शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

१४०४ शाळांवर कारवाई; सर्वाधिक बोगस पटपडताळणी धुळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 00:04 IST

राज्यभरात विद्यार्थ्यांची खोटी पटसंख्या नोंदविणाऱ्या सुमारे एक हजार ४०४ शाळा असल्याचे निदर्शनात आले. यामध्ये अनुदानित व विनाअनुदानित आश्रमशाळांसह जिल्हा परिषद, महापालिका आणि शैक्षणिक संस्थांच्या खासगी शाळांचा सर्वाधिक समावेश आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : राज्यभरात विद्यार्थ्यांची खोटी पटसंख्या नोंदविणाऱ्या सुमारे एक हजार ४०४ शाळा असल्याचे निदर्शनात आले. यामध्ये अनुदानित व विनाअनुदानित आश्रमशाळांसह जिल्हा परिषद, महापालिका आणि शैक्षणिक संस्थांच्या खासगी शाळांचा सर्वाधिक समावेश आहे. या शाळांनी कागदोपत्री जास्त विद्यार्थी संख्या दाखवून शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, संचालक, शिक्षक आदींवर फौजदारीच्या कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश आहेत. मात्र, अंमलबजावणीस विलंब होत असल्यामुळे तर्कवितर्क काढले जात आहेत.सुमारे सात वर्षांपूर्वी महसूल विभागाने खोटी पटसंख्या नोंदविणाºया शाळांची पटपडताळणी केली आहे. राज्यभरातील ३५ जिल्ह्यांमधील शाळांत ती सलग तीन दिवस करण्यात आली. यातून एक हजार ४०४ प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये बोगस पटसंख्या नोंदविल्याचे निदर्शनात आहे. राज्यभरातून केवळ दीड लाख विद्यार्थी बोगस असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ही विद्यार्थी संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.या पटपडताळणीमध्ये राज्यभरातील एक हजार ४०४ शाळांमध्ये बोगस विद्यार्थी पटसंख्या आढळली. त्यामधील विद्यार्थी संख्या दीड लाखापेक्षा नक्कीच जास्त असण्याची शक्यता आहे. खोटी पटसंख्या नोंदविणाºया राज्यात सर्वाधिक धुळे जिल्ह्यात सुमारे ३९४ शाळा आढळल्या. यात जिल्हा परिषदेच्या १७ शाळा आहेत. याखालोखाल नांदेड जिल्ह्यात १७७ शाळा असून त्यात २७ जिल्हा परिषदेच्या आहेत. तर, जळगाव जिल्ह्यातील ११८ शाळांमध्ये जि.प.च्यादेखील १७ शाळा आहेत. नागपूरला १२७ शाळा असून त्यात जि.प.च्या १४ आहेत. सोलापूरच्या ११५ शाळांमध्ये जि.प.च्यादेखील नऊ, तर रायगडमधील ११८ शाळा असून आठ जि.प.च्या शाळांचा समावेश आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये मात्र शंभरपेक्षा कमी शाळांचा समावेश असून त्यातही महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि आश्रमशाळांचा व अनुदानित-विनाअनुदानित खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांचा समावेश आहे.खोटी विद्यार्थी पटसंख्या नोंदवलेल्या ३५ जिल्ह्यांमधील शाळांची संख्याजिल्हा शाळाठाणे ७५रायगड ११०कोल्हापूर ००५सांगली ००७सातारा ०११रत्नागिरी ००७सिंधुदुर्ग ००९लातूर ०७१नांदेड १७७उस्मानाबाद ०१४औरंगाबाद ०५५बीड ०३८हिंगोली ००६जालना ०३०परभणी ०५७सोलापूर ११५नंदुरबार ०४८धुळे ३९४जळगाव ११८नाशिक ०३३बुलडाणा ०१५यवतमाळ ०२३भंडारा ०१३गोंदिया ०१३वर्धा ००८नगर ०१३चंद्रपूर ०४२पुणे ०३२वाशिम ०१२अमरावती ०२३अकोला ०२२मुंबई ०५२नागपूर १२७गडचिरोली ०३७पालघर ००३- राज्यात सर्वाधिक ठाणे जिल्ह्यातील सात हजार ३१९ शाळांची पडताळणी झाली. त्यातील२० लाख १० हजार ५४५ विद्यार्थ्यांमध्ये सुमारे १० टक्के विद्यार्थ्यांची नोंद बोगस असल्याचे उघड झाले.- पालघर जिल्ह्यात केवळ तीन शाळा, तर ठाण्यामध्ये सुमारे ७५ शाळा बोगस विद्यार्थी पटसंख्या नोंदविणाºया असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले.

टॅग्स :Schoolशाळा