शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

काेराेना काळात हाॅटेल, रेस्टाॅरंटला १९० लाख कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 05:25 IST

CoronaVirus News: तज्ज्ञांचे मत : काेराेनाचा फटका, सावरण्यासाठी लागणार माेठा अवधी

n  सचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी गेल्या आठ महिन्यांत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्राचे सुमारे १९० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हॉटेल क्षेत्र पूर्वीप्रमाणे उभे राहण्यास कमीतकमी दीड वर्षाचा तर रेस्टॉरंट क्षेत्र उभे राहण्यास कमीतकमी सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.कोरोनासह लॉकडाऊनमुळे ३० ते ४० टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट कायमस्वरूपी बंद झाली आहेत; किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ४० ते ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.त्यांना रोजगार देणारे क्षेत्रच रसातळाला गेले आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कामगार काम करतात. ही संख्या सुमारे ७० टक्के आहे. स्थानिक कामगार कमी संख्येने या क्षेत्रात आहेत, अशी माहिती हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाने दिली.लॉकडाऊन शिथिल होत असले तरी अद्याप स्थलांतरित कामगार परत आलेले नाहीत. कारण रेल्वे अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास बराच अवधी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.दरम्यान, मालमत्ता करात १ वर्षाची सवलत द्यावी, मार्च ते सप्टेंबर २०२० पर्यंत हॉस्पिटॅलिटी उद्योगासाठी व्याज माफ करावे, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.सरकारचे प्रयत्न उल्लेखनीयविमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली तर कदाचित काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद ठेवावे लागले हे खरे, मात्र महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा समूळ नाश करण्यासाठी उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत.- गुरुबक्ष सिंग कोहली, प्रवक्ता, हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhotelहॉटेल