शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

"जेवण वाढा, मी आलोच..." वडिलांशी फोनवर अखेरचं बोलणं; काही क्षणातच युवकाचा दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 19:41 IST

ही बातमी समजताच रूग्णालय परिसरात नातेवाईक, मित्र व परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. चंद्रवदनच्या पश्चात पत्नी, आई, वडील, बहीण आणि काका असा मोठा परिवार आहे

रत्नागिरी - तालुक्यातील नाखरे येथे बुधवारी अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात २९ वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चंद्रवदन शिंदे दसूरकर असं या तरूणाचं नाव असून तो नाखरे इथला रहिवासी होता. तो घरी जात असताना घरापासून एक किलोमीटर अंतरावर ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

माहितीनुसार, चंद्रवदन पावस येथून आपल्या नाखरे येथील घरी दुचाकीवरून जात होता. पावस ते नाखरे या रस्त्यावरील खांबडवाडी परिसरात त्याच्या दुचाकीची इको वाहनाशी जोरदार टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की, चंद्रवदनचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळावरून त्याचे घर अवघ्या १ किलोमीटर अंतरावर होते. चंद्रवदन हा एक बहुआयामी व्यक्तिमत्वाचा तरूण होता. त्याला ट्रेकिंगची प्रचंड आवाड होती आणि तो एक यशस्वी आंबा व्यावसायिक म्हणूनही ओळखला जात होता.

चंद्रवदनने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले होते. १ महिन्यापूर्वीच त्याचे लग्न झाले. नवविवाहित असलेल्या चंद्रवदनच्या अकाली निधनानंतर त्याच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर त्याचे पार्थिव जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. ही बातमी समजताच रूग्णालय परिसरात नातेवाईक, मित्र व परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. चंद्रवदनच्या पश्चात पत्नी, आई, वडील, बहीण आणि काका असा मोठा परिवार आहे. 

या अपघातामुळे पावस नाखरे रस्त्यावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक प्रशासनने या घटनेची दखल घेत चौकशी सुरू केली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचं काम सुरू आहे. नाखरे गावच्या पोलीस पाटलांनी या अपघाताची माहिती चंद्रवदनच्या वडिलांना दिली. घर जवळच असल्याने ते आणि चंद्रवदनची पत्नी लगेचच घटनास्थळी पोहचले आणि त्यांना चंद्रवदनचा धक्कादायक अपघात दिसला. 

जेवण वाढा, मी आलोच...

चंद्रवदन पावसहून निघाल्यानंतर त्याला वडिलांचा फोन आला. घरी कधी येतो आहेत असं त्यांनी विचारले. मी वाटेतच आहे. जेवायला वाढा, मी येतोच लगेच असं चंद्रवदन याने वडिलांना सांगितले. मात्र घराच्या १ किमी अंतरावर झालेल्या दुर्दैवी अपघातात तो निधन पावला. त्यामुळे मृत्यूआधी चंद्रवदनचं त्याच्या वडिलांशी अखेरचं फोनवर बोलणं झाले.  

टॅग्स :Accidentअपघात