शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

रायगडमधील १३७ गुंड हद्दपार

By admin | Updated: October 15, 2014 04:10 IST

गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असलेल्या, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि जे मतदान प्रक्रियेत अडथळा आणू शकतात अशा १३७ गुंडांना हद्दपार करण्यात आले आहे.

जयंत धुळप, अलिबागगंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असलेल्या, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि जे मतदान प्रक्रियेत अडथळा आणू शकतात अशा १३७ गुंडांना हद्दपार करण्यात आले आहे. त्यांना १४ ते १९ आॅक्टोबर या सहा दिवसांसाठी हद्दपार केले आहे. उप विभागीय महसूल अधिकारी व दंडाधिकारी यांनी हे आदेश दिले आहेत.या गुंडांना वॉरंट बजावून प्रत्यक्ष हद्दपारीची कारवाई करण्याचे काम तत्काळ सुरू केल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी सुमंत भांगे यांनी ‘लोकमत’ला दिली. राज्यातील ही पहिलीच धडक कारवाई आहे.गेल्या पाच वर्षांपासून हद्पारीस योग्य असणाऱ्या १४१ गुंडांचे प्रस्ताव सुनावणी व निर्णयाअभावी प्रलंबित होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे लोकसभा निवडणूकीपूर्वी ‘लोकमत’ने सर्वप्रथम निदर्शनास आणले होते. त्यावर जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी सुनावणी घेवून निर्णय देण्याचे आदेश सर्व संबंधीत उप विभागीय महसुल अधिकारी तथा दंडाधिकारी यांना दिले होते. त्यावर कारवाई न झाल्याने गुंड लोकसभा निवडणूक प्रक्रीयेत मोकाट राहीले होते. आता विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने हा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणल्यावर, जिल्हाधिकारी भांगे यांनी सर्व संबंधीत उप विभागीय महसुल अधिकारी आणि दंडाधिकारी यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली. कारवाई न झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सोमवारी दिल्यावर मंगळवारी धडक कारवाई करण्यात आली. अलिबाग मतदारसंघात ५३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तेथील निवडणूक निर्णय अधिकारी दीपक क्षिरसागर यांनी अलिबाग तालुक्यातील ३६, मुरुडमधील १७ जणांना हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात १० जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तेजस समेळ यांनी १० गुंडांना हद्दपार करण्याचे आदेश दिले असून यामध्ये निवृत्त पोलीस सत्यवान पंढरीनाथ थळे, संतोष वेश्वीकर यांच्यासह शिवसेना आणि शेकापच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. बुधवारी न्यायालयास सुटी असल्याने दाद मागणे दुरापास्त झाल्यामुळे राजकीय गोटात चिंतेचे वातावरण आहे. अनेक कार्यकर्त्यांनी पसार होण्याचा मार्ग पत्करला आहे. या कारवाईमुळे मतदान निर्भय वातावरणात होण्याची आशा आहे.