शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

२० लाख क्विंटल तूर : तूर भरडाईच्या निविदांचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 02:47 IST

शासनाने खरेदी केलेल्या तुरीची भरडाई (डाळ बनविणे) करण्यासाठी महाराष्टÑ राज्य मार्केटिंग फेडरेशनने काढलेल्या निविदा प्रक्रियेत प्रचंड घोळ घातला गेला आहे. खास दुस-यांदा निविदा काढून मुंबईतील दोन संस्थांना भरडाईचे कंत्राट दिले गेले. मात्र मुळातच तेवढी क्षमता नसल्याने या संस्थांमार्फत तूर भरडाईचे काम गेल्या पाच महिन्यांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे.

- राजेश निस्तानमुंबई - शासनाने खरेदी केलेल्या तुरीची भरडाई (डाळ बनविणे) करण्यासाठी महाराष्टÑ राज्य मार्केटिंग फेडरेशनने काढलेल्या निविदा प्रक्रियेत प्रचंड घोळ घातला गेला आहे. खास दुस-यांदा निविदा काढून मुंबईतील दोन संस्थांना भरडाईचे कंत्राट दिले गेले. मात्र मुळातच तेवढी क्षमता नसल्याने या संस्थांमार्फत तूर भरडाईचे काम गेल्या पाच महिन्यांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे. पर्यायाने २० लाख क्ंिवटलपेक्षा अधिक तूर शासकीय गोदामांमध्ये पडून आहे.शासनाने २५ लाख क्ंिवटल तुरीची खरेदी केली. मात्र अनेक महिने पणन मंत्री, सचिव व मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांनी लक्ष न दिल्याने ही तूर पडून राहिली. अखेर या तुरीची डाळ बनवून ती शासकीय योजनांमध्ये वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मार्केटिंग फेडरेशनने तूर भरडाईची निविदा काढली. त्यात १३ दालमिलने सहभाग घेतला होता. मात्र मर्जीतील व्यापाºयांना काम देता यावे म्हणून तांत्रिक कारण दर्शवून पुन्हा निविदा काढल्या गेल्या. मुंबईतील राठी यांच्या सप्तश्रृंगी आणि गुप्ता यांच्या ईटीजी कंपनीला भरडाईचे कंत्राट दिले गेले. वास्तविक या दोनही कंपन्यांची २० लाख क्ंिवटल तूर भरडाईची क्षमताच नसल्याचे सांगितले जाते. प्रति क्ंिवटल तुरीमागे ६७.७५ टक्के उतारा (तूरडाळ) देण्याच्या अटीवर कंत्राट दिले गेले. मात्र या संस्थांच्या तूर भरडाईची गती प्रचंड मंद आहे. आतापर्यंत केवळ २ लाख क्ंिवटल तुरीची भरडाई झाली आहे. तर दुसरीकडे २० लाख क्ंिवटल तूर अद्यापही गोदामात पडून आहे. नव्याने खरेदी होत असलेली तूर साठवावी कुठे याचा पेच पणन व सहकार खात्यापुढे कायम आहे. वेळेत भरडाई होत नसतानाही त्या दोन कंत्राटदारांवर पणन खात्याने अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही.निकृष्ट डाळीचा पुरवठाशासकीय गोदामातील तुरीपासून बनविलेली दर्जेदार डाळ जादा किमतीत बाजारात विकली जात असून निकृष्ट दर्जाची डाळ शासनाला दिली जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. हीच निकृष्ट डाळ पोषण आहारातून लहान मुलांच्या पोटात जात आहे. सीआयडी चौकशी झाल्यास यातील मोठे घबाड उघड होईल.दुस-यांदा निविदाआतापर्यंत सव्वादोन लाख क्ंिवटल तुरीची भरडाई झाली आहे. मागणीनुसार ती करून दिली जात आहे. त्यासाठी वेळेचे बंधन नाही. भरडाईचे काम दोन महिन्यांपासूनच सुरू झाले आहे. १३ संस्था सक्षम नसल्याने दुसºयांदा निविदा काढावी लागली.- अनिल देशमुख, सरव्यवस्थापक, मार्केटिंग फेडरेशन, मुंबई.खरेदी केलेली १५०० क्विंटल तूर परत!पिंजर (अकोला) : नाफेडच्या पिंजर येथील केंद्रावर खरेदी केलेली १५०० क्विंटल तूर, वेअर हाउसने निकृष्ट ठरवत परत केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या केंद्रावर आठ हजार क्ंिवटल तुरीची खरेदी झाली होती. तूर परत आल्याने शेतकºयांचे चुकारेही लांबणीवर पडले आहेत. तुरीचा दर्जा उत्तम असतानाही परत केल्याने शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.

टॅग्स :newsबातम्याMaharashtraमहाराष्ट्रagricultureशेती