शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाराष्ट्रात २७.५५ टक्के कृमीदोष

By admin | Updated: February 10, 2017 04:30 IST

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात १ ते १४ वयोगटातील जवळपास ६८ टक्के मुले असून, त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यामध्ये वाढणाऱ्या परजीवी

जयंत धुळप , अलिबागजागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात १ ते १४ वयोगटातील जवळपास ६८ टक्के मुले असून, त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यामध्ये वाढणाऱ्या परजीवी जंतूपासून धोका आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमीदोषाचे प्रमाण महाराष्ट्रात २७.५५ टक्के आहे. बालकांमधील कृमीदोष नष्ट करून निरोगी आणि सशक्त पिढी तयार करण्याच्या उद्देशाने १० फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय जंतनाशक दिन’ म्हणून देशभरात पाळण्यात येतो. या दिवशी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देण्याचा कार्यक्र म राबविण्यात येतो. भारतात ६ ते ५९ महिन्यांच्या वयोगटातील प्रत्येकी १० बालकांमागे ७ बालकांमध्ये रक्तक्षय आढळतो. १५ ते १९ वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमीदोष हा रक्ताक्षय आणि कुपोषण यामुळे होतो. कृमीदोषामुळे बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटली जाते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन वर्षातून दोनदा राबविण्याचे नियोजन आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा १ ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषणस्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिन १० फेब्रुवारी रोजी राबविण्यात येत असून, या दिनानिमित्त १ ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना, शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देण्याचा कार्यक्र म जिल्हास्तरावर प्रभावीपणे राबवावा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी गुरुवारी जंतनाशक दिन आयोजन आढावा बैठकीत दिल्या आहेत. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. जगदीश देवकर, जिल्हा परिषद व जिल्हा रु ग्णालय येथील पी.एच.एन., जिल्हा शिक्षण अधिकारी रायगड जिल्हा परिषद तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जंतनाशक गोळ्या देण्यासंदर्भात कोणती काळजी घ्यावी याबाबत डॉ. गवळी यांनी मार्गदर्शन केले. सर्व ठिकाणी आवश्यक तो गोळ्यांचा पुरवठा करावा. सर्व लाभधारकांना गोळ्यांचा डोस दिला जाईल याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.