शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

वन्यप्राण्यांकडून २८ जणांचा मृत्यू

By admin | Updated: February 26, 2015 00:10 IST

पाच जिल्ह्यांतील आकडेवारी : सन २००४ पासून कोल्हापूर विभागात ८० जण जखमी

गेल्या दहा वर्षांपासून हत्ती, बिबट्या, गवे अशा वन्य प्राण्यांचा वावर मानवी वसाहतीकडे वाढतो आहे. रविवारी (दि. २२) राधानगरी तालुक्यात हत्तीने एका शेतकऱ्याला सोंडेत पकडून आपटले. त्यामध्ये तो जखमी शेतकरी मृत्यूूशी झुंज देत आहे. वन्यप्राणी आणि मनुष्य असा टोकाचा संघर्ष ऐरणीवर आला आहे. म्हणूनच कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात कितीजणांना जीव गमवावा लागला, वन विभागाकडून कितीजणांवर गुन्हे दाखल केले, नुकसानभरपाई किती नाममात्र आहे, या अंगाने वेध घेणारी मालिका आजपासून... भीमगोंडा देसाई-कोल्हापूरकोल्हापूर वन विभागांतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांत २००४ पासून आतापर्यंत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात २८ जणांना जीव गमवावा लागला. एकूण ८० जण जखमी झाले. मृतांपैकी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १३ जणांना हत्तीने चिरडले आहे. उर्वरितांचा मृत्यू गवा, बिबट्या यांच्या हल्ल्यांत झाला आहे. अजूनही त्यांचा उपद्रव सुरूच आहे. विकासाच्या नावाखाली बेसुमार जंगलतोड होत आहे. स्वार्थासाठी जंगलांवर अतिक्रमण वाढते आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये जंगलांना आगी लावल्या जात आहेत. पर्यटनासाठी जंगलात घुसखोरी होत आहे. जंगले विरळ होत आहेत. या महत्त्वाच्या कारणांमुळे वन्य प्राण्यांची आश्रयस्थानेच उद्ध्वस्त होत आहेत. परिणामी हत्तींसह वन्य प्राण्यांनी मानवी वसाहतींकडे मोर्चा वळविला आहे.विभागातील या पाच जिल्ह्यांत सन २००४ पासून वन्यप्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे अधिक वाढला. पूर्वी सर्कशीमध्ये पाहावे लागणारे हत्ती गावामध्ये घुसू लागले. शेतकऱ्यांना त्यांचे सहज दर्शन होऊ लागले. जंगलाशेजारील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. कोणत्याही क्षणी हत्ती, बिबट्या, गव्याचा हल्ला होऊ शकत असल्यामुळे त्यांचे जगणेच भयकंपित झाले आहे.हल्ल्याच्या भीतीने जंगलालगत असलेल्या शेकडो एकर जमिनी कसणे शेतकऱ्यांनी बंद करून त्या पडिकच ठेवणे पसंत केले आहे. वन्य प्राण्यांना पूर्णपणे रोखण्यात वन विभागाला यश आलेले नाही. हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या दहांपैकी आठजणांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई दिली आहे. एका मृत व्यक्तीचा कायदेशीर वारस उपलब्ध नसल्याने भरपाई दिलेली नाही. आॅगस्ट २००६ मध्ये राधानगरी अभयारण्यामध्ये तस्कराच्या हल्ल्यात मृत झालेल्या वनमजुराच्या वारसांना वन्यजीव विभागाकडून दोन लाख देण्यात आले आहेत. जखमी २३ जणांना ६ लाख ७० हजार रुपये भरपाई देण्यात आली आहे. (क्रमश:) दोन जिल्ह्यांतील स्थितीसन २००४ पासून २०१४ अखेर हत्तींच्या हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, गडहिंग्लज, राधानगरी या तालुक्यांतील पाचजणांचा, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, कुडाळ, सावंतवाडी या भागांतील आठजणांचा मृत्यू झाला आहे. सन २०१० पासून आतापर्यंत बिबट्या, गवा अशा वन्यप्राण्यांकडून कोल्हापूर जिल्ह्यातील ११, सातारा जिल्ह्यातील दोन, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील प्रत्येकी एक अशा १५ जणांचा मृत्यू झाला आहे.वन्य प्राणी मानव संघर्ष भाग १