शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

चिंताजनक! मराठवाड्यात महिनाभरात ६८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 06:49 IST

अवकाळीच्या फटक्यानंतर उचलले पाऊल

औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्टोबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या खरीप हंगामातील पिकांची माती झाली. या अवस्थेमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे १४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या काळात ६८ शेतकऱ्यांनी जीवन संपविले.यंदाच्या दहा महिन्यांमध्ये मराठवाड्यात ७४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. मराठवाड्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने ४१ लाख हेक्टरवरील खरीप हंगामातील कापणीला आलेले पीक हिरावून नेले. मका, सोयाबीन, कापूस व इतर कडधान्यांच्या पिकांचा अतिपावसामुळे चिखल झाला.या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या जगण्याचे गणितच बिघडले. कोरड्या दुष्काळानंतर गारपिटीचा फटका, तर अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान यामुळे शेतकरी कर्जमुक्त होण्याऐवजी कर्जबाजारी होत चालला आहे. कर्ज फेडावे कसे, या चक्रव्यूहात शेतकरी अडकला आहे. त्यामुळे हताश व निराश होऊन मराठवाड्यातील ६८ शेतकऱ्यांनी १४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत आत्महत्या केल्या.बीड जिल्ह्यात सर्वाधिकबीड जिल्ह्यात या महिनाभरात सर्वाधिक १६ जणांनी आत्महत्या केल्या. औरंगाबाद जिल्ह्यात ९, जालना जिल्ह्यात ६, परभणीत ११, हिंगोलीमध्ये ४, नांदेड १२, लातूर ७ तर उस्मानाबाद जिल्ह्यात ३ शेतकºयांनी आत्महत्या केल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालावरून स्पष्ट होते.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या