शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

‘२३ निवडणुका केल्या, पण इतके हाल नव्हते’, गैरव्यवस्थापनामुळे कर्मचारी वेठीला

By रेश्मा शिवडेकर | Updated: May 22, 2024 10:39 IST

मतदान केंद्रांवर पंखे नाही, पिण्यास पाणी नाही, नाष्टा, जेवण नाही इत्यादी अनंत अडचणींचा सामना या कर्मचाऱ्यांनी केला.

मुंबई : आतापर्यंत २३ निवडणुकांचे काम केले. परंतु, या निवडणुकीत आलेला भयावह अनुभव आतापर्यंत कधीच आला नाही. एका शिक्षकाची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया सोमवारी मुंबईत निवडणूक कर्तव्यावर असलेल्या सुमारे ५७ हजार कर्मचाऱ्यांना झालेल्या मनस्तापाची व्यथा मांडण्यासाठी पुरेशी आहे.

मतदान केंद्रांवर पंखे नाही, पिण्यास पाणी नाही, नाष्टा, जेवण नाही इत्यादी अनंत अडचणींचा सामना या कर्मचाऱ्यांनी केला. परंतु, मतदानानंतर मशीन जमा करणे, विविध प्रकारचे फॉर्म भरणे, अन्य प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्याच्या कामातही कमालीच्या ढिसाळ कारभारामुळे अनेकांना घर गाठेपर्यंत पहाटेचे सहा-सात वाजले. इतका गोंधळ आजवर कुठल्याच निवडणुकीत अनुभवाला आला नसल्याची प्रतिक्रिया कर्मचारी व्यक्त करत आहेत.

महिलांनाही निवडणूक साहित्य जमा करण्याच्या नावाखाली रात्री १२ वाजेपर्यंत थांबवून ठेवले होते. विरार, वसई, कल्याण, डोंबिवली अशा लांब राहणाऱ्या महिलांना याचा त्रास झाला, अशी तक्रार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली.

असह्य उकाडा, त्यात पंखेही बंदकुर्ला येथे भर उन्हात प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यातच मांडवातील पंखेही चालत नव्हते. तिथे एका कर्मचाऱ्याला चक्कर आल्याने रुग्णालयात न्यावे लागले, असा अनुभव एका कर्मचाऱ्याने सांगितला.  

मतदान केंद्रावरच काढावी लागली अख्खी रात्रमतदानाच्या आदल्या दिवशीपासूनच ढिसाळ व्यवस्थापनाचा फटका या कर्मचाऱ्यांना बसू लागला होता. रविवारी (१९ मे) सकाळी ७ वाजल्यापासून प्रशिक्षण आणि मतदान केंद्रावरील तयारीकरिता कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले होते. काही ठिकाणी मतदानाची तयारी करण्यात उशीर झाल्याने पुरुष कर्मचाऱ्यांनी रविवारची रात्र निवडणूक केंद्रावरच काढली. मतदानाच्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजे मंगळवारी ५-६ वाजेपर्यंत हे हाल सुरू होते.

नाश्ता-जेवण आले, पण कुणी भलतेच घेऊन गेले- कर्मचाऱ्यांच्या नाश्ता, जेवणाकरिता एकत्रित सोय केली जाते. संबंधित कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणाहून आपल्या वाट्याचे जेवण घेऊन जायचे असते. - परंतु, टिळक नगर म्युनिसिपल स्कूल येथे काम करणाऱ्या ९० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नावाने असलेला नाश्ता, जेवण कुणीतरी भलतेच घेऊन गेल्याने या कर्मचाऱ्यांना दिवसभर उपाशीपोटी ड्यूटी बजावावी लागली. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग