शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळात २० मंत्री अन् सभागृहात एकटेच; भास्कर जाधवांनी अब्दुल सत्तारांना घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 18:58 IST

Maharashtra Vidhan Sabha Live: कोकणातला मत्स्यविकास मंत्री नाही. ७२० किमी समुद्रकिनारा कोकणाला लाभला परंतु प्रत्येक वेळी मत्स्यविकास मंत्री बाहेरचे होते. ज्यांचा मच्छिमारीशी काहीही संबंध नाही असं भास्कर जाधव म्हणाले.

मुंबई - कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. १५७ शेतकऱ्यांचा मृत्यू पूरामुळे झाला आहे. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. संपूर्ण नदीनं आपला प्रवाह बदलला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली. कोकणात ८ टक्क्याहून १२-१४ टक्के जमिनी उताराच्या आहेत. त्यामुळे मोठा गाळ नदीपात्रात जमा होतो असं शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत म्हटलं. 

विधानसभेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राची पूरस्थिती आणि शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने झालेले नुकसान यावर चर्चा सुरू होती. यावेळी भास्कर जाधव म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मृत्यूसह साडेपाचशे जनावरं मृत्युमुखी पडले आहेत. राज्यातील काही भागात दुबार पीक पेरणी होते. कोकणात दुबार पीक पेरणी होत नाही. कोकणातील शेतकरी कर्ज घेत नाही. त्यामुळं कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. निसर्गाच्या लहरीपणावर कोकणतील शेती आहे. मग कोकणातल्या शेतकऱ्यांना काय मदत करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

तसेच कोकणात १०-२० एकर शेती असणं म्हणजे सर्वात मोठा शेतकरी. सपाट जमीन नाही. एकाबाजूला समुद्रकिनारा, दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्या दोघांमधील जागा म्हणजे कोकण. कोकणातील शेतकऱ्यांना मदत करताना ३ गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. कोकणाची स्वतंत्र चर्चा कधीच सभागृहात झाली नाही. सरकारकडे उत्तर देण्यासारखं काही नाही असं भास्कर जाधव यांनी सभागृहात म्हटलं. 

दरम्यान, कोकणातला मत्स्यविकास मंत्री नाही. ७२० किमी समुद्रकिनारा कोकणाला लाभला परंतु प्रत्येक वेळी मत्स्यविकास मंत्री बाहेरचे होते. ज्यांचा मच्छिमारीशी काहीही संबंध नाही. आज सभागृहात चर्चा घडवत असताना हे सरकार शेतकऱ्यांबाबत किती गंभीर आहे ते मंत्र्यांच्या उपस्थितीवरून दिसून येते. मंत्रिमंडळात मंत्री २० आणि सभागृहात मंत्री कोण सगळ्या विषयात सर्वज्ञानी अब्दुल सत्तार आहे. मत्स्यविकास मंत्री असायला हवे होते असा टोला भास्कर जाधव यांनी सत्तारांना लगावला. त्याचसोबत मविआ सरकारनं कोरोना संकट असतानाही शेतकऱ्यांना मदत केली. चक्रीवादळात तेव्हाचे विरोधी पक्षनेते फडणवीस फिरत होते. परंतु केंद्राकडून मदत आणू शकले नाहीत. कोकण कर्ज घेत नाही. कर्ज घेतले असेल तर वेळेवर फेडतो. गुवाहाटीच्या अर्ध्या गप्पा नंतर बोला. त्यावर जास्त चर्चा नको. मंत्र्यांनी बोलताना विचार करावा मागील सरकारमध्ये तुम्हीही मंत्री होता असाही चिमटा जाधवांनी सत्तारांना काढला.  

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवAbdul Sattarअब्दुल सत्तार