शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळात २० मंत्री अन् सभागृहात एकटेच; भास्कर जाधवांनी अब्दुल सत्तारांना घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 18:58 IST

Maharashtra Vidhan Sabha Live: कोकणातला मत्स्यविकास मंत्री नाही. ७२० किमी समुद्रकिनारा कोकणाला लाभला परंतु प्रत्येक वेळी मत्स्यविकास मंत्री बाहेरचे होते. ज्यांचा मच्छिमारीशी काहीही संबंध नाही असं भास्कर जाधव म्हणाले.

मुंबई - कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. १५७ शेतकऱ्यांचा मृत्यू पूरामुळे झाला आहे. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. संपूर्ण नदीनं आपला प्रवाह बदलला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली. कोकणात ८ टक्क्याहून १२-१४ टक्के जमिनी उताराच्या आहेत. त्यामुळे मोठा गाळ नदीपात्रात जमा होतो असं शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत म्हटलं. 

विधानसभेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राची पूरस्थिती आणि शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने झालेले नुकसान यावर चर्चा सुरू होती. यावेळी भास्कर जाधव म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मृत्यूसह साडेपाचशे जनावरं मृत्युमुखी पडले आहेत. राज्यातील काही भागात दुबार पीक पेरणी होते. कोकणात दुबार पीक पेरणी होत नाही. कोकणातील शेतकरी कर्ज घेत नाही. त्यामुळं कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. निसर्गाच्या लहरीपणावर कोकणतील शेती आहे. मग कोकणातल्या शेतकऱ्यांना काय मदत करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

तसेच कोकणात १०-२० एकर शेती असणं म्हणजे सर्वात मोठा शेतकरी. सपाट जमीन नाही. एकाबाजूला समुद्रकिनारा, दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्या दोघांमधील जागा म्हणजे कोकण. कोकणातील शेतकऱ्यांना मदत करताना ३ गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. कोकणाची स्वतंत्र चर्चा कधीच सभागृहात झाली नाही. सरकारकडे उत्तर देण्यासारखं काही नाही असं भास्कर जाधव यांनी सभागृहात म्हटलं. 

दरम्यान, कोकणातला मत्स्यविकास मंत्री नाही. ७२० किमी समुद्रकिनारा कोकणाला लाभला परंतु प्रत्येक वेळी मत्स्यविकास मंत्री बाहेरचे होते. ज्यांचा मच्छिमारीशी काहीही संबंध नाही. आज सभागृहात चर्चा घडवत असताना हे सरकार शेतकऱ्यांबाबत किती गंभीर आहे ते मंत्र्यांच्या उपस्थितीवरून दिसून येते. मंत्रिमंडळात मंत्री २० आणि सभागृहात मंत्री कोण सगळ्या विषयात सर्वज्ञानी अब्दुल सत्तार आहे. मत्स्यविकास मंत्री असायला हवे होते असा टोला भास्कर जाधव यांनी सत्तारांना लगावला. त्याचसोबत मविआ सरकारनं कोरोना संकट असतानाही शेतकऱ्यांना मदत केली. चक्रीवादळात तेव्हाचे विरोधी पक्षनेते फडणवीस फिरत होते. परंतु केंद्राकडून मदत आणू शकले नाहीत. कोकण कर्ज घेत नाही. कर्ज घेतले असेल तर वेळेवर फेडतो. गुवाहाटीच्या अर्ध्या गप्पा नंतर बोला. त्यावर जास्त चर्चा नको. मंत्र्यांनी बोलताना विचार करावा मागील सरकारमध्ये तुम्हीही मंत्री होता असाही चिमटा जाधवांनी सत्तारांना काढला.  

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवAbdul Sattarअब्दुल सत्तार