शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

अकरावीसाठी १२.२ लाख अर्ज; आज शेवटचा दिवस; ९०० तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 06:26 IST

प्रवेश प्रक्रियेचा ५ जूनला शेवटचा दिवस असल्याने तक्रारदार विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अकरावीसाठी ४ जूनपर्यंत १२ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये मुंबई विभागात १ लाख १९ हजार ५९२ जणांची नोंदणी झाली आहे. मुंबईत १,१९,५९२ नोंदणी शिक्षण विभागाची सॉफ्टवेअर प्रणाली सुरळीत होत असली तर काही ठिकाणी अजूनही अडचणींची नोंद झाली आहे. त्यात मुंबई विभागातील सीबीएसईच्या रिपिटर विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा समावेश आहे. दरम्यान, आता १७ हजारपैकी फक्त ९०० तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती शिक्षण विभाग संचालक श्रीराम पानझडे यांनी दिली. प्रवेश प्रक्रियेचा ५ जूनला शेवटचा दिवस असल्याने तक्रारदार विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.

रिपिटर म्हणून पास झालेल्या एसएससी आणि सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना योग्य पर्याय उपलब्ध होत नाही आणि तसेच त्यांच्या मोबाईलवर ओटीपीही येत नाही, अशा तक्रारी आता केल्या जात आहेत. या तक्रारीच्या निवारणासाठी चर्नी रोड येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात फेऱ्या मारूनही कर्मचाऱ्यांकडे प्रशासकीय अधिकार नसल्याने ती अडचण दूर झालेली नाही.

राज्यातील ९०० तक्रारी प्रलंबित आहे. विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के तक्रारी सोडविणे हे आमचे काम आहे, ते काम पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.- श्रीराम पानझडे, सहसंचालक, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभाग

  • अर्ज लॉक केलेले     ११,२०,३७२
  • नियमित फेरी    १०,७३६६
  • इन हाऊस कोटा    ५३१६० 
  • व्यवस्थापन कोटा    २६,५८६ 
  • अल्पसंख्याक कोटा    ४१,०००
टॅग्स :collegeमहाविद्यालयAdmissionप्रवेश प्रक्रियाStudentविद्यार्थी