शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

२० लाख क्विंटल तूर : तूर भरडाईच्या निविदांचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 02:47 IST

शासनाने खरेदी केलेल्या तुरीची भरडाई (डाळ बनविणे) करण्यासाठी महाराष्टÑ राज्य मार्केटिंग फेडरेशनने काढलेल्या निविदा प्रक्रियेत प्रचंड घोळ घातला गेला आहे. खास दुस-यांदा निविदा काढून मुंबईतील दोन संस्थांना भरडाईचे कंत्राट दिले गेले. मात्र मुळातच तेवढी क्षमता नसल्याने या संस्थांमार्फत तूर भरडाईचे काम गेल्या पाच महिन्यांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे.

- राजेश निस्तानमुंबई - शासनाने खरेदी केलेल्या तुरीची भरडाई (डाळ बनविणे) करण्यासाठी महाराष्टÑ राज्य मार्केटिंग फेडरेशनने काढलेल्या निविदा प्रक्रियेत प्रचंड घोळ घातला गेला आहे. खास दुस-यांदा निविदा काढून मुंबईतील दोन संस्थांना भरडाईचे कंत्राट दिले गेले. मात्र मुळातच तेवढी क्षमता नसल्याने या संस्थांमार्फत तूर भरडाईचे काम गेल्या पाच महिन्यांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे. पर्यायाने २० लाख क्ंिवटलपेक्षा अधिक तूर शासकीय गोदामांमध्ये पडून आहे.शासनाने २५ लाख क्ंिवटल तुरीची खरेदी केली. मात्र अनेक महिने पणन मंत्री, सचिव व मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांनी लक्ष न दिल्याने ही तूर पडून राहिली. अखेर या तुरीची डाळ बनवून ती शासकीय योजनांमध्ये वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मार्केटिंग फेडरेशनने तूर भरडाईची निविदा काढली. त्यात १३ दालमिलने सहभाग घेतला होता. मात्र मर्जीतील व्यापाºयांना काम देता यावे म्हणून तांत्रिक कारण दर्शवून पुन्हा निविदा काढल्या गेल्या. मुंबईतील राठी यांच्या सप्तश्रृंगी आणि गुप्ता यांच्या ईटीजी कंपनीला भरडाईचे कंत्राट दिले गेले. वास्तविक या दोनही कंपन्यांची २० लाख क्ंिवटल तूर भरडाईची क्षमताच नसल्याचे सांगितले जाते. प्रति क्ंिवटल तुरीमागे ६७.७५ टक्के उतारा (तूरडाळ) देण्याच्या अटीवर कंत्राट दिले गेले. मात्र या संस्थांच्या तूर भरडाईची गती प्रचंड मंद आहे. आतापर्यंत केवळ २ लाख क्ंिवटल तुरीची भरडाई झाली आहे. तर दुसरीकडे २० लाख क्ंिवटल तूर अद्यापही गोदामात पडून आहे. नव्याने खरेदी होत असलेली तूर साठवावी कुठे याचा पेच पणन व सहकार खात्यापुढे कायम आहे. वेळेत भरडाई होत नसतानाही त्या दोन कंत्राटदारांवर पणन खात्याने अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही.निकृष्ट डाळीचा पुरवठाशासकीय गोदामातील तुरीपासून बनविलेली दर्जेदार डाळ जादा किमतीत बाजारात विकली जात असून निकृष्ट दर्जाची डाळ शासनाला दिली जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. हीच निकृष्ट डाळ पोषण आहारातून लहान मुलांच्या पोटात जात आहे. सीआयडी चौकशी झाल्यास यातील मोठे घबाड उघड होईल.दुस-यांदा निविदाआतापर्यंत सव्वादोन लाख क्ंिवटल तुरीची भरडाई झाली आहे. मागणीनुसार ती करून दिली जात आहे. त्यासाठी वेळेचे बंधन नाही. भरडाईचे काम दोन महिन्यांपासूनच सुरू झाले आहे. १३ संस्था सक्षम नसल्याने दुसºयांदा निविदा काढावी लागली.- अनिल देशमुख, सरव्यवस्थापक, मार्केटिंग फेडरेशन, मुंबई.खरेदी केलेली १५०० क्विंटल तूर परत!पिंजर (अकोला) : नाफेडच्या पिंजर येथील केंद्रावर खरेदी केलेली १५०० क्विंटल तूर, वेअर हाउसने निकृष्ट ठरवत परत केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या केंद्रावर आठ हजार क्ंिवटल तुरीची खरेदी झाली होती. तूर परत आल्याने शेतकºयांचे चुकारेही लांबणीवर पडले आहेत. तुरीचा दर्जा उत्तम असतानाही परत केल्याने शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.

टॅग्स :newsबातम्याMaharashtraमहाराष्ट्रagricultureशेती