शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

चिंताजनक! मराठवाड्यात महिनाभरात ६८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 06:49 IST

अवकाळीच्या फटक्यानंतर उचलले पाऊल

औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्टोबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या खरीप हंगामातील पिकांची माती झाली. या अवस्थेमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे १४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या काळात ६८ शेतकऱ्यांनी जीवन संपविले.यंदाच्या दहा महिन्यांमध्ये मराठवाड्यात ७४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. मराठवाड्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने ४१ लाख हेक्टरवरील खरीप हंगामातील कापणीला आलेले पीक हिरावून नेले. मका, सोयाबीन, कापूस व इतर कडधान्यांच्या पिकांचा अतिपावसामुळे चिखल झाला.या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या जगण्याचे गणितच बिघडले. कोरड्या दुष्काळानंतर गारपिटीचा फटका, तर अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान यामुळे शेतकरी कर्जमुक्त होण्याऐवजी कर्जबाजारी होत चालला आहे. कर्ज फेडावे कसे, या चक्रव्यूहात शेतकरी अडकला आहे. त्यामुळे हताश व निराश होऊन मराठवाड्यातील ६८ शेतकऱ्यांनी १४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत आत्महत्या केल्या.बीड जिल्ह्यात सर्वाधिकबीड जिल्ह्यात या महिनाभरात सर्वाधिक १६ जणांनी आत्महत्या केल्या. औरंगाबाद जिल्ह्यात ९, जालना जिल्ह्यात ६, परभणीत ११, हिंगोलीमध्ये ४, नांदेड १२, लातूर ७ तर उस्मानाबाद जिल्ह्यात ३ शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालावरून स्पष्ट होते.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या