शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

साडेसहा वर्षांत १९७ पोलिसांच्या आत्महत्या

By admin | Updated: August 8, 2016 05:19 IST

राज्य पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये सध्या अस्वस्थता व मानसिक ताणतणाव वाढत चालला आहे. त्यामुळे गेल्या साडे सहा वर्षांमध्ये तब्बल १९७ पोलिसांनी आत्महत्या केल्या आहेत

जमीर काझी, मुंबईराज्य पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये सध्या अस्वस्थता व मानसिक ताणतणाव वाढत चालला आहे. त्यामुळे गेल्या साडे सहा वर्षांमध्ये तब्बल १९७ पोलिसांनी आत्महत्या केल्या आहेत. यात अधिकाऱ्यांची संख्या ३५ आहे. गेल्या सहा महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते जून २०१६ अखेरपर्यंत दोघा अधिकाऱ्यांसह आठ जणांनी सेवेत असताना आयुष्य संपवले आहे. रविवारी पहाटे बोरीवली-चर्चगेट लोकलमध्ये महिलांच्या डब्यात बंदोबस्ताला असलेल्या कॉन्स्टेबल शिवाजी गायकवाडने मालाड आणि गोरेगाव स्टेशनच्या दरम्यान बंदुकीतून गोळी झाडत आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून वर्दीवाल्यांच्या ‘आॅनड्युटी’ आत्महत्यांचा तपशील मिळविला असता ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. बहुतांश घटनांमागे बंदोबस्त, कामाचा ताण, वरिष्ठ सहकाऱ्यांकडून होणारी पिळवणूक आणि कौटुंबिक कलह असल्याचे तपासातून पुढे आल्याचे गृह विभागातील सूत्रांनी सांगितले.राज्यातील ११ कोटींहून अधिक नागरिकांच्या वित्त व जीविताच्या हमीसाठी २ लाखांवर पोलिसांचा फौजफाटा कार्यरत आहे. मात्र, खात्यांतर्गत सुंदोपसुंदी, गटबाजी वाढत आहे. अवेळी आणि सलग अनेक तास करावी लागणारी ड्युटी, विविध प्रकारचे बंदोबस्त, यामुळे साप्ताहिक सुट्टीवर येणारी गदा, वरिष्ठ अधिकाऱ्यांची मनमानी यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील मानसिक तणाव वाढत आहे. त्याचा परिणाम कुटुंबावर, वैयक्तिक जीवनावर होत आहे. कौटुंबिक कलह वाढल्याने आत्महत्या करण्याची मनोवृत्ती वाढली आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१० ते जून २०१६ या कालावधीत १९७ जणांनी आयुष्याचा अंत करून घेतला आहे. उपनिरीक्षक ते आयपीएस दर्जापर्यंतचे ३५ अधिकारी तर कॉन्स्टेबल ते सहायक फौजदारपदापर्यंतचे १६२ कर्मचारी यांनी जीवन संपवले आहे....तरच आत्महत्येचे प्रमाण घटेलवरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या कौटुंबिक, वैयक्तिक अडीअडचणी लक्षात घेऊन त्या सोडविल्या पाहिजेत, त्यांच्यावरील कामाचा अतिरिक्त ताण, मानसिक त्रास कमी झाला तरच आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल, असे निवृत्त विशेष महानिरीक्षक डॉ. माधव सानप यांनी सांगितले.