शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

४५ हजार कोटींच्या घोषणेला ३ महिने उलटले; कोणत्याही विभागाला शासकीय सूचना नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 08:12 IST

स्थानिक पातळीवरूनही काही हालचाली नसल्यामुळे या पॅकेजमधील कामांना मुहूर्त कधी लागणार, सरकार मराठवाड्याला कधी पावणार? असा प्रश्न आहे.

विकास राऊतछत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा झाली होती. त्याला आता तीन महिने झाले तरी सरकारकडून अद्याप कोणत्याही विभागाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आल्या नसल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

स्थानिक पातळीवरूनही काही हालचाली नसल्यामुळे या पॅकेजमधील कामांना मुहूर्त कधी लागणार, सरकार मराठवाड्याला कधी पावणार? असा प्रश्न आहे. ४५ हजार कोटी सर्व विभागांचे व पश्चिम वाहिन्यांचे पाणी मराठवाड्याला मिळावे, यासाठी १४ हजार ४० कोटींच्या स्वतंत्र तरतुदीसह सुमारे ५९ हजार कोटींचे ते पॅकेज होते.

१४ हजार ४० कोटींची स्वतंत्र तरतूद मराठवाड्याला पश्चिमी वाहिन्यांतून पाण्यासाठी १४ हजार ४० कोटींची तरतूद केल्याची घोषणा करण्यात आली; परंतु याबाबत अद्याप काहीही हालचाल नसल्याचे सूत्रांनी सांगितले.    

या घोषणा बजेटमध्ये कधी येणार? जलसंपदा विभागाला २१ हजार ५८० कोटी २४ लाख, तर सार्वजनिक बांधकामाला १२ हजार ९३८ कोटी ८५ लाख रुपयांची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीत केली. ४५ पैकी ३४ हजार ५१८ कोटी या दोन विभागांसाठीच दिले आहेत. उर्वरित १० हजार ४८२ पैकी ७ हजार ८६ कोटी जिल्हानिहाय विविध योजनांसाठी घोषित केले आहेत. ३,३९६ कोटी इतर कामांसाठी आहेत. 

जलसंपदाचा मागील अनुशेष अद्याप भरून निघालेला नाही, तर बांधकाम विभागाचे सुमारे ५ हजार कोटींचे देणे शिल्लक आहे. त्यातच नव्याने केलेल्या घोषणा जिल्हा, हेडनिहाय राज्याच्या अर्थसंकल्पात घेऊन त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम सरकार कधी हाती घेणार? असा प्रश्न आहे.