शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

राज्यात २९३ शाळा चक्क विद्यार्थ्यांविना; १ ते १० पटाच्या शाळांची संख्या ७ हजारांवर

By सीमा महांगडे | Updated: June 18, 2023 07:00 IST

राज्यभरात तब्बल २९३ शाळांमध्ये एकही विद्यार्थी शिकण्यासाठी येत नाही. तर सात हजार शाळांमधील विद्यार्थी संख्या केवळ १ ते १० या पटीत आहे.

मुंबई : एकीकडे राज्यभरात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीची चर्चा जोर धरत असताना दुसरीकडे मात्र शाळांच्या विद्यार्थीसंख्येचे भयाण चित्र समोर आले आहे. राज्यभरात तब्बल २९३ शाळांमध्ये एकही विद्यार्थी शिकण्यासाठी येत नाही. तर सात हजार शाळांमधील विद्यार्थी संख्या केवळ १ ते १० या पटीत आहे. यु-डायस प्लस अहवालातून शिक्षणाचे हे झणझणीत वास्तव समोर आले आहे. 

शिक्षण आयुक्तांना सूचना शिक्षण आयुक्त कार्यालयाने ० ते १० पटसंख्येच्या शाळांतील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करून जून अखेरपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्य प्रकल्प संचालकांना दिल्या आहेत. या माहितीमध्ये विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, विद्यार्थी दुसऱ्या शाळेत नोंदविला आहे वा कसे, विद्यार्थ्यास शासकीय योजनेच्या लाभ देण्यात येत आहे वा नाही ही माहिती सादर द्यायची आहे. 

यु-डायस  काय आहे?यु-डायस ही प्रणाली केंद्र सरकारतर्फे कार्यान्वित करण्यात आली आहे. याद्वारे पहिली ते १२ वीपर्यंत शिक्षण देणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या, माध्यमांच्या अभ्यासक्रमांच्या अनधिकृत, मान्यता नसलेल्या शाळांची माहिती संकलित करून संगणकीकृत करण्यात येते. अंतिम माहिती प्राथमिक शिक्षण परिषदेकडे पाठवली जाते.

अचूक माहिती भरणे आवश्यक का? राज्यातील सर्व शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांची माहिती यु-डायस प्लस सन २०२२-२३ मध्ये सादर करणे अत्यंत आवश्यक आहे. यु-डायस प्लस माहितीच्या आधारे भारत सरकारकडून विविध योजनांचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी, पीजीआय (परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्स), एसइक्यूआय निर्देशांक काढण्यासाठी या माहितीचा उपयोग होतो.

टॅग्स :Studentविद्यार्थी