शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

आरक्षण प्रतिज्ञापत्रासाठी १७ महिन्यांचा विलंब का?- पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 02:06 IST

सरकारने मराठा समाजाची माफी मागावी, असे चव्हाण म्हणाले

कऱ्हाड (जि.सातारा): मराठा आरक्षणाबाबत न्यायालायात एक प्रतिज्ञापत्र द्यायला राज्यातील भाजप सरकारने १७ महिन्यांचा विलंब लावला. या बेजबाबदारीबाबत त्यांनी पहिल्यांदा मराठा समाजाची माफी मागायला पाहिजे,’ अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.चव्हाण म्हणाले, ‘मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी तशी जुनीच आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या प्रश्नात चांगले लक्ष घातले. छत्रपती शाहू महाराजांच्या आरक्षणापासून मराठा आरक्षणाची काय परिस्थिती होती, याची माहिती घेतली. ५२ टक्के घटनात्मक आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देता येऊ शकते. हे लक्षात आल्यावर मंत्रीसमिती गठीत केली, त्याचा अहवाल मागविला. दरम्यान, आमचे सरकार गेल्याने हा निर्णय होऊ शकला नाही. तोपर्यंत काहीजण याविरोधात कोर्टात गेले. कोर्टाने या नव्या सरकारला एक प्रतिज्ञापत्र मागितले होते. ते द्यायला यांनी १७ महिन्यांचा विलंब लावला.देशात मोदी व राज्यात फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून नुसत्याच घोषणा केल्या. रोजगार निर्मितीचे स्वप्न दाखवले. मात्र, आज युवकांच्या हाती रोजगार नाही. केंद्र सरकारने तर शेतकऱ्यांना हमीभावाचं गाजर दाखवलं आहे. ऊसदर व दूधदराबाबत राज्य सरकारने नुसती शेतकºयांची फसवणूक केली आहे. मोदी सरकारकडून नुसत्या घोषणा देऊन जाहिरात करण्याचे काम केले जाते. मात्र, आता जनता यांच्या फसव्या घोषणांना व जाहिरातींना भूलणार नाही, असेही ते म्हणाले.‘एकास एक’ लढतीचा प्रयत्नभाजपाला रोखण्यास समविचारी पक्षांची आघाडी गरजेची आहे. प्रत्येक ठिकाणी एकास एक लढत होईल, असे प्रयत्न आम्ही करणार असल्याचे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.शिवसेनेशी आघाडी अशक्यकाँगे्रस व शिवसेना हे दोन्ही पक्ष सध्या भाजपच्या कारभारावर नाराज आहेत. आमच्या दोघांच्यात हा एक समान धागा असला तरी त्यांच्या व आमच्या पक्षाचे विचार, ध्येय, धोरणे हे वेगवेगळे असल्याने आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी आघाडी ही अशक्यच असल्याचे मत चव्हाण यांनी मांडले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा