शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

मंत्रिमंडळात २० मंत्री अन् सभागृहात एकटेच; भास्कर जाधवांनी अब्दुल सत्तारांना घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 18:58 IST

Maharashtra Vidhan Sabha Live: कोकणातला मत्स्यविकास मंत्री नाही. ७२० किमी समुद्रकिनारा कोकणाला लाभला परंतु प्रत्येक वेळी मत्स्यविकास मंत्री बाहेरचे होते. ज्यांचा मच्छिमारीशी काहीही संबंध नाही असं भास्कर जाधव म्हणाले.

मुंबई - कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. १५७ शेतकऱ्यांचा मृत्यू पूरामुळे झाला आहे. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. संपूर्ण नदीनं आपला प्रवाह बदलला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली. कोकणात ८ टक्क्याहून १२-१४ टक्के जमिनी उताराच्या आहेत. त्यामुळे मोठा गाळ नदीपात्रात जमा होतो असं शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत म्हटलं. 

विधानसभेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राची पूरस्थिती आणि शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने झालेले नुकसान यावर चर्चा सुरू होती. यावेळी भास्कर जाधव म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मृत्यूसह साडेपाचशे जनावरं मृत्युमुखी पडले आहेत. राज्यातील काही भागात दुबार पीक पेरणी होते. कोकणात दुबार पीक पेरणी होत नाही. कोकणातील शेतकरी कर्ज घेत नाही. त्यामुळं कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. निसर्गाच्या लहरीपणावर कोकणतील शेती आहे. मग कोकणातल्या शेतकऱ्यांना काय मदत करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

तसेच कोकणात १०-२० एकर शेती असणं म्हणजे सर्वात मोठा शेतकरी. सपाट जमीन नाही. एकाबाजूला समुद्रकिनारा, दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्या दोघांमधील जागा म्हणजे कोकण. कोकणातील शेतकऱ्यांना मदत करताना ३ गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. कोकणाची स्वतंत्र चर्चा कधीच सभागृहात झाली नाही. सरकारकडे उत्तर देण्यासारखं काही नाही असं भास्कर जाधव यांनी सभागृहात म्हटलं. 

दरम्यान, कोकणातला मत्स्यविकास मंत्री नाही. ७२० किमी समुद्रकिनारा कोकणाला लाभला परंतु प्रत्येक वेळी मत्स्यविकास मंत्री बाहेरचे होते. ज्यांचा मच्छिमारीशी काहीही संबंध नाही. आज सभागृहात चर्चा घडवत असताना हे सरकार शेतकऱ्यांबाबत किती गंभीर आहे ते मंत्र्यांच्या उपस्थितीवरून दिसून येते. मंत्रिमंडळात मंत्री २० आणि सभागृहात मंत्री कोण सगळ्या विषयात सर्वज्ञानी अब्दुल सत्तार आहे. मत्स्यविकास मंत्री असायला हवे होते असा टोला भास्कर जाधव यांनी सत्तारांना लगावला. त्याचसोबत मविआ सरकारनं कोरोना संकट असतानाही शेतकऱ्यांना मदत केली. चक्रीवादळात तेव्हाचे विरोधी पक्षनेते फडणवीस फिरत होते. परंतु केंद्राकडून मदत आणू शकले नाहीत. कोकण कर्ज घेत नाही. कर्ज घेतले असेल तर वेळेवर फेडतो. गुवाहाटीच्या अर्ध्या गप्पा नंतर बोला. त्यावर जास्त चर्चा नको. मंत्र्यांनी बोलताना विचार करावा मागील सरकारमध्ये तुम्हीही मंत्री होता असाही चिमटा जाधवांनी सत्तारांना काढला.  

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवAbdul Sattarअब्दुल सत्तार