शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

रोकड, दारू, सोन्यासह २६९ कोटींचा ऐवज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 05:37 IST

एकूण २६९ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिली.

मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर आतापर्यंत राज्यात २३ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, तर १७ लाख लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. याचबरोबर सोन्यासह ४३ किलोचे मौल्यवान धातू जप्त करण्यात आले आहेत. असा एकूण २६९ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिली.राज्यात पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला आहे. २० मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली.

१० उमेदवारांनी दाखल केले अर्जविदर्भातील पहिल्या टप्प्यात आतापर्यंत १० उमेदवारांचे अर्ज आले आहेत. पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांत मतदान होणार आहे.  यापैकी रामटेकमध्ये एक, नागपूरमध्ये पाच, भंडारा-गोंदियामध्ये दोन, गडचिरोली-चिमूरमध्ये दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. चंद्रपूरमध्ये आतापर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही. राज्यात जप्त करण्यात आलेल्या बेहिशेबी २३ कोटी रुपयांपैकी सर्वाधिक म्हणजे, ३ कोटी ५० लाख रुपयांची बेहिशेबी रोकड मुंबईच्या उपनगरातून जप्त केली आहे. ४३ किलो सोने-चांदी व इतर मौल्यवान ऐवजही जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत परवाना नसलेली ३०८ शस्त्रे जप्त करण्यात आली.

पक्षाच्या जाहिरातींना लागणार निवडणूक आयोगाची मान्यतावर्तमानपत्रात एखाद्या राजकीय पक्षाला जाहिरात प्रसिद्ध करायची असल्यास निवडणूक आयोगाकडून संबधित जाहिरात प्रमाणित करून घ्यावी लागेल. आतापर्यंत अशा दोन जाहिराती निवडणूक कार्यालयात सादर झाल्या. त्यांचे प्रमाणीकरण सुरू असल्याचे चोकलिंगम म्हणाले.

अवैध दारू पकडण्यासाठी एरवी १२ चेकपोस्ट असतात.आता त्यांची संख्या निवडणूक काळ लक्षात घेऊन ४० करण्यात आली आहे. याशिवाय हातभट्टीच्या दारूचा व्यवसाय जेथे मोठ्या प्रमाणात चालतो अशी ठिकाणे आणि परराज्यातून दारू येते अशा ठिकाणी जलद कृतीदल तैनात करण्यात आले आहेत. या दोन्ही ठिकाणी तात्काळ कारवाई केली जात आहे.- विजय सूर्यवंशी, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Electionनिवडणूक