शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजार ५२७ जागा रिक्त; पात्रताधारक बेरोजगारांचे भरतीकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 07:05 IST

एकूण मंजूर पदांच्या ३७.११ पदे रिक्त असल्यामुळे ‘एनईपी’ची अंमलबजाणी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही स्पष्ट झाले.

राम शिनगारे

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये तब्बल १२,५२७ प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहे. यापैकी ४,३०० प्राध्यापकांची पदे भरण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाने अर्थ विभागाकडे सादर केला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या विभागाच्या निर्णयाकडे राज्यभरातील पात्रताधारक बेरोजगारांचे लक्ष लागले आहे.

केंद्र शासनाने जाहीर केलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) राज्यात लागू केले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्राध्यापकांसह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची आवश्यकता आहे. राज्यातील सार्वजनिक ११ विद्यापीठे आणि १ हजार १७२ अनुदानित महाविद्यालयांमध्ये ३३ हजार ७६३ प्राध्यापकांची पदे मंजूर आहेत. त्यातील २१ हजार २३६ पदांवर प्राध्यापक कार्यरत असून, तब्बल १२ हजार ५२७ जागा रिक्त आहेत. एकूण मंजूर पदांच्या ३७.११ पदे रिक्त असल्यामुळे ‘एनईपी’ची अंमलबजाणी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही स्पष्ट झाले.  त्यामुळे उच्चशिक्षण विभागाने रिक्त पदांपैकी ४,३०० पदांच्या भरतीच्या मान्यतेसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर केल्याचे समोर आली आहे.

७५ टक्के जागा भरण्याचे आदेशविद्यापीठ अनुदान आयाेगाने (यूजीसी) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरातील विद्यापीठे व महाविद्यालयातील ७५ टक्के जागा भरण्याचे आदेश  राज्य शासनांना नुकतेच दिले आहेत. त्यानुसार उच्चशिक्षण विभागाने ४,३०० प्राध्यापकांच्या  पदभरतीसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर केला. उच्चशिक्षण विभागाने मागील पाच वर्षांत २ हजार ८८ पदांची भरती केलेली आहे. 

सर्व विद्यापीठांमध्ये ७०० प्राध्यापकांच्या जागा मंजूर केल्या आहेत. मात्र, राज्यपालांनी भरतीस स्थगिती दिल्याने २१०० जागा महाविद्यालये व ७०० जागा विद्यापीठांत भरण्यासाठी २० वर्षांनी संधी मिळाली आहे. राज्यपालांकडे स्थगिती उठविण्याची मागणी केली आहे.- चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री

राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केल्यामुळे रिक्त पदे भरण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार रिक्त जागा भरण्यासाठी सर्वच पातळ्यांवर पाठपुरावा करण्यात येत आहे- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्चशिक्षण विभाग