शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

तलाठी भरती शुल्कातून 127 कोटी तिजोरीत; ४,६४४ जागांसाठी १३ लाख अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 12:02 IST

तलाठी भरतीसाठी पीएचडीधारक, इंजिनिअर, एमबीए झालेल्या उच्च शिक्षित तरुणांनी अर्ज केले आहेत. यावरून राज्यात किती बेरोजगारी आहे, याचाही पुरेसा अंदाज येतो.

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या ४,६४४ पदांच्या तलाठी भरतीतून परीक्षा शुल्कापोटी तब्बल १२७ कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत. या परीक्षेसाठी १३ लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. मात्र, या बेरोजगार उमेदवारांकडून शासनाने अवैधरीत्या दुप्पट शुल्क वसूल केल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला असून, वसूल केलेले वाढीव शुल्क परत करण्याची मागणी केली आहे.

तलाठी भरतीत खुल्या वर्गासाठी १ हजार रुपये, तर आरक्षित वर्गासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले. यात उल्लंघन झाल्याचा आरोप  आ. किशोर जोरगेवार यांनी केला आहे.

उच्चशिक्षितांचेही अर्ज तलाठी भरतीसाठी पीएचडीधारक, इंजिनिअर, एमबीए झालेल्या उच्च शिक्षित तरुणांनी अर्ज केले आहेत. यावरून राज्यात किती बेरोजगारी आहे, याचाही पुरेसा अंदाज येतो.

तलाठी भरतीसाठी एवढे शुल्क का? केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून परीक्षा शुल्क म्हणून १०० रुपये, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ३५० रुपये, तर राजस्थान सरकार सगळ्या परीक्षांसाठी केवळ ६०० रुपये आकारते. असे असताना राज्य सरकार केवळ तलाठी भरतीच्या एका परीक्षेसाठी ९०० ते १ हजार रुपये शुल्क का आकारते? असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. 

२०२२ चा जीआर काय सांगतो? नोव्हेंबर २०२२च्या जीआरनुसार एखाद्या शासकीय भरती परीक्षेत ५ लाखापेक्षा जास्त उमेदवार सहभागी होत असतील तर परीक्षा शुल्क ४९५ रुपये आणि १५ टक्के प्रशासकीय कार्यालयाचा खर्च असे ५५० रुपये आकारले जावेत. मात्र, तलाठी भरतीत १३ लाख अर्ज आले असतानाही जादा शुल्क आकारण्यात आले असून, ते शासनाने परत करावे, अशी मागणी जोरगेवार यांनी नुकतीच विधानसभेत केली आहे. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारjobनोकरी