शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

२५ वर्षांचे युती‘बंधन’ तुटले

By admin | Updated: September 26, 2014 09:15 IST

गेल्या २५ वर्षांची शिवसेना-भारतीय जनता पार्टीची युती गुरुवारी सायंकाळी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून अखेर तुटली आणि गेला पंधरवडाभर सुरू असलेली राजकीय अस्थिरता संपुष्टात आली

मुंबई : गेल्या २५ वर्षांची शिवसेना-भारतीय जनता पार्टीची युती गुरुवारी सायंकाळी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून अखेर तुटली आणि गेला पंधरवडाभर सुरू असलेली राजकीय अस्थिरता संपुष्टात आली. यामुळे ही विधानसभा निवडणूक भाजपा आता स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी व शिवसंग्राम या नव्या मित्रांचा हात धरून लढणार आहे तर शिवसेना आपल्या ताकदीवर या निवडणुकीला सामोरी जाईल. रिपाइंचे रामदास आठवले यांना सोबत घेण्याकरिता भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत.लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित यश मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत ही महायुती सत्तांतराचा चमत्कार घडवणार, असे तर्क लढवले जात होते. मात्र मुख्यमंत्रिपद व जागावाटप या तिढ्यात ही महायुती गुरफटत गेली. शिवसेनेने आपले ‘मिशन १५०’ घोषित केले होते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत भाजपाला ११९पेक्षा जास्त जागा देणार नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली होती. या वादात शिवसेनेकडून वेगवेगळे फॉर्म्युले भाजपा व मित्रपक्षांना सादर केले गेले. कोणत्याही परिस्थितीत आपण आपले मिशन १५० सोडणार नाही, अशी भूमिका शिवसनेने घेतली, तर १३०पेक्षा कमी जागा घेणार नाही, यावर भाजपाचे नेते ठाम राहिले. त्यातून घटकपक्षांची गळचेपी होत असल्यामुळे युतीचे अखेर सूप वाजले.