शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

२२ रु.ची वही ६.६६ रुपयांत!

By admin | Updated: June 22, 2016 04:23 IST

आदिवासी विकास खात्यात चढ्या दराने करण्यात आलेल्या खरेदीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावताच ज्या फर्मने आधी २२ रुपयांनी वह्यांचा पुरवठा केला, त्याच फर्मने आता ६.६६ रुपया

यदु जोशी,  मुंबईआदिवासी विकास खात्यात चढ्या दराने करण्यात आलेल्या खरेदीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावताच ज्या फर्मने आधी २२ रुपयांनी वह्यांचा पुरवठा केला, त्याच फर्मने आता ६.६६ रुपयात वह्या पुरवठ्याची तयारी दर्शविली आहे. भाजपाचे सरकार आल्यानंतर गेल्यावर्षी मंत्री, कंत्राटदार, सचिव आणि अधिकाऱ्यांच्या घोळात आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप होऊ शकले नव्हते. मनमाननी दराने काढण्यात आलेल्या निविदांचे बिंग ‘लोकमत’ने फोडताच मुख्यमंत्र्यांनी निविदा प्रक्रियाच स्थगित केली होती. २०१६-१७ मध्ये आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यासाठीची निविदा रद्द करण्यात आल्यानंतर आता ११ कोटी रुपयांची ही खरेदी आता ६.५० कोटी रुपयांवर आली आहे. कारण, गेल्या पाच वर्षांत १९२ पानी वही ३४.२० रुपयांत पुरविण्यात आली होती. यंदा १७६ पानी वहीचा दर आहे १३.२३ रु. आहे, तर ९६ पानी वही आधी २१.७८ रुपयांना खरेदी करण्यात आली. आता ७६ पानी वहीचादर आहे ६.८४ रुपयांवर आला आहे. दोन क्वायरचे रजिष्टर आधी ७० रुपयांत दिले जायचे. आता ते मिळणार आहे २४.२१ रुपयांत. रेघोटी कागदाच्या (फुुल शिट) रिमचा दर आधी ५२२ रुपयांपर्यंत जायचा आता तो २५५ रुपयांवर आला आहे. उत्तर पत्रिका, पुरवणी उत्तरपत्रिका, कोरे कागद, ड्रॉर्इंग वही आदींच्या दराबाबतदेखील असाच अनुभव आला आहे. आदिवासी विकास विभागातील खरेदीवर मुख्यमंत्र्यांचीच नजर आहे म्हटल्यानंतर धाबे दणाणलेल्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांशी हातमिळवणी करण्याचे थांबवले.लुटीची वसुली करण्याची मागणी : ज्या कंत्राटदाराने गेली पाच वर्षे अव्वाच्या सव्वा दर लावून आदिवासी विकास विभागाला लेखन सामुग्रीचे वाटप केले त्याच कंत्राटदार फर्मने यावेळी ७० टक्के कमी किमतीत खरेदीची तयारी दर्शविली आहे. या फर्मने गतकाळात केलेल्या लुटीची वसुली तिच्याकडून करावी आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी लालसेनेचे नेते कॉम्रेड गणपत भिसे यांनी केली आहे.आणखी कमी दर येऊ शकतात : आता ज्या फर्मचे दर सर्वात कमी आलेले आहेत त्याहीपेक्षा कमी दराने आम्ही लेखन साहित्य पुरविण्यास तयार आहोत, असा दावा करीत काही कंत्राटदारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील अंतिम सुनावणीआधी निविदा प्रक्रियेबाबत अंतिम निर्णय घेऊ नये, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.