शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

साडेसहा वर्षांत १९७ पोलिसांच्या आत्महत्या

By admin | Updated: August 8, 2016 05:19 IST

राज्य पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये सध्या अस्वस्थता व मानसिक ताणतणाव वाढत चालला आहे. त्यामुळे गेल्या साडे सहा वर्षांमध्ये तब्बल १९७ पोलिसांनी आत्महत्या केल्या आहेत

जमीर काझी, मुंबईराज्य पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये सध्या अस्वस्थता व मानसिक ताणतणाव वाढत चालला आहे. त्यामुळे गेल्या साडे सहा वर्षांमध्ये तब्बल १९७ पोलिसांनी आत्महत्या केल्या आहेत. यात अधिकाऱ्यांची संख्या ३५ आहे. गेल्या सहा महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते जून २०१६ अखेरपर्यंत दोघा अधिकाऱ्यांसह आठ जणांनी सेवेत असताना आयुष्य संपवले आहे. रविवारी पहाटे बोरीवली-चर्चगेट लोकलमध्ये महिलांच्या डब्यात बंदोबस्ताला असलेल्या कॉन्स्टेबल शिवाजी गायकवाडने मालाड आणि गोरेगाव स्टेशनच्या दरम्यान बंदुकीतून गोळी झाडत आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून वर्दीवाल्यांच्या ‘आॅनड्युटी’ आत्महत्यांचा तपशील मिळविला असता ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. बहुतांश घटनांमागे बंदोबस्त, कामाचा ताण, वरिष्ठ सहकाऱ्यांकडून होणारी पिळवणूक आणि कौटुंबिक कलह असल्याचे तपासातून पुढे आल्याचे गृह विभागातील सूत्रांनी सांगितले.राज्यातील ११ कोटींहून अधिक नागरिकांच्या वित्त व जीविताच्या हमीसाठी २ लाखांवर पोलिसांचा फौजफाटा कार्यरत आहे. मात्र, खात्यांतर्गत सुंदोपसुंदी, गटबाजी वाढत आहे. अवेळी आणि सलग अनेक तास करावी लागणारी ड्युटी, विविध प्रकारचे बंदोबस्त, यामुळे साप्ताहिक सुट्टीवर येणारी गदा, वरिष्ठ अधिकाऱ्यांची मनमानी यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील मानसिक तणाव वाढत आहे. त्याचा परिणाम कुटुंबावर, वैयक्तिक जीवनावर होत आहे. कौटुंबिक कलह वाढल्याने आत्महत्या करण्याची मनोवृत्ती वाढली आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१० ते जून २०१६ या कालावधीत १९७ जणांनी आयुष्याचा अंत करून घेतला आहे. उपनिरीक्षक ते आयपीएस दर्जापर्यंतचे ३५ अधिकारी तर कॉन्स्टेबल ते सहायक फौजदारपदापर्यंतचे १६२ कर्मचारी यांनी जीवन संपवले आहे....तरच आत्महत्येचे प्रमाण घटेलवरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या कौटुंबिक, वैयक्तिक अडीअडचणी लक्षात घेऊन त्या सोडविल्या पाहिजेत, त्यांच्यावरील कामाचा अतिरिक्त ताण, मानसिक त्रास कमी झाला तरच आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल, असे निवृत्त विशेष महानिरीक्षक डॉ. माधव सानप यांनी सांगितले.