शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

‘जनआरोग्य’मध्ये ५ लाखांच्या विम्यासाठी पाहा २ महिने वाट; उपचार दूरच, कवचही मिळेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 06:28 IST

राज्यातील १००० रुग्णालयांचा यात सहभाग, सरकारने फक्त पाठ थाेपटून घेतली

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून राज्यभरासाठी लागू केलेली महात्मा फुले जनआरोग्य योजना प्रत्यक्षात केवळ कागदावरच राहिली असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर ही योजना प्रत्यक्षात अंमलात येण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या योजनेअंतर्गत उपचारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच देत आले आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करून राज्य सरकारने स्वतःचे कौतुकही करून घेतले होते. योजना राज्य आरोग्य हमी सोसायटीतर्फे संपूर्ण राज्यात राबविली जाते. सार्वजनिक आरोग्य विभागाने त्यासंबंधीचा मोठा निर्णय २७ जुलै रोजी जाहीर केला.

विशेष म्हणजे, राज्यातील १००० रुग्णालयांचा यात सहभाग असून, आजाराची संख्या ९९६ वरून १३५६ इतकी केली. राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी योजना असून, सर्व अधिवास प्रमाणपत्रधारक (डोमिसाइल सर्टिफिकेट) कुटुंबांनाही ती लागू केली गेली आहे.सध्याच्या अस्तित्वात असलेल्या या योजनेसाठीचा सोसायटीकडून प्रीमियम युनायटेड इन्शुरन्स कंपनीला एका कुटुंबाकरिता ८५५ रुपये इतका सरकारतर्फे दिला जातो. त्याकरिता शासन वर्षाला या कंपनीला १७७० कोटी वर्षासाठी देते.  महाराष्ट्र आरोग्य पाहणी अहवालानुसार २ कोटी २२ लाख  या योजनेसाठी लाभार्थी ठरलेले आहे. एक कुटुंब म्हणजे ४ ते ५ व्यक्तींना हा लाभ मिळू शकतो.

योजनेच्या कार्डधारकांनाच लाभ

  • २०१२ साली सुरू झालेल्या या योजनेत गरीब रुग्णांना दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत आहेत. योजनेनुसार सध्या ९९६ आजारांचा समावेश असून, राज्यातील शासकीय व बिगर शासकीय मिळून एक हजार रुग्णालयांत ही योजना आहे.

राज्यात सध्या महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना कार्यान्वित आहेत. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत ५ लाखांचे आरोग्य विम्याचे कवच मिळते. मात्र, या योजनेचे कार्ड असलेले नागरिक किंवा त्यांचे नाव यापूर्वीच योजनेसाठी नोंदविण्यात आले आहे, त्यांनाच लाभ मिळतो. या योजनेसाठी नव्याने नोंदणी करता येत नाही.

पाच लाखांच्या नव्या याेजनेत आजाराची संख्या वाढविली आहे. सर्वांनाच ही योजना लागू आहे. आता इन्शुरन्स कंपनीला द्यावा लागणारा प्रीमियम बदलणार आहे. नवीन इन्शुरन्स कंपनी शोधून त्यांना सध्याच्या नवीन योजनेतील लाभार्थींची संख्या आणि कवच याची माहिती देऊन प्रीमियम द्यावा लागेल. निविदा प्रक्रियेचे काम सुरू केले आहे. ते दोन महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.- विनोद बोंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी

टॅग्स :Healthआरोग्यState Governmentराज्य सरकारhospitalहॉस्पिटल