शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

वन्यप्राण्यांकडून २८ जणांचा मृत्यू

By admin | Updated: February 26, 2015 00:10 IST

पाच जिल्ह्यांतील आकडेवारी : सन २००४ पासून कोल्हापूर विभागात ८० जण जखमी

गेल्या दहा वर्षांपासून हत्ती, बिबट्या, गवे अशा वन्य प्राण्यांचा वावर मानवी वसाहतीकडे वाढतो आहे. रविवारी (दि. २२) राधानगरी तालुक्यात हत्तीने एका शेतकऱ्याला सोंडेत पकडून आपटले. त्यामध्ये तो जखमी शेतकरी मृत्यूूशी झुंज देत आहे. वन्यप्राणी आणि मनुष्य असा टोकाचा संघर्ष ऐरणीवर आला आहे. म्हणूनच कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात कितीजणांना जीव गमवावा लागला, वन विभागाकडून कितीजणांवर गुन्हे दाखल केले, नुकसानभरपाई किती नाममात्र आहे, या अंगाने वेध घेणारी मालिका आजपासून... भीमगोंडा देसाई-कोल्हापूरकोल्हापूर वन विभागांतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांत २००४ पासून आतापर्यंत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात २८ जणांना जीव गमवावा लागला. एकूण ८० जण जखमी झाले. मृतांपैकी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १३ जणांना हत्तीने चिरडले आहे. उर्वरितांचा मृत्यू गवा, बिबट्या यांच्या हल्ल्यांत झाला आहे. अजूनही त्यांचा उपद्रव सुरूच आहे. विकासाच्या नावाखाली बेसुमार जंगलतोड होत आहे. स्वार्थासाठी जंगलांवर अतिक्रमण वाढते आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये जंगलांना आगी लावल्या जात आहेत. पर्यटनासाठी जंगलात घुसखोरी होत आहे. जंगले विरळ होत आहेत. या महत्त्वाच्या कारणांमुळे वन्य प्राण्यांची आश्रयस्थानेच उद्ध्वस्त होत आहेत. परिणामी हत्तींसह वन्य प्राण्यांनी मानवी वसाहतींकडे मोर्चा वळविला आहे.विभागातील या पाच जिल्ह्यांत सन २००४ पासून वन्यप्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे अधिक वाढला. पूर्वी सर्कशीमध्ये पाहावे लागणारे हत्ती गावामध्ये घुसू लागले. शेतकऱ्यांना त्यांचे सहज दर्शन होऊ लागले. जंगलाशेजारील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. कोणत्याही क्षणी हत्ती, बिबट्या, गव्याचा हल्ला होऊ शकत असल्यामुळे त्यांचे जगणेच भयकंपित झाले आहे.हल्ल्याच्या भीतीने जंगलालगत असलेल्या शेकडो एकर जमिनी कसणे शेतकऱ्यांनी बंद करून त्या पडिकच ठेवणे पसंत केले आहे. वन्य प्राण्यांना पूर्णपणे रोखण्यात वन विभागाला यश आलेले नाही. हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या दहांपैकी आठजणांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई दिली आहे. एका मृत व्यक्तीचा कायदेशीर वारस उपलब्ध नसल्याने भरपाई दिलेली नाही. आॅगस्ट २००६ मध्ये राधानगरी अभयारण्यामध्ये तस्कराच्या हल्ल्यात मृत झालेल्या वनमजुराच्या वारसांना वन्यजीव विभागाकडून दोन लाख देण्यात आले आहेत. जखमी २३ जणांना ६ लाख ७० हजार रुपये भरपाई देण्यात आली आहे. (क्रमश:) दोन जिल्ह्यांतील स्थितीसन २००४ पासून २०१४ अखेर हत्तींच्या हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, गडहिंग्लज, राधानगरी या तालुक्यांतील पाचजणांचा, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, कुडाळ, सावंतवाडी या भागांतील आठजणांचा मृत्यू झाला आहे. सन २०१० पासून आतापर्यंत बिबट्या, गवा अशा वन्यप्राण्यांकडून कोल्हापूर जिल्ह्यातील ११, सातारा जिल्ह्यातील दोन, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील प्रत्येकी एक अशा १५ जणांचा मृत्यू झाला आहे.वन्य प्राणी मानव संघर्ष भाग १