शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आदिवासींना डासमुक्त झोप, २.१९ लाख मच्छरदाण्या : टास्कफोर्सचा पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 02:53 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवताप (मलेरिया) निर्मूलनासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या टास्कफोर्सने केलेल्या पाठपुराव्यानंतर आता आदिवासींसाठी तब्बल २ लाख १९ हजार मच्छरदाण्यांचे वाटप राज्यातील आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना सुरू करण्यात आले आहे.

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवताप (मलेरिया) निर्मूलनासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या टास्कफोर्सने केलेल्या पाठपुराव्यानंतर आता आदिवासींसाठी तब्बल २ लाख १९ हजार मच्छरदाण्यांचे वाटप राज्यातील आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना सुरू करण्यात आले आहे.एका मच्छरदाणीची किंमत ५०० रुपये असून तिच्यावर डास बसल्यानंतर तो मरतो. त्यामुळे एकप्रकारे डास निर्मूलनदेखील होणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात १ लाख १९ हजार, चंद्रपूर - २३ हजार, गोंदिया २० हजार, ठाणे १० हजार, पालघर १० हजार, रायगट २० हजार, सिंधुदुर्ग ७ हजार आणि नंदुरबार १० हजार मच्छरदाण्यांचे वाटप सध्या सुरू आहे. एका कुटुंबातील दोन जणांमागे एक मच्छरदाणी दिली जाते. हिवतापाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या गावांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ.अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या टास्क फोर्सनेअशा मच्छरदाण्यांच्या वाटपाचा आग्रह धरला होता. त्यामुळे गेल्या काही वर्षांत झाले नाही इतके मोठे मच्छरदाण्यांचे वाटप हिवताप निर्मूलन कार्यक्रमांतर्गत आता केले जात आहे.मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र -राज्य मोतीबिंदूमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून येत्या २० महिन्यांत १७ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या योजनेचे मुख्य समन्वयक म्हणून सुप्रसिद्ध नेत्रशल्यचिकित्सक व राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयातील सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांची नियुक्ती मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार