शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

...तर तुमचा वाहन परवाना कायमस्वरुपी रद्द होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 09:36 IST

तीन महिन्यांत मुंबईतल्या १,२४७ जणांचे वाहन परवाने रद्द

मुंबई: गेल्या तीन महिन्यांत वाहतूक पोलिसांनी १ हजार २४७ जणांचे वाहतूक परवाने रद्द केले आहेत. बेदरकारपणे वाहन चालवल्यानं आणि सिग्नल तोडल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मुंबईत २ हजार ८१४ रस्ते अपघात झाले होते. त्यात ४०३ जणांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबर २०१९ मध्ये मुंबईतल्या वाहतूक पोलिसांनी आरटीओला एक प्रस्ताव दिला होता. त्यानंतर वाहन चालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. तत्पूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी एक सूचना जारी केली होती. एखादी व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्यास, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करत असल्यास, सिग्नल तोडत असल्यास त्याचा परवाना किमान तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात यावा, असं महाराष्ट्र पोलिसांनी सूचनेत म्हटलं होतं. वाहन परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आल्याची कारवाई झाल्यानंतरही बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या व्यक्तीचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला जाऊ शकतो. 'एखादी व्यक्ती वारंवार वाहतूक नियमांचं उल्लंघन करत असल्यास तिचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला जाईल,' अशी माहिती वाहतूक विभागाचे प्रवक्ते अभय देशपांडे यांनी दिली. ऑक्टोबर २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत राज्य वाहतूक विभागानं राज्यभरातल्या एकूण १० हजार ३५१ चालकांचे परवाने रद्द केल्याची आकडेवारी देशपांडे यांनी दिली. या १० हजार ३५१ चालकांमध्ये मुंबईतल्या १ हजार २४७ जणांचा समावेश आहे. यातील ४३० जणांचा परवाना वाहन चालवताना मोबाईलवर वापरल्यानं रद्द करण्यात आला आहे. तर ५२० जणांवर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यानं कारवाई झाली आहे. राज्यभरात १४ हजार ३५२ जणांचा परवाना वाहन चालवताना मोबाईलवर बोलत असल्यानं रद्द करण्यात आला असून ४ हजार ७४७ जणांचे परवाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यानं रद्द करण्यात आले आहेत.