शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

मराठवाड्यातील १२९ सिंचन प्रकल्प रखडले

By admin | Updated: July 18, 2015 00:02 IST

मराठवाड्यातील तब्बल १२९ सिंचन प्रकल्प निधीअभावी रखडल्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या या भागातील शेतकऱ्याला आशेचा किरण दिसत नाही.

मुंबई : मराठवाड्यातील तब्बल १२९ सिंचन प्रकल्प निधीअभावी रखडल्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या या भागातील शेतकऱ्याला आशेचा किरण दिसत नाही. हे प्रकल्प कधी पूर्ण करणार, असा सवाल करीत सत्तारूढ आणि विरोधी पक्ष सदस्यांनी आज विधानसभेत सरकारवर हल्लाबोल केला. मराठवाडा दुष्काळाच्या छायेत वावरत आहे. शेतकरी आणखी पिचला जात आहे. त्यामुळे सरकारने सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सभागृहात सविस्तर चर्चा करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. शिवसेनेचे अर्जुन खोतकर, शशिकांत खेडेकर, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदींनी प्रश्नोत्तराच्या तासात सरकारला धारेवर धरले. मराठवाड्यातील अंतिम टप्प्यात कामे असलेल्या १५ प्रकल्पांना तातडीने निधी उपलब्ध करून वर्षभरात ते पूर्ण करण्यात येईल. तसेच उर्वरित प्रकल्पांची कामे त्यानंतर घेण्यात येतील, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. मात्र मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने आमदार अत्यंत आक्र मक झाले. त्यांनी सविस्तर चर्चेचा आग्रह धरला. रखडलेल्या १२९ प्रकल्पांसाठीचा १२ हजार कोटी रुपयांचा निधी शासन किती दिवसांत देणार, असा सवाल खोतकर यांनी विचारला. त्यावर उत्तरादाखल महाजन म्हणाले की, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडील ८ मोठे, ७ मध्यम व ४९ लघू प्रकल्प असे एकूण ७१ प्रकल्प मराठवाड्यात बांधकामाधिन आहेत. (विशेष प्रतिनिधी)९०० कोटी रुपयांची आवश्यकता मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती व सिंचन सुविधांचा अभाव लक्षात घेता ज्या प्रकल्पांचे काम ७० ते ८० टक्के काम पूर्ण झालेले आहे, अशा अंतिम टप्प्यावर असलेल्या प्रकल्पांची कामे वर्षभरात पूर्ण करण्यात येतील. मराठवाड्यात अशा विविध १५ प्रकल्पांसाठी ९०० कोटी रुपये लागणार आहेत. - गिरीश महाजन