शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
2
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
3
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
4
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
5
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
6
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
7
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
8
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
9
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
10
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
11
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
12
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
13
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
14
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
15
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
16
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
17
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
18
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
19
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
20
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनासाठी १५ हजार कोटींचे कर्जरोखे

By admin | Updated: September 17, 2016 03:31 IST

राज्यातील ३२७ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्याचा निर्णय शासनाने शुक्रवारी घेतला.

मुंबई : राज्यातील ३२७ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्याचा निर्णय शासनाने शुक्रवारी घेतला. २००२नंतर पहिल्यांदाच सिंचन प्रकल्पांसाठी कर्जरोखे काढण्यात येणार आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, कर्जरोखे काढण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीच मान्यता दिली. हे कर्जरोखे वित्तीय संस्थांकडून उभारण्यात येतील. त्यामुळे प्रकल्पांसाठी एकाचवेळी मोठी रक्कम उपलब्ध होऊ शकेल. ३२७ प्रकल्पांच्या उभारणीसाठी एकूण ५७ हजार ४०० कोटींची आवश्यकता आहे. त्यातील १२ हजार ७७३ कोटी रुपये नाबार्डकडून कर्ज स्वरूपात मिळणार आहेत. ३ हजार ८३० कोटींचे अनुदान केंद्र सरकार देणार आहे. राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून येत्या साडेतीन वर्षांत जवळपास २४ हजार कोटी रुपये उपलब्ध होतील. याशिवाय १५ हजार कोटी रुपये कर्जरोख्यांद्वारे उपलब्ध होणार आहेत. दुष्काळग्रस्त आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १२ हजार कोटींच्या अनुदानाचे पॅकेज राज्य शासनाने केंद्राकडे मागितले आहे. गेल्याच आठवड्यात केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांच्याकडे मी तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात जाऊन चर्चा केली आहे. लवकरच हा निधी मिळेल, अशी आशा आहे. हा निधी मिळाल्यानंतर ३२७ सिंचन प्रकल्प पूर्ण होण्यात अडचण भासणार नाही, असेही महाजन म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)