शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

उजनीत अवघा १५ टक्के साठा

By admin | Updated: April 7, 2017 01:05 IST

मागील वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे काठोकाठ भरलेले उजनी धरण ढिसाळ नियोजनामुळे कोरडे पडू लागले आहे.

बारामती : मागील वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे काठोकाठ भरलेले उजनी धरण ढिसाळ नियोजनामुळे कोरडे पडू लागले आहे. धरणाच्या उपयुक्त साठ्यामध्ये सध्या केवळ १५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत काटकसरीने धरणातील पाणीसाठा वापरावा लागणार आहे. उजनी धरणाला नेहमीच ढिसाळ नियोजनाचा फटका बसतो. सोलापूर जिल्ह्याला नदी व कालव्याद्वारे वर्षभर अनियंत्रित पाणी सोडले जाते. तसेच, या जिल्ह्यातील राजकीय व्यक्तींच्याही दबावाला येथील धरणप्रशासन बळी पडते. सध्या धरणामध्ये १५ टक्के पाणीसाठा आहे. साहजिकच पुणे, अहमदनगर, सोलापूर आदी जिल्ह्यातील धरणकाठच्या गावांमध्येच पाणी टंचाईच्या झळा जाणवणार आहेत. उजनी धरणातील पाणीपातळी कमी झाल्याने जलाशयाचा भाग उघडा पडला आहे. याचा फटका जलाशयाच्या काठच्या गावांना आणि शेतीला बसणार आहे. तसेच, धरणावर अवलंबून असणाऱ्या पाणी योजनांना देखील पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे बहुतेक गावांमध्ये सलग पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. सध्या उन्हाचा काडाका जास्त असल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. त्यामुळे देखील धरणाच्या पाणीपातळीत घट होणार आहे. उजनी हे महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी एक धरण आहे. तसेच, भीमा खोऱ्यातील सर्वांत मोठे धरण म्हणूनही उजनीचा उल्लेख होतो. पुण्यातील बहुतांश धरणांमधील पाणी अखेरच्या टप्प्यात उजनीत सोडले जाते. २०१५ मध्ये उजनीधरण तीव्र दुष्काळामुळे कधी नव्हे तेवढ्या नीचांकी पातळीवर गेले होते. २०१६ मध्ये पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात धरण पूर्णक्षमतेने भरले गेले. धरणात तब्बल ११० टक्के पाणीसाठा झाला. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे उजनी धरण काठोकाठ भरूनदेखील अवघ्या सहा-सात महिन्यांतच कोरडे पडू लागते. उजनीच्या कालव्यातून मागील दीड महिन्यापासून सोलापूरला पाणी सोडले आहे. धरणातील पाणीपातळी ४९२.१८५ मीटर आहे, तर एकूण साठा २ हजार ४३.६२ दशलक्ष घनफूट आहे, तर धरणातील उपयुक्तसाठा केवळ ८.५० टीएमसी एवढाच शिल्लक आहे. धरण परिसरातील तापमानाचा पारा चाळिशीच्या आसपास आहे. पुढेही दोन महिने तीव्र उन्हाळा असणार आहे.