शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

आरक्षण प्रतिज्ञापत्रासाठी १७ महिन्यांचा विलंब का?- पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 02:06 IST

सरकारने मराठा समाजाची माफी मागावी, असे चव्हाण म्हणाले

कऱ्हाड (जि.सातारा): मराठा आरक्षणाबाबत न्यायालायात एक प्रतिज्ञापत्र द्यायला राज्यातील भाजप सरकारने १७ महिन्यांचा विलंब लावला. या बेजबाबदारीबाबत त्यांनी पहिल्यांदा मराठा समाजाची माफी मागायला पाहिजे,’ अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.चव्हाण म्हणाले, ‘मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी तशी जुनीच आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या प्रश्नात चांगले लक्ष घातले. छत्रपती शाहू महाराजांच्या आरक्षणापासून मराठा आरक्षणाची काय परिस्थिती होती, याची माहिती घेतली. ५२ टक्के घटनात्मक आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देता येऊ शकते. हे लक्षात आल्यावर मंत्रीसमिती गठीत केली, त्याचा अहवाल मागविला. दरम्यान, आमचे सरकार गेल्याने हा निर्णय होऊ शकला नाही. तोपर्यंत काहीजण याविरोधात कोर्टात गेले. कोर्टाने या नव्या सरकारला एक प्रतिज्ञापत्र मागितले होते. ते द्यायला यांनी १७ महिन्यांचा विलंब लावला.देशात मोदी व राज्यात फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून नुसत्याच घोषणा केल्या. रोजगार निर्मितीचे स्वप्न दाखवले. मात्र, आज युवकांच्या हाती रोजगार नाही. केंद्र सरकारने तर शेतकऱ्यांना हमीभावाचं गाजर दाखवलं आहे. ऊसदर व दूधदराबाबत राज्य सरकारने नुसती शेतकºयांची फसवणूक केली आहे. मोदी सरकारकडून नुसत्या घोषणा देऊन जाहिरात करण्याचे काम केले जाते. मात्र, आता जनता यांच्या फसव्या घोषणांना व जाहिरातींना भूलणार नाही, असेही ते म्हणाले.‘एकास एक’ लढतीचा प्रयत्नभाजपाला रोखण्यास समविचारी पक्षांची आघाडी गरजेची आहे. प्रत्येक ठिकाणी एकास एक लढत होईल, असे प्रयत्न आम्ही करणार असल्याचे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.शिवसेनेशी आघाडी अशक्यकाँगे्रस व शिवसेना हे दोन्ही पक्ष सध्या भाजपच्या कारभारावर नाराज आहेत. आमच्या दोघांच्यात हा एक समान धागा असला तरी त्यांच्या व आमच्या पक्षाचे विचार, ध्येय, धोरणे हे वेगवेगळे असल्याने आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी आघाडी ही अशक्यच असल्याचे मत चव्हाण यांनी मांडले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा