शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

महाराष्ट्रात २७.५५ टक्के कृमीदोष

By admin | Updated: February 10, 2017 04:30 IST

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात १ ते १४ वयोगटातील जवळपास ६८ टक्के मुले असून, त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यामध्ये वाढणाऱ्या परजीवी

जयंत धुळप , अलिबागजागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात १ ते १४ वयोगटातील जवळपास ६८ टक्के मुले असून, त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यामध्ये वाढणाऱ्या परजीवी जंतूपासून धोका आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमीदोषाचे प्रमाण महाराष्ट्रात २७.५५ टक्के आहे. बालकांमधील कृमीदोष नष्ट करून निरोगी आणि सशक्त पिढी तयार करण्याच्या उद्देशाने १० फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय जंतनाशक दिन’ म्हणून देशभरात पाळण्यात येतो. या दिवशी १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देण्याचा कार्यक्र म राबविण्यात येतो. भारतात ६ ते ५९ महिन्यांच्या वयोगटातील प्रत्येकी १० बालकांमागे ७ बालकांमध्ये रक्तक्षय आढळतो. १५ ते १९ वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमीदोष हा रक्ताक्षय आणि कुपोषण यामुळे होतो. कृमीदोषामुळे बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटली जाते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन वर्षातून दोनदा राबविण्याचे नियोजन आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा १ ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषणस्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिन १० फेब्रुवारी रोजी राबविण्यात येत असून, या दिनानिमित्त १ ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना, शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देण्याचा कार्यक्र म जिल्हास्तरावर प्रभावीपणे राबवावा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी गुरुवारी जंतनाशक दिन आयोजन आढावा बैठकीत दिल्या आहेत. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. जगदीश देवकर, जिल्हा परिषद व जिल्हा रु ग्णालय येथील पी.एच.एन., जिल्हा शिक्षण अधिकारी रायगड जिल्हा परिषद तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जंतनाशक गोळ्या देण्यासंदर्भात कोणती काळजी घ्यावी याबाबत डॉ. गवळी यांनी मार्गदर्शन केले. सर्व ठिकाणी आवश्यक तो गोळ्यांचा पुरवठा करावा. सर्व लाभधारकांना गोळ्यांचा डोस दिला जाईल याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.