शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात २७.५५ टक्के कृमीदोष

By admin | Updated: February 10, 2017 04:30 IST

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात १ ते १४ वयोगटातील जवळपास ६८ टक्के मुले असून, त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यामध्ये वाढणाऱ्या परजीवी

जयंत धुळप , अलिबागजागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात १ ते १४ वयोगटातील जवळपास ६८ टक्के मुले असून, त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यामध्ये वाढणाऱ्या परजीवी जंतूपासून धोका आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमीदोषाचे प्रमाण महाराष्ट्रात २७.५५ टक्के आहे. बालकांमधील कृमीदोष नष्ट करून निरोगी आणि सशक्त पिढी तयार करण्याच्या उद्देशाने १० फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय जंतनाशक दिन’ म्हणून देशभरात पाळण्यात येतो. या दिवशी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देण्याचा कार्यक्र म राबविण्यात येतो. भारतात ६ ते ५९ महिन्यांच्या वयोगटातील प्रत्येकी १० बालकांमागे ७ बालकांमध्ये रक्तक्षय आढळतो. १५ ते १९ वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमीदोष हा रक्ताक्षय आणि कुपोषण यामुळे होतो. कृमीदोषामुळे बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटली जाते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन वर्षातून दोनदा राबविण्याचे नियोजन आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा १ ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषणस्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिन १० फेब्रुवारी रोजी राबविण्यात येत असून, या दिनानिमित्त १ ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना, शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देण्याचा कार्यक्र म जिल्हास्तरावर प्रभावीपणे राबवावा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी गुरुवारी जंतनाशक दिन आयोजन आढावा बैठकीत दिल्या आहेत. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. जगदीश देवकर, जिल्हा परिषद व जिल्हा रु ग्णालय येथील पी.एच.एन., जिल्हा शिक्षण अधिकारी रायगड जिल्हा परिषद तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जंतनाशक गोळ्या देण्यासंदर्भात कोणती काळजी घ्यावी याबाबत डॉ. गवळी यांनी मार्गदर्शन केले. सर्व ठिकाणी आवश्यक तो गोळ्यांचा पुरवठा करावा. सर्व लाभधारकांना गोळ्यांचा डोस दिला जाईल याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.