शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

२९ वर्षांत नक्षलवाद्यांनी केल्या ४९३ हत्या

By admin | Updated: August 4, 2014 00:49 IST

अतिदुर्गम भागातील भोळ्या-भाबड्या आदिवासींचे अज्ञान आणि मागासलेपणाचा फायदा घेत सशस्त्र क्रांतीतून सत्ता परिवर्तनाची स्वप्ने पाहणाऱ्या नक्षलवाद्यांनी २९ वर्षाच्या कालावधीत ४९३ निरपराध

गडचिरोली : अतिदुर्गम भागातील भोळ्या-भाबड्या आदिवासींचे अज्ञान आणि मागासलेपणाचा फायदा घेत सशस्त्र क्रांतीतून सत्ता परिवर्तनाची स्वप्ने पाहणाऱ्या नक्षलवाद्यांनी २९ वर्षाच्या कालावधीत ४९३ निरपराध नागरिकांची अतिशय क्रूरपणे हत्या केली आहे. सर्वाधिक नक्षल प्रभावित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ४५१, गोंदिया जिल्ह्यात ३३ आणि चंद्रपूर जिल्ह्यात ९ अशा एकूण ४९३ निरपराधांनी जीव गमावला आहे.गडचिरोली जिल्ह्यात दहशत निर्माण करण्यासाठी नक्षलवाद्यांनी ३ आॅक्टोबर १९८२ रोजी सिरोंचा तालुक्यातील आमडेली येथील शिक्षक नारायण राजू मास्टर यांचे दोन्ही हात कापले. पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून १ फेब्रुवारी १९८५ रोजी पहिल्या निरपराध व्यक्तिची हत्या केली. भामरागड तालुक्यातील धोडराज येथील रामदास पुंगाटी असे या दुर्दैवी आदिवासी तरुणाचे नाव. गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास होऊ नये, यासाठी नक्षलवाद्यांनी सरपंचांनाही आपले लक्ष्य बनविले. अहेरी तालुक्यातील खांदला गावचे सरपंच गंगाराम आत्राम यांची नक्षल्यांनी १३ फेब्रुवारी १९८८ रोजी हत्या केली. नक्षल्यांचे बळी पडलेले आत्राम हे पहिले सरपंच आहेत. आतापर्यंत नक्षल्यांनी ९ सरपंच व एका माजी सरपंचाची हत्या केली. नक्षल चळवळीत आपण भरकटलो गेलो, आपली फसवणूक झाली ही बाब लक्षात आल्यावर विकासाच्या मुख्य प्रवाहात जे नक्षलवादी सहभागी झाले, ज्यांनी आत्मसमर्पण केले अशा १४ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचीही हत्या केली. शिक्षकांनाही नक्षल्यांनी आपले बळी बनविले. गावपातळीवर तलाठी आणि पोलिस पाटलांना मदत करणाऱ्या कोतवालांचीसुध्दा हत्या केली. गावाची कायदा व सुव्यवस्था पाहणारे २४ पोलीस पाटील आणि ५ माजी पोलीस पाटलांना देखील नक्षल्यांनी ठार मारले. शासनाच्या विकास कामाचे कंत्राट घेऊन अतिदुर्गम भागात रस्ते, इमारती आणि पुलांची निर्मिती करणाऱ्या कंत्राटदारांनाही नक्षल्यांनी आपले लक्ष्य बनविले. ५ मे २०११ रोजी लग्न प्रसंगाला उपस्थित राहण्यासाठी छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथून चंद्रपूरकडे जाणाऱ्या वाहनाला नक्षल्यांनी गडचिरोली-धानोरा दरम्यान भूसुरुंग स्फोटात उडविले. यात सहा लग्न वऱ्हाडी ठार झाले. याशिवाय जिल्ह्यातील आठ महिलांचीही नक्षल्यांनी हत्या केली आहे. पोलिस भरतीसाठी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर गेलेल्या सहा युवकांचीही नक्षल्यांनी हत्या केली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी असलेल्या अनेकांना आपले लक्ष केले. आपली माहिती गावातील नागरिक पोलिसांना देत असावेत, या संशयातून २०६ सामान्य नागरिकांना तर आपली दहशत कायम राहावी, या कारणाने १८८ नागरिकांना ठार मारले. गडचिरोली जिल्ह्यात १ फेब्रुवारी १९८५ ते ३१ जुलै २०१४ या कालावधीत नक्षलवाद्यांनी हे हत्यासत्र केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)