शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

मराठवाड्यात १५ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: October 13, 2015 04:06 IST

मराठवाड्यातील लहानमोठ्या धरणांमध्ये १५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांतील परतीच्या पावसाने हा पाणीसाठा ८ टक्क्यांवरून १५ टक्के झाला असला तरी दुष्काळाचे सावट मात्र कायम आहे.

मुंबई : मराठवाड्यातील लहानमोठ्या धरणांमध्ये १५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांतील परतीच्या पावसाने हा पाणीसाठा ८ टक्क्यांवरून १५ टक्के झाला असला तरी दुष्काळाचे सावट मात्र कायम आहे. राज्यातील धरणांमध्ये सरासरी ५६ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी हा साठा तब्बल ७९ टक्के होता. याचा अर्थ पाणीसाठ्याबाबत राज्याची एकूणच अवस्था चिंतित करणारी आहे. पुणे विभागात ६१ टक्के पाणीसाठा आहे. सर्वांत चांगली स्थिती आहे ती कोकणची. तेथे ८८ टक्के पाणीसाठा आहे. नागपूर विभाग ७० टक्के, अमरावती ७२ टक्के, नाशिक ६० टक्के असे चित्र आहे. मराठवाड्यात गेल्या वर्षी आजच्या दिवशी ४२ टक्के पाणीसाठा होता. सध्याचा १५ टक्के साठा लक्षात घेता दुष्काळाची भीषणता लगेच लक्षात येते. गेल्या वर्षी तब्बल ९१ टक्के पाणीसाठा असलेल्या पुणे विभागातील पाणीसाठा यंदा ३० टक्के घटला आहे. (विशेष प्रतिनिधी)पुणे : मान्सूनने विदर्भातून मागील आठवड्यात परतीचा प्रवास सुरू केला आहे. ३ ते ४ दिवसांत राज्यातून मान्सून माघारी जाईल, अशी शक्यता आहे. दक्षिण गोव्याच्या काही भागांत अल्प काळ मुक्काम करून तो परतेल, त्यामुळे पुढील २४ तासांत पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले.अरबी समुद्रात सक्रीय झालेल्या चक्राकार वाऱ्याच्या प्रभावाने मान्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतून परतीचा पाऊस माघारी गेला आहे. सध्या परतीच्या पावसाची सीमा मध्य महाराष्ट्रालगत कायम आहे. मात्र ३ ते ४ दिवसांत महाराष्ट्रातून ८० टक्क्यांहून अधिक मान्सून माघारी फिरणार आहे.