शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

२५ वर्षांत प्रश्न का सुटले नाहीत?

By admin | Updated: November 10, 2015 00:01 IST

तुम्ही आता विरोधी पक्षातच : जठार यांचा राणेंना टोला

कणकवली : वर्षभराच्या आमच्या सत्तेत जिल्ह्याचे प्रश्न सुटले नाहीत म्हणून बोंब मारून आंदोलने करता. तर गेल्या २५ वर्षांत सत्ता आणि मंत्रिपदे असताना प्रश्न सुटले का नाहीत याचा जाब आधी तुमच्या पिताश्रींना विचारा. जनतेने तुम्हाला ओळखले असून यापुढे तुम्हाला विरोधातच काम करावे लागणार, असे प्रत्युत्तर माजी आमदार प्रमोद जठार यांनी आमदार नीतेश राणे यांना प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिले आहे.गेल्या २० वर्षांत अपघातात १० हजार मृत्यू महामार्गावर झाले. चिपी विमानतळाचे दहा वर्षांत तीन वेळा भूमिपूजन झाले. सी-वर्ल्डची दहा वर्षे घोषणाच होत आहे. आनंदवाडी प्रकल्प रखडला. तेव्हा तुम्ही व तुमचे पिताश्री कुठे होते, असा प्रश्न जठार यांनी उपस्थित केला आहे.सी-वर्ल्डचा प्रकल्प रद्द झाला असे आम्ही कधीच म्हटले नाही, तर तोंडवळीत जागा न मिळाल्यास तो जिल्ह्याबाहेर जाऊ न देता पर्यायी जागा देऊ, असे म्हटले आहे. सागरी महामार्गाचा ताबा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे गेला आहे. त्या मार्गासाठी आता जास्त निधी मिळेल. प्रशासनातील काहीच माहिती नसलेल्या तुम्हासारख्यांना फक्त पालकमंत्र्यांवर टीका करण्याचे कळते. ऊठसूट आंदोलने करून कामे होत नाहीत.विधिमंडळात संसदीय आयुधांचा वापर करून प्रश्न सोडवायचे असतात. मुंबईतील प्रकल्प इतर राज्यांत जाण्यापेक्षा सिंधुदुर्गात आले तर तुमच्या पोटात का दुखते हे कळत नाही. आम्ही विकासाची मोठी स्वप्ने पाहतो आणि ती पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करतो. आम्ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत. मी सहा-सात वर्षांपूर्वी राजकारणात आलो, पण नारायण राणे ४० वर्षे राजकारणात आहेत आणि सिंधुदुर्गाच्या राजकीय क्षेत्रात २५ वर्षे केंद्रबिंदू आहेत. त्यांनी ठरवले असते तर खूप काही शक्य होते. मात्र, त्यांनी जिल्ह्याचा सत्यानाश केला. रोजगार निर्माण केला नाहीच, प्रकल्पही अर्धवट ठेवले. पाण्याचे प्रश्नही त्यांना सोडवता आले नाहीत. त्यामुळे आता ते अस्तित्वाची लढाई लढत आहेत, अशी टीका जठार यांनी केली आहे. (प्रतिनिधी)नीलम्स का वाचवलेत?महामार्ग चौपदरीकरणाला तुमच्यासारख्यांच्या अडवणुकीमुळे वेळ लागतो. तुम्ही हॉटेल नीलम्स कंट्रीसाईड वाचवण्यासाठी नितीन गडकरी यांना कितीवेळा भेटलात. तेव्हा सार्वजनिक कामासाठी हॉटेल आधी तोडा असे का सांगितले नाहीत. मी माझे कासार्डेतील कार्यालय आधी तोडा, असेच अधिकाऱ्यांना सांगितले आहे. जनतेसमोर नेत्यांनी आदर्श घालून द्यायचा असतो, असे जठार यांनी म्हटले आहे.