शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

राज्यात गेल्या वर्षी २,७०६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 10:32 IST

अमरावती जिल्ह्यात २,८५६ शेतकऱ्यांची आत्महत्या

मुंबई : राज्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या एका वर्षात विदर्भ आणि मराठवाड्यातील २,७०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील) यांनी दिली. अमरावती विभागामध्ये १,०६९ आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये ९५२ शेतकऱ्यांनी हवामान बदल, ओला, कोरडा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा या कारणांमुळे आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेत आ. शिवाजीराव गर्जे, आ. अमोल मिटकरी आदी सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरामध्ये मंत्री पाटील यांनी ही माहिती दिली. बीड जिल्ह्यात २०५, अमरावती जिल्ह्यात २००, अकोला जिल्ह्यात १६८, तर वर्धा जिल्ह्यात ११२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या २,७०६ प्रकरणांपैकी १,५६३ प्रकरणे पात्र ठरली आहेत. १,१०१ शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेशाद्वारे ३० हजार आणि बँकेच्या मासिक प्राप्ती योजनेमधून ७० हजार रुपये अशी १ लाखाची रक्कम दिल्याचे ते म्हणाले.

काही प्रकरणांची चौकशी प्रलंबित

आत्महत्या केलेल्या काही प्रकरणांची चौकशी अद्याप प्रलंबित असून, छत्रपती संभाजीनगर विभाग (१६७), अमरावती विभाग (१७२), बीड जिल्हा (१४), अमरावती जिल्हा (२९), अकोला जिल्हा (३४) आणि वर्धा जिल्हा (३) यांचा यात समावेश आहे.

गेल्या वर्षात अमरावती जिल्ह्यात २,८५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, सर्व पात्र प्रकरणांसाठीचा निधी देण्यात आला आहे. 

अमरावती विभागात ९,९६१ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे आढळून आली असून, त्यातील ९,८३२ प्रकरणी मदत देण्यात आली आहे, असेही मंत्री पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025FarmerशेतकरीAmravatiअमरावती