शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२९ वर्षांत नक्षलवाद्यांनी केल्या ४९३ हत्या

By admin | Updated: August 4, 2014 00:49 IST

अतिदुर्गम भागातील भोळ्या-भाबड्या आदिवासींचे अज्ञान आणि मागासलेपणाचा फायदा घेत सशस्त्र क्रांतीतून सत्ता परिवर्तनाची स्वप्ने पाहणाऱ्या नक्षलवाद्यांनी २९ वर्षाच्या कालावधीत ४९३ निरपराध

गडचिरोली : अतिदुर्गम भागातील भोळ्या-भाबड्या आदिवासींचे अज्ञान आणि मागासलेपणाचा फायदा घेत सशस्त्र क्रांतीतून सत्ता परिवर्तनाची स्वप्ने पाहणाऱ्या नक्षलवाद्यांनी २९ वर्षाच्या कालावधीत ४९३ निरपराध नागरिकांची अतिशय क्रूरपणे हत्या केली आहे. सर्वाधिक नक्षल प्रभावित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ४५१, गोंदिया जिल्ह्यात ३३ आणि चंद्रपूर जिल्ह्यात ९ अशा एकूण ४९३ निरपराधांनी जीव गमावला आहे.गडचिरोली जिल्ह्यात दहशत निर्माण करण्यासाठी नक्षलवाद्यांनी ३ आॅक्टोबर १९८२ रोजी सिरोंचा तालुक्यातील आमडेली येथील शिक्षक नारायण राजू मास्टर यांचे दोन्ही हात कापले. पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून १ फेब्रुवारी १९८५ रोजी पहिल्या निरपराध व्यक्तिची हत्या केली. भामरागड तालुक्यातील धोडराज येथील रामदास पुंगाटी असे या दुर्दैवी आदिवासी तरुणाचे नाव. गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास होऊ नये, यासाठी नक्षलवाद्यांनी सरपंचांनाही आपले लक्ष्य बनविले. अहेरी तालुक्यातील खांदला गावचे सरपंच गंगाराम आत्राम यांची नक्षल्यांनी १३ फेब्रुवारी १९८८ रोजी हत्या केली. नक्षल्यांचे बळी पडलेले आत्राम हे पहिले सरपंच आहेत. आतापर्यंत नक्षल्यांनी ९ सरपंच व एका माजी सरपंचाची हत्या केली. नक्षल चळवळीत आपण भरकटलो गेलो, आपली फसवणूक झाली ही बाब लक्षात आल्यावर विकासाच्या मुख्य प्रवाहात जे नक्षलवादी सहभागी झाले, ज्यांनी आत्मसमर्पण केले अशा १४ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचीही हत्या केली. शिक्षकांनाही नक्षल्यांनी आपले बळी बनविले. गावपातळीवर तलाठी आणि पोलिस पाटलांना मदत करणाऱ्या कोतवालांचीसुध्दा हत्या केली. गावाची कायदा व सुव्यवस्था पाहणारे २४ पोलीस पाटील आणि ५ माजी पोलीस पाटलांना देखील नक्षल्यांनी ठार मारले. शासनाच्या विकास कामाचे कंत्राट घेऊन अतिदुर्गम भागात रस्ते, इमारती आणि पुलांची निर्मिती करणाऱ्या कंत्राटदारांनाही नक्षल्यांनी आपले लक्ष्य बनविले. ५ मे २०११ रोजी लग्न प्रसंगाला उपस्थित राहण्यासाठी छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथून चंद्रपूरकडे जाणाऱ्या वाहनाला नक्षल्यांनी गडचिरोली-धानोरा दरम्यान भूसुरुंग स्फोटात उडविले. यात सहा लग्न वऱ्हाडी ठार झाले. याशिवाय जिल्ह्यातील आठ महिलांचीही नक्षल्यांनी हत्या केली आहे. पोलिस भरतीसाठी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर गेलेल्या सहा युवकांचीही नक्षल्यांनी हत्या केली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी असलेल्या अनेकांना आपले लक्ष केले. आपली माहिती गावातील नागरिक पोलिसांना देत असावेत, या संशयातून २०६ सामान्य नागरिकांना तर आपली दहशत कायम राहावी, या कारणाने १८८ नागरिकांना ठार मारले. गडचिरोली जिल्ह्यात १ फेब्रुवारी १९८५ ते ३१ जुलै २०१४ या कालावधीत नक्षलवाद्यांनी हे हत्यासत्र केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)