शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् १४ चिनी नागरिकांचा जीव वाचला; चीननं मानले भारतीय नौदल आणि मुंबई कोस्ट गार्डचे आभार
2
'सोनम रघुवंशी म्हणत होती बिझी आहे, त्याला समजलंच नाही...!'; राजा रघुवंशीच्या मित्रानं केला मोठा खुलासा
3
विजेच्या धक्क्याने बाप गेलाच, दोन्ही मुलं पाणी घेऊन आली अन् त्यांचेही आयुष्य संपलं!
4
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
5
तुरुंगात जाणार हे माहित होते, सोनम हत्येपर्यंत का गेली? राजापासून वेगळे होण्याचे हे सोपे मार्ग होते..., पण...
6
मोठा दावा...! संकटात आलाय भारतातील हा मोठा व्यवसाय...! ५७७००० नोकऱ्या गेल्याचा अंदाज 
7
Raj Kushwaha : "राजचं नाव ऐकलं अन्..."; पोलिसांच्या एका ट्रिकने फेल झाला सोनमचा 'तो' प्लॅन
8
जयंत पाटील म्हणाले, मला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करा; CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
9
गेम खेळण्यासाठी मोबाईल देणं नाकारलं; आईवडिलांवर चिडलेल्या मुलीनं स्वतःलाच संपवलं!
10
सेन्सेक्स घसरला, निफ्टीची नाममात्र वाढ! 'या' शेअर्सनी केली कमाल, बाजारातून मोठे संकेत!
11
सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...
12
रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
13
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
14
Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं
15
ICICI आणि HDFC बँकेचा ग्राहकांना धक्का! एका निर्णयामुळे होणार लाखो रुपयांचे नुकसान?
16
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
17
Inspirational: 'या' तीन गोष्टी आजपासून फॉलो करा, पाच वर्षांनी लोक तुम्हाला फॉलो करतील!
18
भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं, त्याचीच ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनली कतरिना कैफ
19
अनिल अंबानींच्या कंपनीनं तोडला १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड, एकाच महिन्यात कमावले हजारो कोटी

नाशिकमध्ये लष्कराच्या भरतीसाठी प्रचंड गर्दी; 63 जागांसाठी 20 हजार तरुण आल्यानं गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 09:39 IST

हजारो तरुण आल्यानं चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती

नाशिक: सैन्य दलातल्या अवघ्या 63 जागांसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 20 हजार तरुण देवळाली कॅम्पमध्ये दाखल झाले असून तेथे दर वेळेप्रमाणे कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांना रस्त्यावरच रात्र काढावी लागली. यामुळे दाटीवाटीने चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाल्याने अखेर पहाटेपासूनच भरती प्रक्रियेसाठी प्राथमिक चाचणी सुरू करावी लागली आहे.लष्कराच्या भरतीसाठी होणारा गोंधळ नवा नसून दरवेळी भरतीच्या वेळी अशीच स्थिती पाहायला मिळते. काही वेळा तर गर्दी नियंत्रणात न आल्याने भरतीसाठी आलेल्या युवकांवर लाठीमारदेखील केला जातो. यंदा 63 जागांसाठी भरती प्रक्रिया होत असून त्यासाठीची चाचणी आजपासून होणार असल्याने देवळाली कॅम्प, संसरी गावाच्या रस्त्यावर रात्रीपासूनच तरुणांचे लोंढे येत आहेत. राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था नसल्याने त्यांना रस्त्यावरच रात्र काढावी लागली. अनेकांनी तर रस्त्यावरच चुली पेटवल्या. तरुणांची गर्दी वाढल्याने देवळाली कॅम्प परिसरात गोंधळाचे वातावरण असून नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांनी काठी उगारली तरी पळापळ होत असल्याचं चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे गोंधळ आणखी वाढला. यावेळी अनेक तरुण रस्त्याजवळच्या नाल्यात पडत होते. हजारो युवकांची गर्दी पाहून अखेरीस पहाटे चार वाजताच भरतीसाठी प्राथमिक चाचणी सुरू करण्यात आली आहे.आज महाराष्ट्रातून आलेल्या तरुणांची भरती होत असून उद्या राजस्थान आणि त्यानंतर अन्य राज्यांची भरती होणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया चार ते पाच दिवस चालणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान