शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

उजनीत अवघा १५ टक्के साठा

By admin | Updated: April 7, 2017 01:05 IST

मागील वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे काठोकाठ भरलेले उजनी धरण ढिसाळ नियोजनामुळे कोरडे पडू लागले आहे.

बारामती : मागील वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे काठोकाठ भरलेले उजनी धरण ढिसाळ नियोजनामुळे कोरडे पडू लागले आहे. धरणाच्या उपयुक्त साठ्यामध्ये सध्या केवळ १५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत काटकसरीने धरणातील पाणीसाठा वापरावा लागणार आहे. उजनी धरणाला नेहमीच ढिसाळ नियोजनाचा फटका बसतो. सोलापूर जिल्ह्याला नदी व कालव्याद्वारे वर्षभर अनियंत्रित पाणी सोडले जाते. तसेच, या जिल्ह्यातील राजकीय व्यक्तींच्याही दबावाला येथील धरणप्रशासन बळी पडते. सध्या धरणामध्ये १५ टक्के पाणीसाठा आहे. साहजिकच पुणे, अहमदनगर, सोलापूर आदी जिल्ह्यातील धरणकाठच्या गावांमध्येच पाणी टंचाईच्या झळा जाणवणार आहेत. उजनी धरणातील पाणीपातळी कमी झाल्याने जलाशयाचा भाग उघडा पडला आहे. याचा फटका जलाशयाच्या काठच्या गावांना आणि शेतीला बसणार आहे. तसेच, धरणावर अवलंबून असणाऱ्या पाणी योजनांना देखील पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे बहुतेक गावांमध्ये सलग पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. सध्या उन्हाचा काडाका जास्त असल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. त्यामुळे देखील धरणाच्या पाणीपातळीत घट होणार आहे. उजनी हे महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या धरणांपैकी एक धरण आहे. तसेच, भीमा खोऱ्यातील सर्वांत मोठे धरण म्हणूनही उजनीचा उल्लेख होतो. पुण्यातील बहुतांश धरणांमधील पाणी अखेरच्या टप्प्यात उजनीत सोडले जाते. २०१५ मध्ये उजनीधरण तीव्र दुष्काळामुळे कधी नव्हे तेवढ्या नीचांकी पातळीवर गेले होते. २०१६ मध्ये पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात धरण पूर्णक्षमतेने भरले गेले. धरणात तब्बल ११० टक्के पाणीसाठा झाला. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे उजनी धरण काठोकाठ भरूनदेखील अवघ्या सहा-सात महिन्यांतच कोरडे पडू लागते. उजनीच्या कालव्यातून मागील दीड महिन्यापासून सोलापूरला पाणी सोडले आहे. धरणातील पाणीपातळी ४९२.१८५ मीटर आहे, तर एकूण साठा २ हजार ४३.६२ दशलक्ष घनफूट आहे, तर धरणातील उपयुक्तसाठा केवळ ८.५० टीएमसी एवढाच शिल्लक आहे. धरण परिसरातील तापमानाचा पारा चाळिशीच्या आसपास आहे. पुढेही दोन महिने तीव्र उन्हाळा असणार आहे.