शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

दहावीच्या परीक्षेत १२५ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण! राज्याचा निकाल ८९.४१ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 05:49 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ८९.४१ टक्के लागला आहे. ‘बेस्ट आॅफ फाइव्ह’ पद्धतीने राज्यातील १२५ विद्यार्थांनी १०० टक्के गुण पटकावले आहेत.

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ८९.४१ टक्के लागला आहे. ‘बेस्ट आॅफ फाइव्ह’ पद्धतीने राज्यातील १२५ विद्यार्थांनी १०० टक्के गुण पटकावले आहेत. यातील तब्बल ७० विद्यार्थी हे एकट्या लातूर विभागातील असून, यामुळे लातूर पॅटर्नचे यश पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.राज्य मंडळाच्या अध्यक्ष शंकुतला काळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये आॅनलाइन निकाल जाहीर केला. राज्यातून १६ लाख २८ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ लाख ५६ हजार २०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षी दहावीचा निकाल ८८.७४ टक्के लागला होता. त्या तुलनेत यंदाच्या निकालात ०.६७ टक्क्यांची वाढ झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारण्याची परंपरा कायम राखली असून, त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.९७ तर मुलांचे प्रमाण ८७.२७ इतके आहे.राज्यातील ९ विभागीय मंडळांमध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९६ टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल नागपूरचा ८५. ९७ टक्के लागला आहे. मुंबई ९०.४१, कोकण ९६, पुणे ९२.०८, नाशिक ८७.८२, नागपूर ८५.९७, कोल्हापूर ९३.८८, अमरावती ८६.४९, औरंगाबाद ८८.८१ आणि लातूर ८६.३० अशी निकालाची टक्केवारी आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ८६.८७ टक्के लागला.गुणांमध्ये वाढ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६३ हजार ३३१ इतकी आहे.तर ३५ ते ४५ टक्क्यांदरम्यान गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ९९ हजार २६२ इतकी आहे.४ लाख ३ हजार १३७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ५ लाख ३८ हजार ८९० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.दीड लाख विद्यार्थ्यांनाकलेचे अतिरिक्त गुणकला व क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य दाखविणाºया विद्यार्थ्यांना २५ गुणांपर्यंत अतिरिक्त गुण राज्य मंडळाकडून दिले जातात. यंदा १ लाख ६६ हजार १८१ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळाले आहेत.मंडळाकडून एकूण ५७ विषयांची परीक्षा घेण्यात आली होती, त्यापैकी ११ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८Schoolशाळा