शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

राज्यात २९३ शाळा चक्क विद्यार्थ्यांविना; १ ते १० पटाच्या शाळांची संख्या ७ हजारांवर

By सीमा महांगडे | Updated: June 18, 2023 07:00 IST

राज्यभरात तब्बल २९३ शाळांमध्ये एकही विद्यार्थी शिकण्यासाठी येत नाही. तर सात हजार शाळांमधील विद्यार्थी संख्या केवळ १ ते १० या पटीत आहे.

मुंबई : एकीकडे राज्यभरात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीची चर्चा जोर धरत असताना दुसरीकडे मात्र शाळांच्या विद्यार्थीसंख्येचे भयाण चित्र समोर आले आहे. राज्यभरात तब्बल २९३ शाळांमध्ये एकही विद्यार्थी शिकण्यासाठी येत नाही. तर सात हजार शाळांमधील विद्यार्थी संख्या केवळ १ ते १० या पटीत आहे. यु-डायस प्लस अहवालातून शिक्षणाचे हे झणझणीत वास्तव समोर आले आहे. 

शिक्षण आयुक्तांना सूचना शिक्षण आयुक्त कार्यालयाने ० ते १० पटसंख्येच्या शाळांतील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करून जून अखेरपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्य प्रकल्प संचालकांना दिल्या आहेत. या माहितीमध्ये विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, विद्यार्थी दुसऱ्या शाळेत नोंदविला आहे वा कसे, विद्यार्थ्यास शासकीय योजनेच्या लाभ देण्यात येत आहे वा नाही ही माहिती सादर द्यायची आहे. 

यु-डायस  काय आहे?यु-डायस ही प्रणाली केंद्र सरकारतर्फे कार्यान्वित करण्यात आली आहे. याद्वारे पहिली ते १२ वीपर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या, माध्यमांच्या अभ्यासक्रमांच्या अनधिकृत, मान्यता नसलेल्या शाळांची माहिती संकलित करून संगणकीकृत करण्यात येते. अंतिम माहिती प्राथमिक शिक्षण परिषदेकडे पाठवली जाते.

अचूक माहिती भरणे आवश्यक का? राज्यातील सर्व शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांची माहिती यु-डायस प्लस सन २०२२-२३ मध्ये सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. यु-डायस प्लस माहितीच्या आधारे भारत सरकारकडून विविध योजनांचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी, पीजीआय (परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्स), एसइक्यूआय निर्देशांक काढण्यासाठी या माहितीचा उपयोग होतो.

टॅग्स :Studentविद्यार्थी