शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

२९ वर्षांत नक्षलवाद्यांनी केल्या ४९३ हत्या

By admin | Updated: August 4, 2014 00:49 IST

अतिदुर्गम भागातील भोळ्या-भाबड्या आदिवासींचे अज्ञान आणि मागासलेपणाचा फायदा घेत सशस्त्र क्रांतीतून सत्ता परिवर्तनाची स्वप्ने पाहणाऱ्या नक्षलवाद्यांनी २९ वर्षाच्या कालावधीत ४९३ निरपराध

गडचिरोली : अतिदुर्गम भागातील भोळ्या-भाबड्या आदिवासींचे अज्ञान आणि मागासलेपणाचा फायदा घेत सशस्त्र क्रांतीतून सत्ता परिवर्तनाची स्वप्ने पाहणाऱ्या नक्षलवाद्यांनी २९ वर्षाच्या कालावधीत ४९३ निरपराध नागरिकांची अतिशय क्रूरपणे हत्या केली आहे. सर्वाधिक नक्षल प्रभावित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ४५१, गोंदिया जिल्ह्यात ३३ आणि चंद्रपूर जिल्ह्यात ९ अशा एकूण ४९३ निरपराधांनी जीव गमावला आहे.गडचिरोली जिल्ह्यात दहशत निर्माण करण्यासाठी नक्षलवाद्यांनी ३ आॅक्टोबर १९८२ रोजी सिरोंचा तालुक्यातील आमडेली येथील शिक्षक नारायण राजू मास्टर यांचे दोन्ही हात कापले. पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून १ फेब्रुवारी १९८५ रोजी पहिल्या निरपराध व्यक्तिची हत्या केली. भामरागड तालुक्यातील धोडराज येथील रामदास पुंगाटी असे या दुर्दैवी आदिवासी तरुणाचे नाव. गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास होऊ नये, यासाठी नक्षलवाद्यांनी सरपंचांनाही आपले लक्ष्य बनविले. अहेरी तालुक्यातील खांदला गावचे सरपंच गंगाराम आत्राम यांची नक्षल्यांनी १३ फेब्रुवारी १९८८ रोजी हत्या केली. नक्षल्यांचे बळी पडलेले आत्राम हे पहिले सरपंच आहेत. आतापर्यंत नक्षल्यांनी ९ सरपंच व एका माजी सरपंचाची हत्या केली. नक्षल चळवळीत आपण भरकटलो गेलो, आपली फसवणूक झाली ही बाब लक्षात आल्यावर विकासाच्या मुख्य प्रवाहात जे नक्षलवादी सहभागी झाले, ज्यांनी आत्मसमर्पण केले अशा १४ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचीही हत्या केली. शिक्षकांनाही नक्षल्यांनी आपले बळी बनविले. गावपातळीवर तलाठी आणि पोलिस पाटलांना मदत करणाऱ्या कोतवालांचीसुध्दा हत्या केली. गावाची कायदा व सुव्यवस्था पाहणारे २४ पोलीस पाटील आणि ५ माजी पोलीस पाटलांना देखील नक्षल्यांनी ठार मारले. शासनाच्या विकास कामाचे कंत्राट घेऊन अतिदुर्गम भागात रस्ते, इमारती आणि पुलांची निर्मिती करणाऱ्या कंत्राटदारांनाही नक्षल्यांनी आपले लक्ष्य बनविले. ५ मे २०११ रोजी लग्न प्रसंगाला उपस्थित राहण्यासाठी छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथून चंद्रपूरकडे जाणाऱ्या वाहनाला नक्षल्यांनी गडचिरोली-धानोरा दरम्यान भूसुरुंग स्फोटात उडविले. यात सहा लग्न वऱ्हाडी ठार झाले. याशिवाय जिल्ह्यातील आठ महिलांचीही नक्षल्यांनी हत्या केली आहे. पोलिस भरतीसाठी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर गेलेल्या सहा युवकांचीही नक्षल्यांनी हत्या केली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी असलेल्या अनेकांना आपले लक्ष केले. आपली माहिती गावातील नागरिक पोलिसांना देत असावेत, या संशयातून २०६ सामान्य नागरिकांना तर आपली दहशत कायम राहावी, या कारणाने १८८ नागरिकांना ठार मारले. गडचिरोली जिल्ह्यात १ फेब्रुवारी १९८५ ते ३१ जुलै २०१४ या कालावधीत नक्षलवाद्यांनी हे हत्यासत्र केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)