शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गहू आयातीवर २० टक्के, मटारवर ५० टक्के शुल्क लागू - सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 04:53 IST

राज्य सरकारच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने गहू आयातीवरील आयात शुल्क १० वरून २० टक्के आणि मटारवरील आयात शुल्क शून्य टक्क्यांवरून ५० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : राज्य सरकारच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने गहू आयातीवरील आयात शुल्क १० वरून २० टक्के आणि मटारवरील आयात शुल्क शून्य टक्क्यांवरून ५० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकºयांना फायदा होईल, अशी माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली.कृषी मूल्य आयोगाच्या स्थापनेमुळे राज्यातील शेतमालाच्या संदर्भात केंद्राशी समन्वय साधणे शक्य झाल्याचे सांगून राज्यमंत्री खोत म्हणाले की, धान्यावरील आयात शुल्क वाढविण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती.स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी यासंदर्भात केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने आयात शुल्कात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गहू आयातीवर २० टक्के आयात शुल्क करण्यात आले. यापूर्वी ते १० टक्के होते, तर पिवळ्या मटारवरील आयात शुल्क ५० टक्के केले आहे. यापूर्वी मटारवर शून्य टक्के आयात शुल्क होते.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Farmerशेतकरी