शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

मध्यावधी झाल्यास १४५ जागा; भाजपाचा दावा

By admin | Updated: March 4, 2017 06:09 IST

शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास आणि त्यामुळे विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागले

यदु जोशी,मुंबई- शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास आणि त्यामुळे विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागले तर आपले किमान १४५ आमदार निवडून येतील, असा मोठा प्रवाह भाजपात आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिका निवडणुकांतील निकालाच्या आकडेवारीचा आधार त्यासाठी घेतला जात आहे.शिवसेनेने पाठिंबा काढल्यास भाजपाकडून राष्ट्रवादीशी युती करून सत्ता टिकविली जाईल, असे बोलले जात असले तरी भाजपांतर्गत असा कुठलाही विचार नाही. रा.स्व.संघाच्या धूरिणांनीदेखील राष्ट्रवादीसोबत जाण्याची गरज नाही. प्रसंगी मध्यावधी निवडणुकीची तयारी ठेवावी लागेल, असे सूचित केले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये ८३५२८३१० मतदार होते. त्यातील ५२६९१७५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. अलिकडे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (नगरपालिकांसह) ५९८२७३७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. १९८ विधानसभा मतदारसंघांच्या क्षेत्रातील २१२ नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा आणि १० महापालिकांमध्ये निवडणुका झाल्या. भाजपा आणि मित्र पक्षांची बेरीज केली तर १९८ विधानसभा मतदारसंघांमध्ये १८१९०४२१ मते मिळाली असून त्याची सरासरी टक्केवारी ३०.४० इतकी आहे. मात्र, मुंबई वगळता अन्य नऊ महापालिकांमध्ये प्रभाग पद्धत होती. एका मतदाराने चार मते दिली. त्यामुळे नऊ महापालिकांमधील एकूण मतांना चारने विभागले असता तितकी संख्या वजा करून भाजपाला महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका या तिन्ही निवडणुकांत भाजपाला १ कोटी २० लाख ११५९७ इतकी मते मिळाली. याचाच अर्थ भाजपाला २८.१९ टक्के इतकी मते मिळाली. ही मते राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांच्या दृष्टीने विचारात घेतली तर एकूण मते १७४७१४१४ इतकी होतात. या मतांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या एकूण १४७०९२७६ इतक्या मतांशी तुलना केली असता मध्यावधी निवडणूक झाली तर भाजपाला १४५ हून अधिक जागा मिळतील, अशी मांडणी भाजपाने केली आहे. >सरासरी २८.१९ टक्के मतेभाजपाला जिल्हा परिषदेत ६३७६०५४, मित्र पक्षांना ६८४५२८ मते मिळाली. नगरपालिकांत भाजपाला १३५४८१२ मते तर त्याच्या मित्र पक्षांना ८५७३० मते मिळाली. मुंबई पालिकेत भाजपाला १४००५०० इतकी मते मिळाली. मित्र पक्षांना ५०३६५ मते मिळाली. अन्य नऊ पालिकांत भाजपाला ८११७२८९ तर मित्र पक्षांना १२११४३ मते मिळाली. याचा अर्थ भाजपा आणि मित्र पक्षांना १८१९०४२१ मते मिळाली. नऊ महापालिका - ३५.८९, मुंबई महापालिका - २८.९२, जि.प. (२५) - २७.३६, नगरपालिका- २३.८२ टक्के मते भाजपाला प्राप्त झाली.