शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास २२ वर्षांनी शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 05:46 IST

नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील वाड गावात एका शेतमजुराच्या ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणा-या मच्छिंद्र ऊर्फ बबडू गंगाधर सोनावणे या आरोपीस मुंबई उच्च न्यायालयाने घटनेनंतर तब्बल २२ वर्षांनी सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

मुंबई : नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील वाड गावात एका शेतमजुराच्या ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणा-या मच्छिंद्र ऊर्फ बबडू गंगाधर सोनावणे या आरोपीस मुंबई उच्च न्यायालयाने घटनेनंतर तब्बल २२ वर्षांनी सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.या आरोपीस नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते. त्याविरुद्ध राज्य सरकारने केलेले अपील मंजूर करून न्या. इंद्रजीत महंती व न्या. श्रीमती व्ही. के. जाधव यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. या खेरीज बबडू यास एक लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला. तो वसूलझाला तर ती रक्कम बलात्कारपीडित मुलीस भरपाई म्हणून द्यावी, असाही आदेश दिला गेला. शिक्षा भोगण्यासाठी आरोपीने एक महिन्यात सत्र न्यायालयापुढे हजर व्हावे, असाही आदेश दिला गेला.न्यायालयाने असेही निर्देश दिले की, नाशिक जिल्हा विधी सेवा समितीने ही पीडित मुलगी आज कुठे आहे याचा शोध घ्यावा आणि बलात्कारित स्त्रियांना सरकारकडून भरपाई देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने जी योजना तयार केली आहे त्यानुसार भरपाई मिळण्यासाठी तिच्याकडून अर्ज भरून घ्यावा. त्या अर्जावर सहानुभूतीने निर्णय घेतला जावा, असेही खंडपीठाने सांगितले.या पीडित मुलीचे आई व वडील दोघेही शेतमजूर म्हणून काम करायचे. १ डिसेंंबर १९९६ रोजी तिच्या मोठ्या भावाच्या पाठीत उसण भरली म्हणून वडील त्याला घेऊन इस्पितळात गेले व आई मजुरीसाठी व लाकडे आणण्यासाठी घराबाहेर पडली. डोके खूप डोके दुखू लागले म्हणूनही मुलगी गावातील किराणा मालाच्या दुकानात गेली व आपल्याकडे पैसे नाहीत, पण काही तरी औषध द्या, अशी तिने विनंती केली. ते दुकान बबडूच्या वडिलांचे होते व त्यावेळी दुकानावर बबडू बसला होता. दुकानाच्या मागच्या बाजूला त्यांचे घर होते. मुलगी एकटीच आहे, हे पाहून बबडूने तिच्यावर बलात्कार केला. कपडे रक्ताने माखलेल्या अवस्थेत मुलगी घरी गेली व वडील आणि आई येईपर्यंत बाहेर बसून राहिली.न्यायालयाने दोन निष्कर्ष काढून त्यावरून संशयाचा फायदादेत बबडूला निर्दोष ठरविले होते. एक, घटनेच्या वेळी या मुलीचे वय किमान १६ वर्षे होते व दोन, बबडूने तिच्या संमतीने तिच्याशी हे शरीरसंबंधकेले. खंडपीठाने हे दोन्हीनिष्कर्ष चुकीचे ठरवत बबडूला दोषी धरले.दयेची विनंती केली अमान्यहा गुन्हा करताना बबडू १९ वर्षांचा होता. त्यानंतर अपिलात एवढी वर्षे गेली आहेत. त्यामुळे शिक्षा देताना त्याला दया दाखवावी, ही विनंती अमान्य करून खंडपीठाने नमूद केले की, या घटनेला २२ वर्षे होऊन गेली असली तरी फौजदारी न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास अबाधित राहावा, यासाठी आरोपीस शक्य तेवढी शक्य शिक्षा देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Courtन्यायालय