शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील पाच जिल्ह्यांना २८४३ कोटी, आपत्ती निवारणासाठी निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 05:31 IST

गेल्या अडीच वर्षातील सरकारने नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांसाठी कुठलाच निधी दिला नव्हता.

रत्नागिरी : नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी रत्नागिरीसह पाच जिल्ह्यांसाठी २,८४३ कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी-रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यात ठाणे १८८ कोटी, पालघर २८३ कोटी, रायगड ९९६, रत्नागिरी ७०० कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ६७७ कोटी यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. 

सामंत म्हणाले, गेल्या अडीच वर्षातील सरकारने नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांसाठी कुठलाच निधी दिला नव्हता. मात्र आता कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आपत्ती निवारणासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला आहे. रायगड जिल्ह्याला मिळालेल्या ९९६ कोटींपैकी धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी १५० कोटी, बहुउद्देशीय निवारा केंद्रासाठी १५०, भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी ७०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेल्या निधीतून ही तीन प्रमुख कामे करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

डीपीडीसीचा निधी मंत्री सामंत म्हणाले की, यावर्षीचा नियतव्ययही वाढवून तो ३०० कोटींवर नेण्यात आला आहे. या व्यतिरिक्त ९ कोटी नगरविकासासाठी वाढवून दिले आहेत. त्यामुळे डीपीडीसीचे पैसे वाढले आहेत. या व्यतिरिक्त रत्नागिरी जिल्ह्याला आपत्कालीन निवारणासाठी ८०० रुपयांचा स्वतंत्र निधी मिळाला असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :konkanकोकण