शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

मध्यावधी झाल्यास १४५ जागा; भाजपाचा दावा

By admin | Updated: March 4, 2017 06:09 IST

शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास आणि त्यामुळे विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागले

यदु जोशी,मुंबई- शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास आणि त्यामुळे विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागले तर आपले किमान १४५ आमदार निवडून येतील, असा मोठा प्रवाह भाजपात आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिका निवडणुकांतील निकालाच्या आकडेवारीचा आधार त्यासाठी घेतला जात आहे.शिवसेनेने पाठिंबा काढल्यास भाजपाकडून राष्ट्रवादीशी युती करून सत्ता टिकविली जाईल, असे बोलले जात असले तरी भाजपांतर्गत असा कुठलाही विचार नाही. रा.स्व.संघाच्या धूरिणांनीदेखील राष्ट्रवादीसोबत जाण्याची गरज नाही. प्रसंगी मध्यावधी निवडणुकीची तयारी ठेवावी लागेल, असे सूचित केले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये ८३५२८३१० मतदार होते. त्यातील ५२६९१७५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. अलिकडे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (नगरपालिकांसह) ५९८२७३७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. १९८ विधानसभा मतदारसंघांच्या क्षेत्रातील २१२ नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा आणि १० महापालिकांमध्ये निवडणुका झाल्या. भाजपा आणि मित्र पक्षांची बेरीज केली तर १९८ विधानसभा मतदारसंघांमध्ये १८१९०४२१ मते मिळाली असून त्याची सरासरी टक्केवारी ३०.४० इतकी आहे. मात्र, मुंबई वगळता अन्य नऊ महापालिकांमध्ये प्रभाग पद्धत होती. एका मतदाराने चार मते दिली. त्यामुळे नऊ महापालिकांमधील एकूण मतांना चारने विभागले असता तितकी संख्या वजा करून भाजपाला महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका या तिन्ही निवडणुकांत भाजपाला १ कोटी २० लाख ११५९७ इतकी मते मिळाली. याचाच अर्थ भाजपाला २८.१९ टक्के इतकी मते मिळाली. ही मते राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांच्या दृष्टीने विचारात घेतली तर एकूण मते १७४७१४१४ इतकी होतात. या मतांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या एकूण १४७०९२७६ इतक्या मतांशी तुलना केली असता मध्यावधी निवडणूक झाली तर भाजपाला १४५ हून अधिक जागा मिळतील, अशी मांडणी भाजपाने केली आहे. >सरासरी २८.१९ टक्के मतेभाजपाला जिल्हा परिषदेत ६३७६०५४, मित्र पक्षांना ६८४५२८ मते मिळाली. नगरपालिकांत भाजपाला १३५४८१२ मते तर त्याच्या मित्र पक्षांना ८५७३० मते मिळाली. मुंबई पालिकेत भाजपाला १४००५०० इतकी मते मिळाली. मित्र पक्षांना ५०३६५ मते मिळाली. अन्य नऊ पालिकांत भाजपाला ८११७२८९ तर मित्र पक्षांना १२११४३ मते मिळाली. याचा अर्थ भाजपा आणि मित्र पक्षांना १८१९०४२१ मते मिळाली. नऊ महापालिका - ३५.८९, मुंबई महापालिका - २८.९२, जि.प. (२५) - २७.३६, नगरपालिका- २३.८२ टक्के मते भाजपाला प्राप्त झाली.