच उदासिन असल्याचे ताजे प्रकरण उजेडात आले आहे़ १९९१ च्या विकास आराखड्यात जोगेश्वरीत प्रस्तावित तीन रस्ते तब्बल २४ वर्षे कागदावरच

प्रस्तावित रस्त्यांची कामं २४ वर्षे रखडली

मुंबई  , दि. २९ : विकास आराखड्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत खुद्द महापालिका प्रशासनच उदासिन असल्याचे ताजे प्रकरण उजेडात आले आहे़ १९९१ च्या विकास आराखड्यात जोगेश्वरीत प्रस्तावित तीन रस्ते तब्बल २४ वर्षे कागदावरच आहेत़ एवढेच नव्हे तर उद्यान आणि दवाखान्यांच्या तरतुदीबाबतही प्रशासनाने हीच भूमिका ठेवली असल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेनेने केला आहे़ विकास नियोजन आराखड्याची केवळ १८ ते २० टक्के अंमलबजावणी होत असल्याचे समोर आले आहे़ सन २०१४ ते २०३४ या २० वर्षांमध्ये शहराच्या विकासाचे नियोजन करताना ही बाब उजेडात आली़ पालिका प्रशासनानेच अशी कबुली देत आराखड्यावर अंमल करण्यासाठी नियमित आढावा घेण्याचे ठरविले आहे़.

प्रत्यक्षात दिव्याखालीच अंधार असल्याचे दिसून येत आहे़ जोगेश्वरी पूर्वेकडील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी १९९१ च्या विकास आराखड्यात रस्ते, बेस्ट आगार, उद्यानं, खेळाचे मैदान, दवाखाना, शाळा असे आरक्षण टाकण्यात आले होते़ परंतु या तरतुदींनुसार कोणतीच कामं गेल्या २४ वर्षांमध्ये झालेली नाहीत़ उलट या रस्त्यांसाठी प्रशासनाने आता नकारघंटा वाजविली आहे़ त्यामुळे प्रशासनाचा हा अभिप्राय सुधार समितीने फेटाळला आहे़ प्रतिनिधी चौकट हेच ते प्रस्तावित तीन रस्ते मजास येथील असेंट रेसिडेन्सी ते शाम नगर तलाव, मेघवाडी ते गौरव हॉटेल आणि सपाळे कंपनी ते गौरव हॉटेल असे तीन रस्ते गेल्या २४ वर्षांपासून रखडले आहेत़ स्थानिक नगरसेवकाने या रस्त्यांची मागणी केली होती़ मात्र प्रशासनाने त्यास नकार दिला आहे़.

 विकासकाचे प्रकल्प मात्र मंजूर मजासवाडी येथील असेंट रेसिडन्सी ते शामनगर तलाव येथील शंभर मी़ रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीचा वाद न्यायालयात आहे, अशी सबब देऊन रस्त्यांचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळला आहे़ मात्र याच परिसरात नवीन इमारतीला मंजुरी देण्यात आली आहे़ त्यामुळे एका ठिकाणी एक न्याय आणि दुसऱ्या ठिकाणी दुसरा असा हा प्रकार असून कायदेशीर मतं घेऊन तोडगा काढण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे़ प्रशासनाची अशी ही टोलवाटोलवी मेघवाडी ते गौरव हॉटेलपर्यंतचा रस्ता झोपड्यांनी व्यापला आहे़ त्याचे भूसंपादन केल्यास आजच्या सिद्धगणकाप्रमाणे बाजारभावाच्या तीनपट अधिक रक्कम द्यावी लागणार आहे़ तसेच पुनर्वसन खर्च, बाधित कुटुंबियांना पर्यायी घर द्यावे लागेल़ या विभागात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणण्यात येणार आहे, अशी विचारणा एसआरएला पत्र पाठवून करण्यात आले असल्याचा अजब कारण प्रशासनाने या रस्ते कामांच्या दिरंगाईसाठी दिले आहे़