शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

गहू आयातीवर २० टक्के, मटारवर ५० टक्के शुल्क लागू - सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 04:53 IST

राज्य सरकारच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने गहू आयातीवरील आयात शुल्क १० वरून २० टक्के आणि मटारवरील आयात शुल्क शून्य टक्क्यांवरून ५० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : राज्य सरकारच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने गहू आयातीवरील आयात शुल्क १० वरून २० टक्के आणि मटारवरील आयात शुल्क शून्य टक्क्यांवरून ५० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकºयांना फायदा होईल, अशी माहिती कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली.कृषी मूल्य आयोगाच्या स्थापनेमुळे राज्यातील शेतमालाच्या संदर्भात केंद्राशी समन्वय साधणे शक्य झाल्याचे सांगून राज्यमंत्री खोत म्हणाले की, धान्यावरील आयात शुल्क वाढविण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती.स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी यासंदर्भात केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने आयात शुल्कात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गहू आयातीवर २० टक्के आयात शुल्क करण्यात आले. यापूर्वी ते १० टक्के होते, तर पिवळ्या मटारवरील आयात शुल्क ५० टक्के केले आहे. यापूर्वी मटारवर शून्य टक्के आयात शुल्क होते.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Farmerशेतकरी