शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

राज्यात ३३ कोटी १ लाख ३१ हजार ५३२ वृक्षलागवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 03:16 IST

वनविभागाची ५० कोटी वृक्षलागवड मोहीम फत्ते

चंद्रपूर : राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या वर्षीच्या ३३ कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाची पूर्तता झाली असून २५ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारपर्यंत ३३ कोटी एक लाख ३१ हजार ५३२ एवढी वृक्षलागवड राज्यात झाली आहे.हरित महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने राज्यात तीन वर्षांत ५० कोटी वृक्षलागवड करण्याचा निर्धार जाहीर केला होता. सन २०१६ मध्ये १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवड करण्याचे त्यांनी जाहीर केले होते. वृक्षारोपणाच्या या मोहिमेला जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला. राज्यात दोन कोटी ८३ लक्ष इतकी वृक्षलागवड करण्यात आली. त्यानंतर २०१७ मध्ये १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत चार कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला होता. या वेळीसुद्धा पाच कोटी ४३ लक्ष झाडे राज्यात लावण्यात आली. सन २०१८ मध्ये १ जुलै ते ३० जुलैपर्यंत १३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प करण्यात आला होता. या संकल्पाच्या पूर्ततेसाठीसुद्धा जनतेचा लक्षणीय सहभाग लाभला व राज्यात १५ कोटी ८८ लक्ष वृक्षलागवड करण्यात आली. या विक्रमी वृक्षलागवडीची नोंद ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’ने घेतली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ‘मन की बात’ या कार्यक्रमात या मोहिमेचे कौतुक केले.या वर्षी १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला होता. हा संकल्पसुद्धा ३० सप्टेंबरपूर्वीच पूर्ण झाला असून बुधवारी दुपारपर्यंत राज्यात ३३ कोटी १ लक्ष ३१ हजार ५३२ इतक्या वृक्षलागवडीची नोंद झाली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीन वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचा निर्धार पूर्ण केला आहे.हे लोकसहभागाचे यश - सुधीर मुनगंटीवार३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेच्या या यशाचे संपूर्ण श्रेय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील जनतेला दिले आहे. वृक्षलागवडीच्या उद्दिष्टपूर्तीचे हे यश लोकसहभागाचे आहे, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. वनविभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व घटकांचे त्यांनी आभार मानले आहेत.