शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

२५ वर्षांत प्रश्न का सुटले नाहीत?

By admin | Updated: November 10, 2015 00:01 IST

तुम्ही आता विरोधी पक्षातच : जठार यांचा राणेंना टोला

कणकवली : वर्षभराच्या आमच्या सत्तेत जिल्ह्याचे प्रश्न सुटले नाहीत म्हणून बोंब मारून आंदोलने करता. तर गेल्या २५ वर्षांत सत्ता आणि मंत्रिपदे असताना प्रश्न सुटले का नाहीत याचा जाब आधी तुमच्या पिताश्रींना विचारा. जनतेने तुम्हाला ओळखले असून यापुढे तुम्हाला विरोधातच काम करावे लागणार, असे प्रत्युत्तर माजी आमदार प्रमोद जठार यांनी आमदार नीतेश राणे यांना प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिले आहे.गेल्या २० वर्षांत अपघातात १० हजार मृत्यू महामार्गावर झाले. चिपी विमानतळाचे दहा वर्षांत तीन वेळा भूमिपूजन झाले. सी-वर्ल्डची दहा वर्षे घोषणाच होत आहे. आनंदवाडी प्रकल्प रखडला. तेव्हा तुम्ही व तुमचे पिताश्री कुठे होते, असा प्रश्न जठार यांनी उपस्थित केला आहे.सी-वर्ल्डचा प्रकल्प रद्द झाला असे आम्ही कधीच म्हटले नाही, तर तोंडवळीत जागा न मिळाल्यास तो जिल्ह्याबाहेर जाऊ न देता पर्यायी जागा देऊ, असे म्हटले आहे. सागरी महामार्गाचा ताबा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे गेला आहे. त्या मार्गासाठी आता जास्त निधी मिळेल. प्रशासनातील काहीच माहिती नसलेल्या तुम्हासारख्यांना फक्त पालकमंत्र्यांवर टीका करण्याचे कळते. ऊठसूट आंदोलने करून कामे होत नाहीत.विधिमंडळात संसदीय आयुधांचा वापर करून प्रश्न सोडवायचे असतात. मुंबईतील प्रकल्प इतर राज्यांत जाण्यापेक्षा सिंधुदुर्गात आले तर तुमच्या पोटात का दुखते हे कळत नाही. आम्ही विकासाची मोठी स्वप्ने पाहतो आणि ती पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करतो. आम्ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत. मी सहा-सात वर्षांपूर्वी राजकारणात आलो, पण नारायण राणे ४० वर्षे राजकारणात आहेत आणि सिंधुदुर्गाच्या राजकीय क्षेत्रात २५ वर्षे केंद्रबिंदू आहेत. त्यांनी ठरवले असते तर खूप काही शक्य होते. मात्र, त्यांनी जिल्ह्याचा सत्यानाश केला. रोजगार निर्माण केला नाहीच, प्रकल्पही अर्धवट ठेवले. पाण्याचे प्रश्नही त्यांना सोडवता आले नाहीत. त्यामुळे आता ते अस्तित्वाची लढाई लढत आहेत, अशी टीका जठार यांनी केली आहे. (प्रतिनिधी)नीलम्स का वाचवलेत?महामार्ग चौपदरीकरणाला तुमच्यासारख्यांच्या अडवणुकीमुळे वेळ लागतो. तुम्ही हॉटेल नीलम्स कंट्रीसाईड वाचवण्यासाठी नितीन गडकरी यांना कितीवेळा भेटलात. तेव्हा सार्वजनिक कामासाठी हॉटेल आधी तोडा असे का सांगितले नाहीत. मी माझे कासार्डेतील कार्यालय आधी तोडा, असेच अधिकाऱ्यांना सांगितले आहे. जनतेसमोर नेत्यांनी आदर्श घालून द्यायचा असतो, असे जठार यांनी म्हटले आहे.