शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

देशात १५० लाख टन साखर राहणार शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 06:40 IST

सलग दुसऱ्या वर्षी भरघोस उत्पादन झाल्याने यंदाही देशात तब्बल १४७ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहील, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केला आहे.

पुणे : सलग दुसऱ्या वर्षी भरघोस उत्पादन झाल्याने यंदाही देशात तब्बल १४७ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहील, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केला आहे. राज्यात ६० लाख टन साखर शिल्लक राहील, असे सांगण्यात येत आहे. देशातील साखरेचे उत्पादन ३२२ लाख टनांवर पोहचले आहे.गेल्या वर्षीच्या (२०१७-१८) हंगामात देशात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यावेळच्या विक्रमी साखर उत्पादनामुळे देशात तब्बल १०७ लाख टन साखर शिल्लक होती. यंदाही ३२० लाख टनांवर उत्पादन पोहोचले आहे. गेल्यावर्षीच्या हंगामातही राज्यात १०७ लाख २० हजार टन साखर उत्पादित झाली होती. त्यामुळे हंगाम सुरू होण्यापूर्वी आॅक्टोबर २०१८मध्ये तब्बल ५३.३६ लाख टन साखर राज्यात शिल्लक होती. यंदाच्या हंगामातही राज्यात १०७ लाख १० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. परिणामी तब्बल ६० लाख टन साखर शिल्लक राहील.उत्तरप्रदेशात एप्रिल अखेरीस तब्बल ११२.६५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. येथील ११९ पैकी ६८ कारखाने सुरू होते. त्यामुळे येथील साखर उत्पादनात आणखी वाढ होईल. उत्तर प्रदेशापाठोपाठ दुसºया क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रातील गाळप हंगाम संपुष्टात आला आहे. कर्नाटकातील हंगामही संपला असून, येथे ३२.२० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गुजरातमध्ये ११.१९, तमिळनाडू ७.०५, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा ७.६०, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडने ५.३०, बिहार, पंजाब आणि हरयाणात अनुक्रमे ८.३५, ७.७० आाणि ६.७५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे.यंदा ३0 लाख टनांची निर्यातयंदा देशात ३३० लाख टन साखर उत्पादन होईल. देशांतर्गत साखरेचा खप २६० लाख टन असून, निर्यात ३० लाख टनांची होईल. यावर्षीचा आणि गतवर्षीचा शिल्लक साठ्यामुळे यंदाही १४७ लाख टन साखर शिल्लक राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेagricultureशेती