शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

...तर तुमचा वाहन परवाना कायमस्वरुपी रद्द होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 09:36 IST

तीन महिन्यांत मुंबईतल्या १,२४७ जणांचे वाहन परवाने रद्द

मुंबई: गेल्या तीन महिन्यांत वाहतूक पोलिसांनी १ हजार २४७ जणांचे वाहतूक परवाने रद्द केले आहेत. बेदरकारपणे वाहन चालवल्यानं आणि सिग्नल तोडल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मुंबईत २ हजार ८१४ रस्ते अपघात झाले होते. त्यात ४०३ जणांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबर २०१९ मध्ये मुंबईतल्या वाहतूक पोलिसांनी आरटीओला एक प्रस्ताव दिला होता. त्यानंतर वाहन चालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. तत्पूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी एक सूचना जारी केली होती. एखादी व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्यास, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करत असल्यास, सिग्नल तोडत असल्यास त्याचा परवाना किमान तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात यावा, असं महाराष्ट्र पोलिसांनी सूचनेत म्हटलं होतं. वाहन परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आल्याची कारवाई झाल्यानंतरही बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या व्यक्तीचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला जाऊ शकतो. 'एखादी व्यक्ती वारंवार वाहतूक नियमांचं उल्लंघन करत असल्यास तिचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला जाईल,' अशी माहिती वाहतूक विभागाचे प्रवक्ते अभय देशपांडे यांनी दिली. ऑक्टोबर २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत राज्य वाहतूक विभागानं राज्यभरातल्या एकूण १० हजार ३५१ चालकांचे परवाने रद्द केल्याची आकडेवारी देशपांडे यांनी दिली. या १० हजार ३५१ चालकांमध्ये मुंबईतल्या १ हजार २४७ जणांचा समावेश आहे. यातील ४३० जणांचा परवाना वाहन चालवताना मोबाईलवर वापरल्यानं रद्द करण्यात आला आहे. तर ५२० जणांवर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यानं कारवाई झाली आहे. राज्यभरात १४ हजार ३५२ जणांचा परवाना वाहन चालवताना मोबाईलवर बोलत असल्यानं रद्द करण्यात आला असून ४ हजार ७४७ जणांचे परवाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यानं रद्द करण्यात आले आहेत.