शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

मराठवाड्यात १५ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: October 13, 2015 04:06 IST

मराठवाड्यातील लहानमोठ्या धरणांमध्ये १५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांतील परतीच्या पावसाने हा पाणीसाठा ८ टक्क्यांवरून १५ टक्के झाला असला तरी दुष्काळाचे सावट मात्र कायम आहे.

मुंबई : मराठवाड्यातील लहानमोठ्या धरणांमध्ये १५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांतील परतीच्या पावसाने हा पाणीसाठा ८ टक्क्यांवरून १५ टक्के झाला असला तरी दुष्काळाचे सावट मात्र कायम आहे. राज्यातील धरणांमध्ये सरासरी ५६ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी हा साठा तब्बल ७९ टक्के होता. याचा अर्थ पाणीसाठ्याबाबत राज्याची एकूणच अवस्था चिंतित करणारी आहे. पुणे विभागात ६१ टक्के पाणीसाठा आहे. सर्वांत चांगली स्थिती आहे ती कोकणची. तेथे ८८ टक्के पाणीसाठा आहे. नागपूर विभाग ७० टक्के, अमरावती ७२ टक्के, नाशिक ६० टक्के असे चित्र आहे. मराठवाड्यात गेल्या वर्षी आजच्या दिवशी ४२ टक्के पाणीसाठा होता. सध्याचा १५ टक्के साठा लक्षात घेता दुष्काळाची भीषणता लगेच लक्षात येते. गेल्या वर्षी तब्बल ९१ टक्के पाणीसाठा असलेल्या पुणे विभागातील पाणीसाठा यंदा ३० टक्के घटला आहे. (विशेष प्रतिनिधी)पुणे : मान्सूनने विदर्भातून मागील आठवड्यात परतीचा प्रवास सुरू केला आहे. ३ ते ४ दिवसांत राज्यातून मान्सून माघारी जाईल, अशी शक्यता आहे. दक्षिण गोव्याच्या काही भागांत अल्प काळ मुक्काम करून तो परतेल, त्यामुळे पुढील २४ तासांत पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले.अरबी समुद्रात सक्रीय झालेल्या चक्राकार वाऱ्याच्या प्रभावाने मान्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतून परतीचा पाऊस माघारी गेला आहे. सध्या परतीच्या पावसाची सीमा मध्य महाराष्ट्रालगत कायम आहे. मात्र ३ ते ४ दिवसांत महाराष्ट्रातून ८० टक्क्यांहून अधिक मान्सून माघारी फिरणार आहे.