शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले २३ हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2023 11:36 IST

साखर कारखान्यांकडून ९६ टक्के ‘एफआरपी’ अदा

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: राज्यातील साखर हंगाम संपण्यापूर्वीच शेतकऱ्यांना  ‘एफआरपी’ची ९६ टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे. ८४ कारखान्यांनी १०० टक्के ‘एफआरपी’ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली ही रक्कम तब्बल २३ हजार कोटी आहे. राज्यात आतापर्यंत १० कोटी २६ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून १२ कोटी ८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. ‘एफआरपी’ची रक्कम न देणाऱ्या तीन कारखान्यांच्या  मालमत्ता जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले आहेत. विशेष म्हणजे त्यात भाजपचे नेते व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या श्रीगोंदा तालुक्यातील साईकृपा शुगर इंडस्ट्रीजचा समावेश आहे.

मार्चअखेर १२ कोटी ८ लाख टन साखरेचे उत्पादन

  • राज्यातील गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहाेचला आहे. यंदा २०९ साखर कारखान्यांनी गाळपासाठी साखर आयुक्तालयाकडून परवानगी घेतली होती. या कारखान्यांनी ३१ मार्चअखेर १० कोटी २६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून १२ कोटी ८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.
  • या ऊसगाळपापोटी शेतकऱ्यांना ३१ हजार १३१ कोटी रुपयांची ‘एफआरपी’ देणे गरजेचे होते. त्यात तोडणी व वाहतूक खर्चाचा समावेश आहे. त्यानुसार आतापर्यंत ३० हजार ७७९ कोटी रुपयांची ‘एफआरपी’ देण्यात आली. त्यात २४ हजार ४६९ कोटी शेतकऱ्यांना देय होती. त्यापैकी २३ हजार ११६ कोटी (९४.४७ टक्के) शेतकऱ्यांच्या खात्यावर, तर तोडणी व वाहतुकीसाठी ६ हजार ३१० कोटी रुपये मजुरांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

एवढी आहे थकबाकी- अजूनही १ हजार ३५१ कोटींची ‘एफआरपी’ देणे बाकी आहे. तर आजवरची थकीत ‘एफआरपी’ची रक्कम २ हजार १५७ कोटी इतकी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी