शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

२७ गावे, एमआयडीसीत ठणठणाट

By admin | Updated: June 5, 2017 03:27 IST

तीन दिवस एमआयडीसीकडून २७ गावे आणि एमआयडीसी निवासी भागाला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : पाणीकपातीमुळे शुक्रवारी शटडाउन, त्यात मध्यरात्री फुटलेली जलवाहिनी आणि रविवारी पाणीपुरवठा करणाऱ्या जांभूळ केंद्रात झालेला तांत्रिक बिघाड, असे सलग तीन दिवस एमआयडीसीकडून २७ गावे आणि एमआयडीसी निवासी भागाला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. परिणामी, तेथील रहिवाशांचे पाणीटंचाईमुळे प्रचंड हाल झाले. केडीएमसी हद्दीतील २७ गावे आणि एमआयडीसी निवासी विभाग यांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो. सध्या लघुपाटबंधारे विभागाकडून लागू असलेल्या पाणीकपातीमुळे या भागांमधील पाणीपुरवठा दरशुक्रवारी बंद ठेवला जातो. मध्यरात्री १२ नंतर पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पाण्याचा दाब वाढल्याने जुनी जीर्ण झालेली जलवाहिनी काटईनाका परिसरात फुटली. या घटनेची माहिती मिळताच पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी दुपारी १ पर्यंत चालल्याने दिवसा पाणी मिळाले नाही. रात्री ८ च्या सुमारास कमी दाबाने पाणी आले. त्यामुळे पुरेशा प्रमाणात रहिवाशांना पाणी उपलब्ध झाले नाही. दरम्यान, रविवारी सकाळी पुन्हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. जांभूळ केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने पाणीपुरवठा अनिश्चित कालावधीसाठी बंद केल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती शिवसेनेचे स्थानिक नेते प्रकाश म्हात्रे यांनी दिली. जलवाहिनी फुटीच्या घटनेला सर्वस्वी अधिकारी जबाबदार आहेत. जीर्ण जलवाहिन्या बदलण्याऐवजी त्या केवळ दुरुस्त केल्या जात आहेत. कोळवली आणि काटई येथे मोठ्या प्रमाणावर अशा जलवाहिन्या आहेत. केवळ दुरुस्तीच्या नावाखाली अधिकारी कंत्राटदारांचे भले करत असल्याचा आरोप म्हात्रे यांचा आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचा मोबाइल बंदएकीकडे धरणांत पाणीसाठा मुबलक प्रमाणात असतानाही तीन दिवस घरांमध्ये पाणी नाही. त्यामुळे रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, त्यांचे भ्रमणध्वनी बंद असल्याने रहिवाशांमध्ये संतापाची भावना असल्याचे स्थानिक नागरिक राजू नलावडे यांनी सांगितले. पाण्याचा पुरवठा सुरळीत न झाल्यास एमआयडीसी कार्यालयावर धडक देणार असल्याचे त्यांनी सांगितले.