शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मंत्रिमंडळात २० मंत्री अन् सभागृहात एकटेच; भास्कर जाधवांनी अब्दुल सत्तारांना घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 18:58 IST

Maharashtra Vidhan Sabha Live: कोकणातला मत्स्यविकास मंत्री नाही. ७२० किमी समुद्रकिनारा कोकणाला लाभला परंतु प्रत्येक वेळी मत्स्यविकास मंत्री बाहेरचे होते. ज्यांचा मच्छिमारीशी काहीही संबंध नाही असं भास्कर जाधव म्हणाले.

मुंबई - कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. १५७ शेतकऱ्यांचा मृत्यू पूरामुळे झाला आहे. अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. संपूर्ण नदीनं आपला प्रवाह बदलला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली. कोकणात ८ टक्क्याहून १२-१४ टक्के जमिनी उताराच्या आहेत. त्यामुळे मोठा गाळ नदीपात्रात जमा होतो असं शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत म्हटलं. 

विधानसभेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राची पूरस्थिती आणि शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने झालेले नुकसान यावर चर्चा सुरू होती. यावेळी भास्कर जाधव म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मृत्यूसह साडेपाचशे जनावरं मृत्युमुखी पडले आहेत. राज्यातील काही भागात दुबार पीक पेरणी होते. कोकणात दुबार पीक पेरणी होत नाही. कोकणातील शेतकरी कर्ज घेत नाही. त्यामुळं कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. निसर्गाच्या लहरीपणावर कोकणतील शेती आहे. मग कोकणातल्या शेतकऱ्यांना काय मदत करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

तसेच कोकणात १०-२० एकर शेती असणं म्हणजे सर्वात मोठा शेतकरी. सपाट जमीन नाही. एकाबाजूला समुद्रकिनारा, दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा त्या दोघांमधील जागा म्हणजे कोकण. कोकणातील शेतकऱ्यांना मदत करताना ३ गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. कोकणाची स्वतंत्र चर्चा कधीच सभागृहात झाली नाही. सरकारकडे उत्तर देण्यासारखं काही नाही असं भास्कर जाधव यांनी सभागृहात म्हटलं. 

दरम्यान, कोकणातला मत्स्यविकास मंत्री नाही. ७२० किमी समुद्रकिनारा कोकणाला लाभला परंतु प्रत्येक वेळी मत्स्यविकास मंत्री बाहेरचे होते. ज्यांचा मच्छिमारीशी काहीही संबंध नाही. आज सभागृहात चर्चा घडवत असताना हे सरकार शेतकऱ्यांबाबत किती गंभीर आहे ते मंत्र्यांच्या उपस्थितीवरून दिसून येते. मंत्रिमंडळात मंत्री २० आणि सभागृहात मंत्री कोण सगळ्या विषयात सर्वज्ञानी अब्दुल सत्तार आहे. मत्स्यविकास मंत्री असायला हवे होते असा टोला भास्कर जाधव यांनी सत्तारांना लगावला. त्याचसोबत मविआ सरकारनं कोरोना संकट असतानाही शेतकऱ्यांना मदत केली. चक्रीवादळात तेव्हाचे विरोधी पक्षनेते फडणवीस फिरत होते. परंतु केंद्राकडून मदत आणू शकले नाहीत. कोकण कर्ज घेत नाही. कर्ज घेतले असेल तर वेळेवर फेडतो. गुवाहाटीच्या अर्ध्या गप्पा नंतर बोला. त्यावर जास्त चर्चा नको. मंत्र्यांनी बोलताना विचार करावा मागील सरकारमध्ये तुम्हीही मंत्री होता असाही चिमटा जाधवांनी सत्तारांना काढला.  

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवAbdul Sattarअब्दुल सत्तार