शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

पेरण्या न झाल्याने वारकऱ्यांमध्ये २५% घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 02:58 IST

राज्यात खरीपाचे १४०.६९ लाख हेक्टर क्षेत्र असून २४ जूनपर्यंत एक टक्काही खरीपाच्या पेरण्या झालेल्या नव्हत्या.

- बाळासाहेब बोचरेमुंबई : आषाढी वारी कधी येईल अन् पंढरीच्या वारीला कधी जाईन अशी ओढ मनी असलेले वारकरी उशिरा आलेल्या पावसामुळे पेरणीमध्ये गुंतले आहेत. त्यामुळे पायी दिंड्यांमध्ये वारकऱ्यांची संख्या २५ टक्के घटली आहे. मात्र आषाढीला येणारे वारकरी उशिरा का होईना येणारच, असे पालखी सोहळा प्रमुखांचे मत आहे.जून महिन्याच्या प्रारंभाला पडलेल्या पावसानंतर खरीपाची पेरणी करुन शेतीच्या कामातून मोकळा झालेला शेतकरी वारकरी बांधव आषाढी वारीला जाण्याच्या तयारीत असतो. पण यंदा पावसाचे खूपच उशिरा आगमन झाले. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या. आता पाऊस सुरू झाल्यानंतर पेरणी उरकूनच वारीला जायचे, असे वारक-यांनी ठरविले आहे. पुणे जिल्ह्यातून दोन मुख्य समजल्या जाणाºया पालख्यांपैकी संत तुकाराम महाराज पालखीने २४ जून रोजी तर संत ज्ञानेश्वर पालखीने २५ रोजी पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवले. तोपर्यंत कोकण व पश्चिम महाराष्टÑ वगळता राज्याच्या कोणत्याच भागात पेरणीयोग्य पाऊस झालेला नव्हता.राज्यात खरीपाचे १४०.६९ लाख हेक्टर क्षेत्र असून २४ जूनपर्यंत एक टक्काही खरीपाच्या पेरण्या झालेल्या नव्हत्या. १२ जुलै रोजी आषाढी एकादशी असून तोपर्यंत पेरण्या उरकून वारकरी शेवटच्या टप्प्यात पायी वारीत सहभागी होतील आणि वारकºयांची संख्या वाढेल, असे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी सांगितले. वारीतील सर्वात मोठ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत ५०० दिंड्या असून सुमारे अडीच ते तीन लाख वारकरी सोबत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील दिंड्या जास्त असतात, असे पालखीचे चोपदार रामभाऊ रंदवे यांनी सांगितले.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत ३०० दिंड्या असून दोन लाख वारकरी असतात. सध्या वारकरी कमी असून उशिरा पावसाचा परिणाम असल्याचे अध्यक्ष मधुकर मोरे महाराज यांनी सांगितले.

टॅग्स :varkariवारकरी