शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

१७ जागांची अधिसूचना; उमेदवारांचा पत्ताच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 07:09 IST

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील १७ मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली, तरी काँग्रेसचा एक अपवाद वगळता चारही प्रमुख पक्षांनी उमेदवारच जाहीर केलेले नाहीत.

विशेष प्रतिनिधीमुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील १७ मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली, तरी काँग्रेसचा एक अपवाद वगळता चारही प्रमुख पक्षांनी उमेदवारच जाहीर केलेले नाहीत. उमेदवारीवरून असलेले पक्षांतर्गत वाद, प्रतिस्पर्धी उमेदवार कोण, यासाठी होत असलेली प्रतीक्षा आणि जातीय समीकरणे आदी कारणांमुळे भाजपासारख्या पक्षालादेखील उमेदवार जाहीर करता आलेले नाहीत.नागपूर, रामटेक, वर्धा, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, यवतमाळ-वाशिम व चंद्रपूर या सात मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारी सुरुवात झाली. बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूरमध्ये मंगळवारी ही प्रक्रिया सुरू झाली. मात्र, लढतीतील काँग्रेस, राष्टÑवादी, भाजपा आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षांपैकी काँग्रेसने नागपुरातून नाना पटोले, गडचिरोली-चिमूर येथून नामदेव उसेंडी यांच्याशिवाय कोणाचीही उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही.भाजपा-शिवसेना युतीमध्ये १७ पैकी १० जागा भाजपा, तर ७ जागा शिवसेना लढत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे तर नेमके जागावाटपही अद्याप जाहीर झालेले नाही. दोन टप्प्यांतील १७ पैकी १० जागा विदर्भातील आहेत. मुख्यमंत्री (पान १० वर)१३ राज्यांत १८ एप्रिलला मतदान; दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारीलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशाच्या तेरा राज्यांमधील ९७ मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकांच्या दुसºया टप्प्यासाठी १८ एप्रिलला होणाºया मतदानासाठी मंगळवारी निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केली. दुसºया टप्प्यात महाराष्ट्रातील १0 मतदारसंघांतही मतदान होणार आहे.मतदान कधी?पहिला टप्पा11एप्रिलदुसरा टप्पा18 एप्रिलपहिला टप्पानागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारी सुरुवात झाली.दुसरा टप्पा : बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूरमध्ये मंगळवारी ही प्रक्रिया सुरू झाली. मात्र, लढतीतील काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना या चार प्रमुख पक्षांपैकी नागपुरातून काँग्रेसचे नाना पटोले यांच्याशिवाय कोणाचीही उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही.दुसºया टप्प्याचाकार्यक्रम असाउमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवारी सुरुवात झाली असून, २६ मार्च ही अंतिम मुदत आहे. उमेदवारी अर्जांची छाननी २७ मार्च रोजी होणार असून, अर्ज मागे घ्यायची मुदत २९ मार्च आहे. या ९७ मतदारसंघांमध्ये किती उमेदवार रिंगणात असतील, याचे चित्र २९ मार्च रोजी स्पष्ट होईल.दुसºया टप्प्यातकुठे निवडणुकातामिळनाडू (३९ जागा), कर्नाटक (१४), महाराष्ट्र (१०), उत्तर प्रदेश (८), आसाम (५), ओडिशा (५), बिहार (५), छत्तीसगड (३), जम्मू-काश्मीर (२), मणिपूर (१), त्रिपुरा (१), पुडुचेरी (१), पश्चिम बंगाल (३) या तेरा राज्यांत मतदान होईल. 

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र