शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

कृषी पंपांचे १५ हजार कोटींचे वीजबिल माफ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 06:55 IST

ऊर्जा विभागाने केंद्र सरकारकडे १० हजार कोटींच्या अनुदानाची सातत्याने मागणी केली, पण दाद मिळाली नाही. राज्याला केंद्राकडून जीएसटीचे २८ हजार कोटी रुपये यायचे आहेत.

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कृषी पंपधारक शेतकऱ्यांना वीज बिलात माफी व सवलती देण्याचा जो निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना १५ हजार कोटी रुपयांची एकूण माफी मिळणार असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी सांगितले. 

पत्रपरिषदेत बोलताना ते म्हणाले की, राज्यात ४२ लाख कृषी पंपधारकांची ४२ हजार १६० कोटी रुपये थकबाकी आहे. त्यापैकी १५ हजार कोटी रुपयांचे वीजबिल माफ करणार आहोत. कृषी पंपधारकांकडून जी थकबाकी वसूल केली जाईल, त्यातील ६६ टक्के निधी गाव आणि सर्कलच्या पायाभूत सुविधांसाठी वापरण्यात येणार आहे. हा निधी वाटप करण्याचा अधिकार संबंधित पालकमंत्र्यांना असेल. ग्रामपंचायतीशी सांगड घालूनच हा पायाभूत विकास करण्यात येणार आहे.

ऊर्जा विभागाने केंद्र सरकारकडे १० हजार कोटींच्या अनुदानाची सातत्याने मागणी केली, पण दाद मिळाली नाही. राज्याला केंद्राकडून जीएसटीचे २८ हजार कोटी रुपये यायचे आहेत. राज्यातील भाजपवाल्यांना आंदोलन करायचेच असेल तर त्यांनी केंद्राविरुद्ध करावे,  असे आवाहनही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले.

मुंबई वीजखंडितचा अहवाल कॅबिनेटमध्येमुंबईत वीजपुरवठा खंडितप्रकरणी राज्य समितीचा चौकशी अहवाल आपल्याकडे आला आहे. मात्र, तो आधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल. केंद्रीय समितीचा अहवाल अद्याप यावयाचा आहे. तो आल्यानंतरच आपण अहवालातील निष्कर्ष उघड करू. असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून जगातील नामवंत शहरांमध्ये कोणती यंत्रणा वापरली जाते याचा अभ्यासही सुरू असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतFarmerशेतकरी