शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

सिंचनासाठी १५ हजार कोटींचे कर्जरोखे

By admin | Updated: September 17, 2016 03:31 IST

राज्यातील ३२७ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्याचा निर्णय शासनाने शुक्रवारी घेतला.

मुंबई : राज्यातील ३२७ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचे कर्जरोखे उभारण्याचा निर्णय शासनाने शुक्रवारी घेतला. २००२नंतर पहिल्यांदाच सिंचन प्रकल्पांसाठी कर्जरोखे काढण्यात येणार आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, कर्जरोखे काढण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीच मान्यता दिली. हे कर्जरोखे वित्तीय संस्थांकडून उभारण्यात येतील. त्यामुळे प्रकल्पांसाठी एकाचवेळी मोठी रक्कम उपलब्ध होऊ शकेल. ३२७ प्रकल्पांच्या उभारणीसाठी एकूण ५७ हजार ४०० कोटींची आवश्यकता आहे. त्यातील १२ हजार ७७३ कोटी रुपये नाबार्डकडून कर्ज स्वरूपात मिळणार आहेत. ३ हजार ८३० कोटींचे अनुदान केंद्र सरकार देणार आहे. राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून येत्या साडेतीन वर्षांत जवळपास २४ हजार कोटी रुपये उपलब्ध होतील. याशिवाय १५ हजार कोटी रुपये कर्जरोख्यांद्वारे उपलब्ध होणार आहेत. दुष्काळग्रस्त आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १२ हजार कोटींच्या अनुदानाचे पॅकेज राज्य शासनाने केंद्राकडे मागितले आहे. गेल्याच आठवड्यात केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांच्याकडे मी तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात जाऊन चर्चा केली आहे. लवकरच हा निधी मिळेल, अशी आशा आहे. हा निधी मिळाल्यानंतर ३२७ सिंचन प्रकल्प पूर्ण होण्यात अडचण भासणार नाही, असेही महाजन म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)