शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मध्यावधी झाल्यास १४५ जागा; भाजपाचा दावा

By admin | Updated: March 4, 2017 06:09 IST

शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास आणि त्यामुळे विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागले

यदु जोशी,मुंबई- शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास आणि त्यामुळे विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागले तर आपले किमान १४५ आमदार निवडून येतील, असा मोठा प्रवाह भाजपात आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिका निवडणुकांतील निकालाच्या आकडेवारीचा आधार त्यासाठी घेतला जात आहे.शिवसेनेने पाठिंबा काढल्यास भाजपाकडून राष्ट्रवादीशी युती करून सत्ता टिकविली जाईल, असे बोलले जात असले तरी भाजपांतर्गत असा कुठलाही विचार नाही. रा.स्व.संघाच्या धूरिणांनीदेखील राष्ट्रवादीसोबत जाण्याची गरज नाही. प्रसंगी मध्यावधी निवडणुकीची तयारी ठेवावी लागेल, असे सूचित केले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये ८३५२८३१० मतदार होते. त्यातील ५२६९१७५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. अलिकडे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (नगरपालिकांसह) ५९८२७३७४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. १९८ विधानसभा मतदारसंघांच्या क्षेत्रातील २१२ नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा आणि १० महापालिकांमध्ये निवडणुका झाल्या. भाजपा आणि मित्र पक्षांची बेरीज केली तर १९८ विधानसभा मतदारसंघांमध्ये १८१९०४२१ मते मिळाली असून त्याची सरासरी टक्केवारी ३०.४० इतकी आहे. मात्र, मुंबई वगळता अन्य नऊ महापालिकांमध्ये प्रभाग पद्धत होती. एका मतदाराने चार मते दिली. त्यामुळे नऊ महापालिकांमधील एकूण मतांना चारने विभागले असता तितकी संख्या वजा करून भाजपाला महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका या तिन्ही निवडणुकांत भाजपाला १ कोटी २० लाख ११५९७ इतकी मते मिळाली. याचाच अर्थ भाजपाला २८.१९ टक्के इतकी मते मिळाली. ही मते राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांच्या दृष्टीने विचारात घेतली तर एकूण मते १७४७१४१४ इतकी होतात. या मतांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या एकूण १४७०९२७६ इतक्या मतांशी तुलना केली असता मध्यावधी निवडणूक झाली तर भाजपाला १४५ हून अधिक जागा मिळतील, अशी मांडणी भाजपाने केली आहे. >सरासरी २८.१९ टक्के मतेभाजपाला जिल्हा परिषदेत ६३७६०५४, मित्र पक्षांना ६८४५२८ मते मिळाली. नगरपालिकांत भाजपाला १३५४८१२ मते तर त्याच्या मित्र पक्षांना ८५७३० मते मिळाली. मुंबई पालिकेत भाजपाला १४००५०० इतकी मते मिळाली. मित्र पक्षांना ५०३६५ मते मिळाली. अन्य नऊ पालिकांत भाजपाला ८११७२८९ तर मित्र पक्षांना १२११४३ मते मिळाली. याचा अर्थ भाजपा आणि मित्र पक्षांना १८१९०४२१ मते मिळाली. नऊ महापालिका - ३५.८९, मुंबई महापालिका - २८.९२, जि.प. (२५) - २७.३६, नगरपालिका- २३.८२ टक्के मते भाजपाला प्राप्त झाली.