शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार!

By जमीर काझी | Updated: September 27, 2020 19:38 IST

येत्या 30 सप्टेंबरपर्यंत बदल्या करण्यासाठीची मुदत आहे. तोपर्यंत त्याबाबत एकमत होणार की त्यासाठी  मुदतवाढीचा आणखी 'फार्स ' केला जाणार?, याबाबत पोलीस वर्तुळात चर्चा सुरु आहे.

ठळक मुद्देयेत्या 30 सप्टेंबरपर्यंत बदल्या करण्यासाठीची मुदत आहे.आयपीएस दर्जाचे अधिकारी इतक्या मोठया प्रमाणात एकाचवेळी 'वेटिंग 'वर राहण्याची राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटनासरकारमधील तीनही पक्षाच्या नेत्यातील एकमत न झाल्याने नियुक्त्या रखडल्या

जमीर काझी 

मुंबई - कोरोनाच्या महामारीत सरकारी तिजोरीत खडखडाटामुळे शासनाने एकीकडे विकास कामावर निर्बंध लादली असताना राज्यातील 17 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना मात्र कसल्याही जबाबदारीविना त्यांच्या वेतनापोटी कोट्यवधी खर्च करीत आहे. बदलीनंतर त्यांची इतरत्र नियुक्ती न केल्याने त्यांना प्रतीक्षेत राहून पूर्ण पगार मिळत आहे. 

येत्या 30 सप्टेंबरपर्यंत बदल्या करण्यासाठीची मुदत आहे. तोपर्यंत त्याबाबत एकमत होणार की त्यासाठी  मुदतवाढीचा आणखी 'फार्स ' केला जाणार?, याबाबत पोलीस वर्तुळात चर्चा सुरु आहे. आयपीएस दर्जाचे अधिकारी  इतक्या मोठया प्रमाणात एकाचवेळी  'वेटिंग 'वर राहण्याची राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. यंदा पोलिसांच्या बदल्याना पहिल्यांदा 2 सप्टेंबरला  'मुहूर्त ' मिळाला. त्यावेळी सहा अधिकाऱ्यांना नियुक्तीविना कार्यरत असलेल्या  पदावरून हटविण्यात आले. त्यानंतर 17 सप्टेंबरला एक अधिकारी वगळता इतरांना पोस्टिंग देण्यात आले.परंतु  त्याचवेळी 16 वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटविले. मात्र त्यांना अन्यत्र नियुक्ती न देता प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. सरकारमधील तीनही पक्षाचे नेत्यातील एकमत आणि पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांची संमती मिळेपर्यत या सर्वांना 'विना काम फुल पगार मिळत राहणार आहे. 

वास्तविक 17 नव्हे 18 आयपीएस अधिकारी  पोस्टिंग करावयाची आहे. एटीसचे प्रमुख देवेन भारती यांची 2 सप्टेंबरला बदलीचा आदेश काढण्यात आला. मात्र त्याची  नवीन  नियुक्तीचे ठिकाण दाखविले नाही, त्याचप्रमाणे त्याच्या जागेवर अन्य अधिकाऱ्याची नियुक्ती केली नसल्याने तेच अद्याप एटीएसचा कार्यभार सांभाळीत आहेत. त्याचवेळी  बदली झालेले मुंबईतील सहआयुक्त (प्रशासन ) नवल बजाज यांनाही अद्याप पदोन्नती दिलेली नाही  त्यांची व  मागील सरकारच्या काळात  बाजूला असलेल्या  फ़ोर्सवनचे  प्रमुख सुखवीदर सिंग याची एटीएसमध्ये नियुक्ती केली जाण्याची चर्चा  आहे. 

डीजी गॅझेटही प्रलंबित 

 17 आयपीएस अधिकाऱ्यांबरोबरच अप्पर अधीक्षक, उपअधीक्षक यांच्या आणि महासंचालक कार्यालयतून होणाऱ्या निरीक्षक, एपीआय, पीएसआयच्या बदल्या 30 सप्टेंबरपर्यंत काढल्या जाणार का, याबाबत संदिग्धता आहे. त्यांच्यानंतर आयुक्तालय आणि अधीक्षक कार्यालयातील बदल्या होतील, मात्र सरकार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुस्ताईमुळे गरजू आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांना अन्याय सहन करावा लागत  आहे. 

हे अधिकारी पोस्टिंगच्या प्रतीक्षेत 

अप्पर महासंचालक प्रशांत बुरडे ( होमगार्ड ),  सहआयुक्त नवल बजाज (प्रशासन ), विशेष महानिरीक्षक कैसर खालिद (पीसीआर),  शिवाजी राठोड (ठाणे ग्रामीण ), अखिलेशकुमार सिंग (अहमदनगर ),  पंजाबराव उगले ( जळगाव ) सुहेल शर्मा (सांगली ),  एस चेतन्य ( जालना ) हर्ष पोतदार ( बीड ),  विजय मगर ( नांदेड ),  कृष्णकात उपाध्याय ( परभणी ),  योगेशकुमार गुप्ता ( हिंगोली ),  बावराज तेली ( वर्धा ),  एमसीव्ही महेशवर रेड्डी (चंद्रपुर ), मंगेश शिंदे ( गोदीया ), एम राजकुमार ( यवतमाळ), व  राजेंद्र माने(लातूर )

टॅग्स :Policeपोलिसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी