शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले २३ हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2023 11:36 IST

साखर कारखान्यांकडून ९६ टक्के ‘एफआरपी’ अदा

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: राज्यातील साखर हंगाम संपण्यापूर्वीच शेतकऱ्यांना  ‘एफआरपी’ची ९६ टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे. ८४ कारखान्यांनी १०० टक्के ‘एफआरपी’ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली ही रक्कम तब्बल २३ हजार कोटी आहे. राज्यात आतापर्यंत १० कोटी २६ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून १२ कोटी ८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. ‘एफआरपी’ची रक्कम न देणाऱ्या तीन कारखान्यांच्या  मालमत्ता जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले आहेत. विशेष म्हणजे त्यात भाजपचे नेते व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या श्रीगोंदा तालुक्यातील साईकृपा शुगर इंडस्ट्रीजचा समावेश आहे.

मार्चअखेर १२ कोटी ८ लाख टन साखरेचे उत्पादन

  • राज्यातील गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहाेचला आहे. यंदा २०९ साखर कारखान्यांनी गाळपासाठी साखर आयुक्तालयाकडून परवानगी घेतली होती. या कारखान्यांनी ३१ मार्चअखेर १० कोटी २६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून १२ कोटी ८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.
  • या ऊसगाळपापोटी शेतकऱ्यांना ३१ हजार १३१ कोटी रुपयांची ‘एफआरपी’ देणे गरजेचे होते. त्यात तोडणी व वाहतूक खर्चाचा समावेश आहे. त्यानुसार आतापर्यंत ३० हजार ७७९ कोटी रुपयांची ‘एफआरपी’ देण्यात आली. त्यात २४ हजार ४६९ कोटी शेतकऱ्यांना देय होती. त्यापैकी २३ हजार ११६ कोटी (९४.४७ टक्के) शेतकऱ्यांच्या खात्यावर, तर तोडणी व वाहतुकीसाठी ६ हजार ३१० कोटी रुपये मजुरांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

एवढी आहे थकबाकी- अजूनही १ हजार ३५१ कोटींची ‘एफआरपी’ देणे बाकी आहे. तर आजवरची थकीत ‘एफआरपी’ची रक्कम २ हजार १५७ कोटी इतकी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी