शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पेरण्या न झाल्याने वारकऱ्यांमध्ये २५% घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 02:58 IST

राज्यात खरीपाचे १४०.६९ लाख हेक्टर क्षेत्र असून २४ जूनपर्यंत एक टक्काही खरीपाच्या पेरण्या झालेल्या नव्हत्या.

- बाळासाहेब बोचरेमुंबई : आषाढी वारी कधी येईल अन् पंढरीच्या वारीला कधी जाईन अशी ओढ मनी असलेले वारकरी उशिरा आलेल्या पावसामुळे पेरणीमध्ये गुंतले आहेत. त्यामुळे पायी दिंड्यांमध्ये वारकऱ्यांची संख्या २५ टक्के घटली आहे. मात्र आषाढीला येणारे वारकरी उशिरा का होईना येणारच, असे पालखी सोहळा प्रमुखांचे मत आहे.जून महिन्याच्या प्रारंभाला पडलेल्या पावसानंतर खरीपाची पेरणी करुन शेतीच्या कामातून मोकळा झालेला शेतकरी वारकरी बांधव आषाढी वारीला जाण्याच्या तयारीत असतो. पण यंदा पावसाचे खूपच उशिरा आगमन झाले. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या. आता पाऊस सुरू झाल्यानंतर पेरणी उरकूनच वारीला जायचे, असे वारक-यांनी ठरविले आहे. पुणे जिल्ह्यातून दोन मुख्य समजल्या जाणाºया पालख्यांपैकी संत तुकाराम महाराज पालखीने २४ जून रोजी तर संत ज्ञानेश्वर पालखीने २५ रोजी पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवले. तोपर्यंत कोकण व पश्चिम महाराष्टÑ वगळता राज्याच्या कोणत्याच भागात पेरणीयोग्य पाऊस झालेला नव्हता.राज्यात खरीपाचे १४०.६९ लाख हेक्टर क्षेत्र असून २४ जूनपर्यंत एक टक्काही खरीपाच्या पेरण्या झालेल्या नव्हत्या. १२ जुलै रोजी आषाढी एकादशी असून तोपर्यंत पेरण्या उरकून वारकरी शेवटच्या टप्प्यात पायी वारीत सहभागी होतील आणि वारकºयांची संख्या वाढेल, असे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी सांगितले. वारीतील सर्वात मोठ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत ५०० दिंड्या असून सुमारे अडीच ते तीन लाख वारकरी सोबत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील दिंड्या जास्त असतात, असे पालखीचे चोपदार रामभाऊ रंदवे यांनी सांगितले.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत ३०० दिंड्या असून दोन लाख वारकरी असतात. सध्या वारकरी कमी असून उशिरा पावसाचा परिणाम असल्याचे अध्यक्ष मधुकर मोरे महाराज यांनी सांगितले.

टॅग्स :varkariवारकरी