शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मध्यावधी झाल्यास १४५ जागा; भाजपाचा दावा

By admin | Updated: March 4, 2017 06:09 IST

शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास आणि त्यामुळे विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागले

यदु जोशी,मुंबई- शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास आणि त्यामुळे विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागले तर आपले किमान १४५ आमदार निवडून येतील, असा मोठा प्रवाह भाजपात आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिका निवडणुकांतील निकालाच्या आकडेवारीचा आधार त्यासाठी घेतला जात आहे.शिवसेनेने पाठिंबा काढल्यास भाजपाकडून राष्ट्रवादीशी युती करून सत्ता टिकविली जाईल, असे बोलले जात असले तरी भाजपांतर्गत असा कुठलाही विचार नाही. रा.स्व.संघाच्या धूरिणांनीदेखील राष्ट्रवादीसोबत जाण्याची गरज नाही. प्रसंगी मध्यावधी निवडणुकीची तयारी ठेवावी लागेल, असे सूचित केले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये ८३५२८३१० मतदार होते. त्यातील ५२६९१७५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. अलिकडे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (नगरपालिकांसह) ५९८२७३७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. १९८ विधानसभा मतदारसंघांच्या क्षेत्रातील २१२ नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा आणि १० महापालिकांमध्ये निवडणुका झाल्या. भाजपा आणि मित्र पक्षांची बेरीज केली तर १९८ विधानसभा मतदारसंघांमध्ये १८१९०४२१ मते मिळाली असून त्याची सरासरी टक्केवारी ३०.४० इतकी आहे. मात्र, मुंबई वगळता अन्य नऊ महापालिकांमध्ये प्रभाग पद्धत होती. एका मतदाराने चार मते दिली. त्यामुळे नऊ महापालिकांमधील एकूण मतांना चारने विभागले असता तितकी संख्या वजा करून भाजपाला महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका या तिन्ही निवडणुकांत भाजपाला १ कोटी २० लाख ११५९७ इतकी मते मिळाली. याचाच अर्थ भाजपाला २८.१९ टक्के इतकी मते मिळाली. ही मते राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांच्या दृष्टीने विचारात घेतली तर एकूण मते १७४७१४१४ इतकी होतात. या मतांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या एकूण १४७०९२७६ इतक्या मतांशी तुलना केली असता मध्यावधी निवडणूक झाली तर भाजपाला १४५ हून अधिक जागा मिळतील, अशी मांडणी भाजपाने केली आहे. >सरासरी २८.१९ टक्के मतेभाजपाला जिल्हा परिषदेत ६३७६०५४, मित्र पक्षांना ६८४५२८ मते मिळाली. नगरपालिकांत भाजपाला १३५४८१२ मते तर त्याच्या मित्र पक्षांना ८५७३० मते मिळाली. मुंबई पालिकेत भाजपाला १४००५०० इतकी मते मिळाली. मित्र पक्षांना ५०३६५ मते मिळाली. अन्य नऊ पालिकांत भाजपाला ८११७२८९ तर मित्र पक्षांना १२११४३ मते मिळाली. याचा अर्थ भाजपा आणि मित्र पक्षांना १८१९०४२१ मते मिळाली. नऊ महापालिका - ३५.८९, मुंबई महापालिका - २८.९२, जि.प. (२५) - २७.३६, नगरपालिका- २३.८२ टक्के मते भाजपाला प्राप्त झाली.