शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वर्ष 2019: आयाराम-गायारामांनी गाजलं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 14:22 IST

लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी भाजप-शिवसेनेत पक्षांतर केल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई: राजकारणात या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱ्या आयाराम-गयाराम मंडळींच्या राजकारणाने 2019 च वर्ष गाजल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी भाजप-शिवसेनेत पक्षांतर केल्याचे पाहायला मिळाले. तर या नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे त्यावेळी मोठी चर्चा पाहायला मिळाली होती. त्यामुळे 2019 चे वर्ष आयाराम-गायारामांनी गाजल्याची विशेष नोंद भविष्यात राहणार आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी पुन्हा युतीचेच सरकार येणार असल्याचे चित्र होते. त्यामुळे विरोधात असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला मोठ्याप्रमाणावर गळती लागली होती. रात्री एका पक्षात तर सकाळी दुसऱ्या पक्षात नेते असल्याच्या बातम्या पाहायला मिळाल्या. मात्र यात काही महत्वाच्या नेत्यांची अधिकच चर्चा झाली.

सातारा लोकसभा मतदार संघातून छत्रपती उदयनराजे यांनी निवडणूक जिंकल्यानंतर सहा महिन्यांच्या आतच राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाची त्यावेळी मोठी चर्चा झाली होती. तर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचे सुद्धा बोलले जात होते. मात्र पुढे झालेल्या पोटनिवडणूक त्यांचा पराभव झाला.

तर विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसचे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षाची साथ सोडून हाती कमळ घेतले होते. ते पक्ष सोडण्याची शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती. मात्र खासदार सुजय विखे पाटील लोकसभेत निवडून येताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे थेट विरोधी पक्षनेताच फुटल्याने विखेंच्या पक्षप्रवेशाची सुद्धा राज्यभरात चर्चा रंगली होती.

याच बरोबर रश्मी बागुल,वैभव पिचड,जयदत्त क्षीरसागर,हर्षवर्धन पाटील,गोपीचंद पडळकर, अब्दुल सत्तार, पांडुरंग बरोरा, भास्कर जाधव, दिलीप सोपल, राणा जगजितसिंह पाटील,नमिता मुंदडा,भाऊसाहेब कांबळे यांच्यासह अनेक नेत्यांनी स्वता:चा पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे 2019 चा वर्ष हे आयाराम-गयारामांनी गाजल्याचे पाहायला मिळाले.