शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

आदिवासींना डासमुक्त झोप, २.१९ लाख मच्छरदाण्या : टास्कफोर्सचा पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 02:53 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवताप (मलेरिया) निर्मूलनासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या टास्कफोर्सने केलेल्या पाठपुराव्यानंतर आता आदिवासींसाठी तब्बल २ लाख १९ हजार मच्छरदाण्यांचे वाटप राज्यातील आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना सुरू करण्यात आले आहे.

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवताप (मलेरिया) निर्मूलनासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या टास्कफोर्सने केलेल्या पाठपुराव्यानंतर आता आदिवासींसाठी तब्बल २ लाख १९ हजार मच्छरदाण्यांचे वाटप राज्यातील आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना सुरू करण्यात आले आहे.एका मच्छरदाणीची किंमत ५०० रुपये असून तिच्यावर डास बसल्यानंतर तो मरतो. त्यामुळे एकप्रकारे डास निर्मूलनदेखील होणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात १ लाख १९ हजार, चंद्रपूर - २३ हजार, गोंदिया २० हजार, ठाणे १० हजार, पालघर १० हजार, रायगट २० हजार, सिंधुदुर्ग ७ हजार आणि नंदुरबार १० हजार मच्छरदाण्यांचे वाटप सध्या सुरू आहे. एका कुटुंबातील दोन जणांमागे एक मच्छरदाणी दिली जाते. हिवतापाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या गावांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या टास्क फोर्सनेअशा मच्छरदाण्यांच्या वाटपाचा आग्रह धरला होता. त्यामुळे गेल्या काही वर्षांत झाले नाही इतके मोठे मच्छरदाण्यांचे वाटप हिवताप निर्मूलन कार्यक्रमांतर्गत आता केले जात आहे.मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र -राज्य मोतीबिंदूमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून येत्या २० महिन्यांत १७ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या योजनेचे मुख्य समन्वयक म्हणून सुप्रसिद्ध नेत्रशल्यचिकित्सक व राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयातील सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांची नियुक्ती मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार