शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

१७ जागांची अधिसूचना; उमेदवारांचा पत्ताच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 07:09 IST

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील १७ मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली, तरी काँग्रेसचा एक अपवाद वगळता चारही प्रमुख पक्षांनी उमेदवारच जाहीर केलेले नाहीत.

विशेष प्रतिनिधीमुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील १७ मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली, तरी काँग्रेसचा एक अपवाद वगळता चारही प्रमुख पक्षांनी उमेदवारच जाहीर केलेले नाहीत. उमेदवारीवरून असलेले पक्षांतर्गत वाद, प्रतिस्पर्धी उमेदवार कोण, यासाठी होत असलेली प्रतीक्षा आणि जातीय समीकरणे आदी कारणांमुळे भाजपासारख्या पक्षालादेखील उमेदवार जाहीर करता आलेले नाहीत.नागपूर, रामटेक, वर्धा, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, यवतमाळ-वाशिम व चंद्रपूर या सात मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारी सुरुवात झाली. बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूरमध्ये मंगळवारी ही प्रक्रिया सुरू झाली. मात्र, लढतीतील काँग्रेस, राष्टÑवादी, भाजपा आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षांपैकी काँग्रेसने नागपुरातून नाना पटोले, गडचिरोली-चिमूर येथून नामदेव उसेंडी यांच्याशिवाय कोणाचीही उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही.भाजपा-शिवसेना युतीमध्ये १७ पैकी १० जागा भाजपा, तर ७ जागा शिवसेना लढत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे तर नेमके जागावाटपही अद्याप जाहीर झालेले नाही. दोन टप्प्यांतील १७ पैकी १० जागा विदर्भातील आहेत. मुख्यमंत्री (पान १० वर)१३ राज्यांत १८ एप्रिलला मतदान; दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारीलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशाच्या तेरा राज्यांमधील ९७ मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकांच्या दुसºया टप्प्यासाठी १८ एप्रिलला होणाºया मतदानासाठी मंगळवारी निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली. दुसºया टप्प्यात महाराष्ट्रातील १0 मतदारसंघांतही मतदान होणार आहे.मतदान कधी?पहिला टप्पा11एप्रिलदुसरा टप्पा18 एप्रिलपहिला टप्पानागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारी सुरुवात झाली.दुसरा टप्पा : बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूरमध्ये मंगळवारी ही प्रक्रिया सुरू झाली. मात्र, लढतीतील काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षांपैकी नागपुरातून काँग्रेसचे नाना पटोले यांच्याशिवाय कोणाचीही उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही.दुसºया टप्प्याचाकार्यक्रम असाउमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारी सुरुवात झाली असून, २६ मार्च ही अंतिम मुदत आहे. उमेदवारी अर्जांची छाननी २७ मार्च रोजी होणार असून, अर्ज मागे घ्यायची मुदत २९ मार्च आहे. या ९७ मतदारसंघांमध्ये किती उमेदवार रिंगणात असतील, याचे चित्र २९ मार्च रोजी स्पष्ट होईल.दुसºया टप्प्यातकुठे निवडणुकातामिळनाडू (३९ जागा), कर्नाटक (१४), महाराष्ट्र (१०), उत्तर प्रदेश (८), आसाम (५), ओडिशा (५), बिहार (५), छत्तीसगड (३), जम्मू-काश्मीर (२), मणिपूर (१), त्रिपुरा (१), पुडुचेरी (१), पश्चिम बंगाल (३) या तेरा राज्यांत मतदान होईल. 

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र