शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत २५ हजार पोलीस तैनात

By admin | Updated: July 30, 2015 02:37 IST

याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. बुधवारी मध्यरात्रीपासूनच तब्बल २५ हजार पोलीस बंदोबस्तासाठी

मुंबई : याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. बुधवारी मध्यरात्रीपासूनच तब्बल २५ हजार पोलीस बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. शहरातील तब्बल २०० संवेदनशील ठिकाणी सशस्त्र पोलीस तैनात असतील, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्तालयातून मिळाली.याकुबला फाशी दिल्यास त्याच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी होईल, ही शक्यता डोळ््यांसमोर ठेवूनच मुंबई पोलिसांनी सुरक्षेसाठीची व्यूहरचना आखल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याकुबच्या अंत्ययात्रेचे निमित्त साधून दोन धर्मांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे किंवा दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न घडू शकतात, असा दाट संशय पोलिसांना आहे. त्यामुळे काही दिवसांपासूनच पोलिसांनी शहरात सर्वत्र प्रतिबंधक कारवाई सुरू केली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून या कारवाईला आणखी वेग येणार असल्याचे संकेत आयुक्तालयातून मिळाले आहेत. दुसरीकडे पोलिसांनी स्थानिक धर्मगुरूंच्या बैठका घेऊन संवाद साधण्यास सुरूवात केली आहे. तसेच शहरातील संवेदनशील ठिकाणांची यादी तयार केली आहे. या ठिकाणी स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दल व शीघ्र कृती दलाचे सशस्त्र जवान तैनात असतील, असे पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. शहरात जमावबंदी : मुंबईत ३० जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू आहेत. मात्र परिस्थिती लक्षात घेता, पोलीस ही बंदी पुढील दोन आठवड्यांसाठी वाढवू शकतात. जमावबंदीत अंत्ययात्रा काढण्यासाठी परवानगी घ्यावी लागत नाही. मात्र याकुबचे प्रकरण विशेष असल्याने मेमन कुटुंबाला अंत्ययात्रा काढताना पोलिसांशी चर्चा करावी लागेल, असे उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.मेमन -पोलीस चर्चा : याकुबचा मृतदेह ताब्यात मिळावा, मरिन लाईन्सच्या बडा कब्रस्तानात याकुबवर अंत्यसंस्कार व्हावेत, अशी इच्छा मेमन कुटुंबियांनी पोलिसांकडे व्यक्त केली आहे. तर पोलिसांनी याकुबवर नागपूर कारागृहातच अंत्यसंस्कार करण्याबाबत कुटुंबाशी चर्चा केल्याचे समजते. तसेच याकुबचा मृतदेह ताब्यात दिल्यास माहिममध्येच अंत्यसंस्कार करा, अशीही सूचना पोलिसांनी मेमन कुटुंबाला केल्याचे समजते.विमानतळ, धारावीत विशेष बंदोबस्तमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, धारावी आणि वांद्रयाच्या पालीहिल परिसरात विशेष बंदोबस्त ठेवला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी या तीन ठिकाणी दहशतवादी हल्ला किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी माहिती गुप्तहेर संघटनांनी मुंबई पोलिसांना दिली आहे. अफवा पसरवू नका, विश्वास ठेवू नका : अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी कृती करू नका, असे मुंबईकरांना आवाहन आहे. तसे झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. मुंबईत कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस पूर्णपणे सज्ज आहेत. - देवेन भारती, सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था)संमिश्र प्रतिक्रियायाकूब मेमनच्या डेथ वॉरंटला आव्हान देणारी याचिका फेटाळण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल राजकीय पक्षांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून भाजपाने स्वागत तर भाकपने विरोध दर्शविला आहे. हा आंशिक न्याय आहे, याकूबचा भाऊ टायगर मेमन याला सरकारने पाकिस्तानातून परत आणून शिक्षा ठोठावली असती तर पूर्ण न्याय झाला असता,असे काँग्रेसने म्हटले. बॉम्बस्फोट मालिकेत २५७ लोक मारले गेले तर ७०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. हजारो कुटुंब आजही या धक्क्यातून सावरू शकले नाहीत. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आणि सन्मान करतो, असे भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी स्पष्ट केले. आमचा न्यायालयाच्या निर्णयावर विश्वास असून बुधवारच्या निर्णयामुळे तो आणखी बळकट झाला आहे. मेमन याला मानसिक आजार असल्यामुळे उपचाराची गरज असल्याचे सांगत किंवा धार्मिक आधार देत जातीय रंग देण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले. कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्यच होता हे सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने स्पष्ट झाले आहे, असे भाजपचे प्रवक्ते नलिन कोहली यांनी म्हटले. १९९३ च्या बॉम्बस्फोट पीडितांसाठी हा मोठा दिवस ठरला. त्यामुळे न्याय मिळाल्याची भावना बळकट झाली असून हा कायद्याचा विजय आहे, असे भाजपचे अन्य प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले.(वृत्तसंस्था)