शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

भाजपचे 15 ते 20 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात; 'या' नेत्याच्या पवार भेटीने चर्चांना पाठबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 17:04 IST

आधी काँग्रेसचे आणि आता भाजपमधून आमदार झालेले जयकुमार गोरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. किंबहुना भाजपला गळती लागणार असं चित्र तयार होत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी देखील अशाच प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या. एकूणच जयकुमार गोरे यांच्या भेटीने भाजपला गळती लागणार अशी चिन्हे दिसत आहेत.

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वेध लागले की, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातच पक्षांतर करून गेलेले नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. त्यांच्या दाव्याला एका नेत्याच्या भेटीने पाठबळ मिळाले आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी 30 हून अधिक नेत्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. तर काँग्रेसमधीलही अनेक नेते भाजपमध्ये सामील झाले होते. यापैकी अनेक नेते पराभूत झाले असून काही नेत्यांचा विजय झाला आहे. मात्र या नेत्यांना पक्षात सामील करूनही हेतू साध्य झाला नसल्याने भाजपमधून या नेत्यांना फारस महत्त्व मिळत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे हे नेते अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान जयंत पाटील यांनी भाजपचे 15-20 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. मात्र ही अफवा असल्याची चर्चाही समोर आली. परंतु, आधी काँग्रेसचे आणि आता भाजपमधून आमदार झालेले जयकुमार गोरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. किंबहुना भाजपला गळती लागणार असं चित्र तयार होत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी देखील अशाच प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या. एकूणच जयकुमार गोरे यांच्या भेटीने भाजपला गळती लागणार अशी चिन्हे दिसत आहेत.