शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

वर्ष 2019: आयाराम-गायारामांनी गाजलं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 14:22 IST

लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी भाजप-शिवसेनेत पक्षांतर केल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई: राजकारणात या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱ्या आयाराम-गयाराम मंडळींच्या राजकारणाने 2019 च वर्ष गाजल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी भाजप-शिवसेनेत पक्षांतर केल्याचे पाहायला मिळाले. तर या नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे त्यावेळी मोठी चर्चा पाहायला मिळाली होती. त्यामुळे 2019 चे वर्ष आयाराम-गायारामांनी गाजल्याची विशेष नोंद भविष्यात राहणार आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी पुन्हा युतीचेच सरकार येणार असल्याचे चित्र होते. त्यामुळे विरोधात असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला मोठ्याप्रमाणावर गळती लागली होती. रात्री एका पक्षात तर सकाळी दुसऱ्या पक्षात नेते असल्याच्या बातम्या पाहायला मिळाल्या. मात्र यात काही महत्वाच्या नेत्यांची अधिकच चर्चा झाली.

सातारा लोकसभा मतदार संघातून छत्रपती उदयनराजे यांनी निवडणूक जिंकल्यानंतर सहा महिन्यांच्या आतच राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाची त्यावेळी मोठी चर्चा झाली होती. तर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचे सुद्धा बोलले जात होते. मात्र पुढे झालेल्या पोटनिवडणूक त्यांचा पराभव झाला.

तर विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसचे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षाची साथ सोडून हाती कमळ घेतले होते. ते पक्ष सोडण्याची शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती. मात्र खासदार सुजय विखे पाटील लोकसभेत निवडून येताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे थेट विरोधी पक्षनेताच फुटल्याने विखेंच्या पक्षप्रवेशाची सुद्धा राज्यभरात चर्चा रंगली होती.

याच बरोबर रश्मी बागुल,वैभव पिचड,जयदत्त क्षीरसागर,हर्षवर्धन पाटील,गोपीचंद पडळकर, अब्दुल सत्तार, पांडुरंग बरोरा, भास्कर जाधव, दिलीप सोपल, राणा जगजितसिंह पाटील,नमिता मुंदडा,भाऊसाहेब कांबळे यांच्यासह अनेक नेत्यांनी स्वता:चा पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे 2019 चा वर्ष हे आयाराम-गयारामांनी गाजल्याचे पाहायला मिळाले.