शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले २३ हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2023 11:36 IST

साखर कारखान्यांकडून ९६ टक्के ‘एफआरपी’ अदा

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: राज्यातील साखर हंगाम संपण्यापूर्वीच शेतकऱ्यांना  ‘एफआरपी’ची ९६ टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे. ८४ कारखान्यांनी १०० टक्के ‘एफआरपी’ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली ही रक्कम तब्बल २३ हजार कोटी आहे. राज्यात आतापर्यंत १० कोटी २६ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून १२ कोटी ८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. ‘एफआरपी’ची रक्कम न देणाऱ्या तीन कारखान्यांच्या  मालमत्ता जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले आहेत. विशेष म्हणजे त्यात भाजपचे नेते व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या श्रीगोंदा तालुक्यातील साईकृपा शुगर इंडस्ट्रीजचा समावेश आहे.

मार्चअखेर १२ कोटी ८ लाख टन साखरेचे उत्पादन

  • राज्यातील गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहाेचला आहे. यंदा २०९ साखर कारखान्यांनी गाळपासाठी साखर आयुक्तालयाकडून परवानगी घेतली होती. या कारखान्यांनी ३१ मार्चअखेर १० कोटी २६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून १२ कोटी ८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.
  • या ऊसगाळपापोटी शेतकऱ्यांना ३१ हजार १३१ कोटी रुपयांची ‘एफआरपी’ देणे गरजेचे होते. त्यात तोडणी व वाहतूक खर्चाचा समावेश आहे. त्यानुसार आतापर्यंत ३० हजार ७७९ कोटी रुपयांची ‘एफआरपी’ देण्यात आली. त्यात २४ हजार ४६९ कोटी शेतकऱ्यांना देय होती. त्यापैकी २३ हजार ११६ कोटी (९४.४७ टक्के) शेतकऱ्यांच्या खात्यावर, तर तोडणी व वाहतुकीसाठी ६ हजार ३१० कोटी रुपये मजुरांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

एवढी आहे थकबाकी- अजूनही १ हजार ३५१ कोटींची ‘एफआरपी’ देणे बाकी आहे. तर आजवरची थकीत ‘एफआरपी’ची रक्कम २ हजार १५७ कोटी इतकी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी